शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

मुरबाड अव्वल; ठाणे पाचवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:48 IST

ठाणे जिल्ह्याच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा ८५.५६ टक्के लागला असून, या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. जिल्ह्यातील तालुकानिहाय निकालात मुरबाड अव्वल ठरले

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा ८५.५६ टक्के लागला असून, या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. जिल्ह्यातील तालुकानिहाय निकालात मुरबाड अव्वल ठरले असून, ठाणे पाचव्या क्रमांकावर आहे.जिल्ह्यात ८१.४१ टक्के मुले, तर ९०.४२ टक्के मुलींनी यश मिळवले आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा एकूण निकाल सुमारे तीन टक्क्यांनी घसरला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डातर्फे (एचएससी) फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाइन निकाल बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्यातून यंदा ९४,०७९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ९४,००७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर त्यातील एकूण ८०,४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ३९,१७१ मुली असून ४१,२६२ मुलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील रिपिटर्स विद्यार्थ्यांचा निकाल ३६.९३ टक्के लागला आहे. एकूण ५,२९४ रिपिटर्स विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १,९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रिपिटर्स विद्यार्थ्यांमध्येही सर्वाधिक म्हणजे ३९.०२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असल्या तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील रिपिटर्स विद्यार्थ्यांच्या निकालातही यावर्षी घट झाली आहे.जिल्ह्याचा शाखानिहाय निकाल पाहता विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९४.१४ टक्के असून कला शाखेचा निकाल सर्वात कमी म्हणजे ७७.२५ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ८८.४६, तर व्यावसायाभिमुख शाखेचा निकाल ९१.७६ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून ३८११ विद्यार्थी विशेष श्रेणीत, ८,९६१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १२,६७६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ८३३ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतील ४३५ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, २,७८५ विद्यार्थ्यांना प्रथम, ६,६१५ विद्यार्थ्यांना द्वितीय तर १,३०१ विद्यार्थ्यांना पास श्रेणी मिळाली आहे. वाणिज्य शाखेतील ४,८५२ विद्यार्थी विशेष, १३,८७९ विद्यार्थी प्रथम, १७,९१७ विद्यार्थी द्वितीय, ३५२२ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्याचबरोबर व्यावसायाभिमुख शाखेच्या निकालातही ७१ विद्यार्थी विशेष, ४२४ विद्यार्थी प्रथम, ३८३ विद्यार्थी द्वितीय, तर १३ विद्यार्थी पास श्रेणी मिळवण्यात यशस्वी झाले.ठाणे जिल्ह्यातून मुरबाड तालुक्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९२.४७ टक्के, तर सर्वात कमी म्हणजे ७९.९५ टक्के निकाल भिवंडी तालुक्याचा लागला आहे.ठाणे जिल्ह्यांतर्गत सहा महानगरपालिका आणि पाच तालुक्यांचा समावेश होतो. यातील मुरबाड तालुक्याचा निकाल सर्वाधिक असून त्याखालोखाल शहापूर तालुक्याचा निकाल ९०.७९ टक्के आहे. तिसरा क्रमांक नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राने पटकावला असून त्याचा निकाल ९०.५४ टक्के इतका आहे. उल्हासनगर महापालिका चौथ्या स्थानी असून त्यांचा निकाल ९०.०४ टक्के आहे. पाचव्या क्रमांकावर ठाणे महानगरपालिका, सहाव्या क्रमांकावर अंबरनाथ, तर सातव्या क्रमांकावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका तालुका आहे. त्यांची टक्केवारी अनुक्रमे ८८.७९ टक्के, ८७.६३ टक्के आणि ८७.४६ टक्के आहे. आठव्या क्रमांकावर भार्इंदर महानगरपालिका विभाग असून त्याचा निकाल ८७.१५ टक्के आहे. नवव्या क्रमांकावर असलेल्या भिवंडी महानगरपालिका विभागाचा निकाल ८६.६४ टक्के, तर दहाव्या क्रमांकावरील कल्याण ग्रामीण विभागाचा निकाल ८४.५४ टक्के लागला आहे. तालुकानिहाय टक्केवारी पाहता जिल्ह्यातील अकराही तालुक्यांतून उत्तीर्णांमध्ये मुलींचीच संख्या जास्त आहे.ठाणे जिल्ह्यातील सुमारे ३५ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच महाविद्यालयांच्या एकूण निकालाकडेही अनेकांचे लक्ष लागलेले असते. यंदा कल्याण ग्रामीण तालुक्यातील एक, अंबरनाथ तालुक्यातील तीन, शहापूर तालुक्यातील एक, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील १०, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सात, मीरा-भार्इंदर महानगरपालिका क्षेत्रातील तीन, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पाच, उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील दोन आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील तीन कनिष्ठ महाविद्यालये असे मिळून ३५ कनिष्ठ महाविद्यालयांनी १०० टक्के यश मिळवले आहे. मात्र, भिवंडी आणि मुरबाड तालुक्यांतील एकाही महाविद्यालयाला १०० टक्के यश मिळवता आलेले नाही.धाकधूकआणि आनंदबारावी परीक्षेचा निकाल हा करिअरचा टर्निंग पॉइंट असतो. त्यामुळे या निकालाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचेही लक्ष लागले असते. किती गुण मिळणार, याविषयी निकालापूर्वी धाकधूक असते आणि अपेक्षित निकाल लागताच विद्यार्थ्यांचा आनंद अशीच उंच उडी घेतो.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८