शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

कामगार रुग्णालयातील सात इमारतींना महापालिकेचा ४० तासांचा अल्टिमेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:39 IST

ठाणे : आधीच कोरोनामुळे नागरिक हैराण झालेले असताना आता दुसरीकडे पावसाळ्याच्या आपत्तीचे कारण देऊन ठाणे महापालिकेने कामगार रुग्णालयातील ...

ठाणे : आधीच कोरोनामुळे नागरिक हैराण झालेले असताना आता दुसरीकडे पावसाळ्याच्या आपत्तीचे कारण देऊन ठाणे महापालिकेने कामगार रुग्णालयातील शिल्लक राहिलेल्या सात इमारतींतील रहिवाशांनादेखील ४० तासांत घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. अन्यथा वीज, पाणी कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे.

परंतु, या इमारती अतिधोकादायक नसून धोकादायक असतानाही आणि यातील बहुतेक इमारतींची नुकतीच दुरुस्ती केली असतानाही त्याखाली करण्याच्या नोटिसा बजावल्याने येथील रहिवासी हवालदिल झाले आहेत.

ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या कामगार रुग्णालयात कामगारांसाठी यापूर्वी २७ इमारती येथे होत्या. परंतु, दरवर्षी धोकादायक इमारती घोषित करून आतापर्यंत २७ इमारती तोडल्या आहेत, तर ज्या इमारतींमध्ये या रहिवाशांना हलविण्यात आले होते, त्या इमारतींचे यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिटदेखील झाले होते. या इमारती वास्तव्यास योग्य असल्याचेही सांगण्यात आले होते. त्यामुळे येथे रहिवासी वास्तव्यास आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतींच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधीदेखील खर्ची घातला आहे. आता तर एक महिन्यापूर्वीदेखील येथील इमारतींची दुरुस्ती करून त्याचा अहवाल महापालिकेकडे सादर केल्याचा दावा येथील रहिवाशांनी केला आहे. असे असताना आता महापालिकेने पुन्हा या इमारती खाली करण्यासाठी मंगळवारी नोटीस बजावली आहे. येत्या ४० तासांत इमारती खाली करण्याचे अल्टिमेट देऊन वीज आणि पाणी कनेक्शन तोडले जाईल, असा इशाराही दिला आहे.