शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

कोरोनाचा प्रसार कमी करण्यात पालिकेला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 00:45 IST

पॉझिटिव्ह रुग्ण सहा टक्के : महापालिकेने मिळवले कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : तीन महिन्यांत महापालिकेने कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवले आहे. जिल्ह्यातील सर्व महापालिका मिळून जेवढ्या चाचण्या करतात, तेवढ्या चाचण्या एकट्या ठाणे पालिका क्षेत्रात होत आहेत. सर्वाधिक चाचण्या करूनही ठाण्यात पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी सहा टक्केच आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत ही सर्वात कमी टक्केवारी आहे.

गेल्या तीन महिन्यांत जीपीएस प्रणालीयुक्त असा आधुनिक नियंत्रण कक्ष, उपलब्ध असलेल्या बेडची माहिती देणारा डॅशबोर्ड, अ‍ॅपचा वापर करून एका क्लिकवर बाधित रुग्णांची संपूर्ण माहिती, कंटेनमेंट झोनचा नकाशा, चाचण्या करणारी मोबाइल व्हॅनची सुविधा आणि विशेष म्हणजे भविष्यात संख्या वाढली, तरी पुरेशी आयसीयू आणि व्हेंटिलेटरची सुविधा आधीच निर्माण करणारी ठाणे महापालिका ही जिल्ह्यातील एकमेव महापालिका ठरली आहे. त्यामुळेच आजघडीला संपूर्ण जिल्ह्याच्या काही प्रमाणात भार ठाणे महापालिकेने उचलला असून, जवळपास ३0 टक्के इतर पालिका क्षेत्रांतील रुग्णांवर ठाणे महापालिकेकडून उपचार सुरू आहेत.

आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी २४ जून रोजी पदभार स्वीकारला, तेव्हा ठाण्याचा मृत्युदर हा पाच टक्क्यांच्या जवळपास होता. बुधवारी त्यांनी तीन महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला, तेव्हा हाच मृत्युदर तीन टक्क्यांपेक्षा खाली आहे. विशेष म्हणजे मृत्युदर कमी दाखवण्यासाठी इतर महापालिका केवळ एका महिन्याच्या मृत्युदराची टक्केवारी दाखवत असले, तरी ठाणे महापालिकेने गेल्या तीन महिन्यांतील मृत्यूची टक्केवारी प्रसिद्ध केली आहे. एका महिन्याचा विचार केला तर हा मृत्युदर केवळ एक टक्क्यावर आहे.

भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, तरी ठाणेकरांना चिंता करण्याचे कारण नाही. व्हेंटिलेटरसोबतच १५0 आयसीयूची सुविधा पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार असल्याचे डॉ. शर्मा यांनी स्पष्ट केले. पॉझिटिव्ह रुग्णांचा जूनमध्ये हिट रेट ३३ टक्क्यांवर होता, तो आता ११ टक्क्यांवर घसरला आहे. बेड उपलब्ध न होणे, उपचार न होणे, अ‍ॅम्ब्युलन्स न मिळणे अशी एकही तक्रार तीन महिन्यांत आली नाही. आयुक्तांसोबत अनुभवी अधिकारी रात्रंदिवस काम करत असल्याने हे शक्य झाले.मोफत इंजेक्शनची सुविधाठाणे महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांना रेमडेसिविरसारखे इंजेक्शन मोफत, तर पालिका क्षेत्राबाहेरील रुग्णांना मूळ किमतीत उपलब्ध केली जात आहेत. ठाण्याचा मृत्युदर तीन टक्क्यांच्याही खाली असून, मोबाइल चाचणी वाहने दोन महिन्यांपासून सर्वत्र फिरत आहेत. बाहेरून ठाण्यात येणाºया नागरिकांची चाचणी करण्यासाठी अ‍ॅण्टीजेन टेस्ट सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि अधिकाऱ्यांची अनुभवी टीम असल्याने कमी कालावधीत कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. मात्र, एवढ्यावर न थांबता चाचण्या अधिक वाढवण्यात येणार आहे. भविष्यात रुग्णसंख्या वाढली, तरी ठाणेकरांना चिंता करण्याचे कारण नाही. एकही रुग्ण उपचाराविना राहणार नाही, अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या आहे.- डॉ. विपिन शर्मा, आयुक्त,ठाणे महानगरपालिका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस