शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

भिवंडीत अल्पवयीन युवकाची हत्या, काल्हेर खाडीकिनारी मृतदेह गाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

By नितीन पंडित | Updated: December 7, 2023 18:35 IST

माझ्या मुलाची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी याचना आई कुसुम शर्मा हिने केली आहे.

भिवंडी : शहरात पूर्ववैमनस्यातून एका अल्पवयीन युवकाची हत्या करून मृतदेह काल्हेर येथील खाडीकिनारी निर्जनस्थळी गाडून पुरावा नष्ट केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बुधवारी दोघा युवकांना नारपोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.योगेश रवि शर्मा वय १६ वर्ष, ५ महीने असे हत्या झालेल्या अल्पवयीन युवकाचे नाव आहे. काल्हेर येथील आशापुरा कॉम्प्लेक्स या भागात राहणारा योगेश यास २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी काही मित्रांनी काल्हेर येथील रेतीबंदर येथे दारू पिण्यासाठी येत असल्याचे सांगत तेथे चाखण्यासाठी काही घेऊन येण्याचे सांगितले.त्यानंतर योगेश घरातून गेला तो परत आलाच नाही. 

या प्रकरणी कुटुंबीयांनी मुलाचा शोध घेऊन ही न सापडल्याने नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी योगेश अल्पवयीन असल्याने अज्ञातां विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. घटनेचे गांभीर्य पाहून नारपोली पोलिसांनी योगेश पूर्वी राहत असलेल्या कामतघर ब्रह्मानंद नगर येथील काही युवकांसोबत यापूर्वी वाद झाला होता.त्या पूर्ववैमनस्यातून अपहरण झाले असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला असता पोलिसांनी ब्रह्मानंद नगर कामतघर परिसरातून आयुश विरेंद्र झा वय १९ वर्ष व मनोज नारायण टोपे वय  १९ वर्ष या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी धारदार हत्याराने योगेशची हत्या केल्याची कबुली देऊन काल्हेर रेतीबंदर येथील निर्जन गवताच्या ठिकाणी मृतदेह पुरून ठेवल्याचे सांगितले.

नारपोली पोलिसांनी घटनास्थळी अप्पर तहसीलदार गायकवाड,नायब तहसीलदार आदेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला आहे. काही दिवसांपूर्वी ब्रह्मानंदनगर येथे माझ्या मुलासोबत भांडण झाले होते. त्या रागातून माझ्या मुलाची हत्या झाली आहे असा झाल आरोप मृतक योगेशची आई कुसुम यांनी केला असून माझ्या मुलाची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी याचना आई कुसुम शर्मा हिने केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी