शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

पालिका, पक्षात मेहतांसोबत अजिबात काम करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 01:50 IST

काँग्रेसची राज्यमंत्रीपदाची ऑफर नाकारून भाजपला पाठिंंबा देणाऱ्या अपक्ष आमदार गीता जैन यांना आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शहराची सूत्रे त्यांच्या हाती देण्याच्या दिलेल्या आश्वासनांवरुन घूमजाव केले आहे.

मीरा रोड : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि काँग्रेसची राज्यमंत्रीपदाची ऑफर नाकारून भाजपला पाठिंंबा देणाऱ्या अपक्ष आमदार गीता जैन यांना आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शहराची सूत्रे त्यांच्या हाती देण्याच्या दिलेल्या आश्वासनांवरुन घूमजाव केले आहे. त्यातही स्थानिक भाजप आणि नगरसेवकांवर माजी आमदार नरेंद्र मेहतांना आपला वरचष्मा कायम ठेवायचा असल्याने जैन यांना डालवण्याचे प्रकार सुरुच असल्याच्या तक्रारी जैन व समर्थकांनी चालवल्या आहेत. तर नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात मला साथ देत मेहतांना झिडकारले असल्याने महापालिका व पक्षात त्यांच्यासोबत काम करणार नाही, असे जैन यांनी स्पष्ट केले आहे.विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी जैन यांनी चालवली होती. त्यांच्यात आणि मेहतांमध्ये त्यावरुन टोकाचा वाद सुरु झाला होता. जैन यांना भाजप आणि प्रभागातील कार्यक्रमांना न बोलावण्यापासून विविध मार्गाने त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपने तिकीट नाकारल्याने जैन यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. निवडणुकीत त्यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला.निकालानंतर राज्यातील भाजपला सत्ता स्थापनेची गणिते अवघड दिसू लागल्याने अगदी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जैन यांच्याशी संपर्क साधला. जैन यांनी आपण भाजप सोबतच असल्याचा शब्द दिला. पण त्याचवेळी मीरा- भाईंदरच्या नेतृत्वामुळे होत असलेली भाजपची बदनामी रोखून स्वच्छ, पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार नागरिकांना द्यायचा असेल तर महापालिका व पक्ष संघटनेची सूत्रे आपल्या हाती देण्याची अटही जैन यांनी नेत्यांना घातली होती. त्यावेळी नेत्यांनी जैन यांना शब्द दिला होता.जैन भाजपसोबत असूनही त्यांना कोणत्या कार्यक्रमाला बोलावायचे नाही, कुणीही त्यांना भेटायचे नाही असे फतवे निघत होते. शुभेच्छा देण्यासाठी भेटणारे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनाही जाब विचारला जायचा. जैन यांनी तक्रार केल्यावर फडणवीस यांनी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना भाईंदरमध्ये पााठवले. चव्हाण यांनीही भाजपच्या सर्व नगरसेवक आदींची बैठक घेऊन जैन यांना सोबत घेण्याचा वरिष्ठांचा आदेश कळवला. परंतु त्या नंतरही जैन यांना लांबच ठेवले जात आहे.फडणवीस यांच्याकडे जैन व मेहता यांची एकत्र बैठक झाली. त्या बैठकीत दोघांनी मिळून काम करा अशी सूचना दिली. परंतु नेत्यांनी आधी दिलेला शब्द आणि मेहतांच्या विरोधात दिलेला कौल या मुळे एकत्र काम करणे शक्य नसल्याचे जैन यांनी स्पष्ट केले. पाठीत खंजीर खूपसून घेण्याऐवजी तलवार घेऊन लढू अशी भूमिका जैन यांनी घेतली होती.।विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीयेत्या १५ जानेवारीपर्यंत या बाबत पक्षश्रेष्ठींकडून निर्णय होणे अपेक्षित असून फडणवीस यांचे मेहतांशी असलेले जवळचे संबंध तसेच राज्यातील सत्ता हातून गेल्याने आता जैन यांना दिलेला शब्द पाळला जाईल याबद्दल भाजपच्या गोटातूनच साशंकता व्यक्त होत आहे.मेहतांना ओवळा माजिवडा मतदारसंघात काम करण्यास श्रेष्ठींकडून सांगण्यात आल्याचे ऐकले होते. त्यांनी तेथे काम करण्यास माझी हरकत नाही. पण मीरा- भार्इंदर मतदारसंघात व पालिकेत भ्रष्टाचारी आणि दडपशाही प्रवृतींसोबत जाणार नसल्याचे जैन यांनी म्हटले आहे. शहरातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.