शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

कोलशेत खाडी किनारी टाकलेला भराव महापालिका काढणार; महापालिका आयुक्त राव यांनी दिले निर्देश

By अजित मांडके | Updated: July 9, 2024 15:54 IST

ठाण्यातील कोलशेत, बाळकुम खाडी किनारी खारफुटी नष्ट करुन त्यावर राडरोड्याचा भराव टाकून त्याठिकाणी अतिक्रमण केले जात असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते.

ठाणे : कोलशेत येथील खाडी किनारी कांदळवनाची कत्तल करुन भराव टाकण्यात आल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर त्या संदर्भात विधानसभेच्या अधिवेषनात आवाज उठविण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. आता महापालिकेने देखील या संदर्भात ठोस पावले उचलली असून कोलशेत आणि बाळकुम येथे खाडी किनारी टाकण्यात आलेला भराव काढून टाकण्यात येईल असे आश्वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

ठाण्यातील कोलशेत, बाळकुम खाडी किनारी खारफुटी नष्ट करुन त्यावर राडरोड्याचा भराव टाकून त्याठिकाणी अतिक्रमण केले जात असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने येथील भरावाच्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने चर मारले होते. तर या वृत्ताची दखल घेत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी खाडी किनारी भागातील भरावाची पाहाणी केली होती. तसेच या भरावाचा मुद्दा त्यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. याप्रकरणी चौकशी समिती नेमून कारवाई करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. यानंतर खडबडून जाग आलेल्या जिल्हा प्रशासनाने भरावाप्रकरणी कापुरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानंतर आता सोमवारी महापालिका आयुक्त राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी अधिकाºयांना काही महत्वाच्या सुचना केल्या आहेत. कोलशेत, बाळकूम परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीलगत कांदळवनावर भराव टाकण्यात आला आहे. या भागाची पाहणी केल्यानंतर तेथे मोठी वाहने जाऊ नयेत यासाठी चर खणण्यात आले आहेत. कांदळवनाच्या संवर्धनाबाबत फलक लावण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेनेही मोठी वाहने या भागात प्रवेश करू नयेत याची उंच वाहन अवरोधक बसवले आहेत. आता हा भराव काढून टाकण्याची कारवाई ठाणे महापालिका करणार आहे.

वन विभाग आणि महसूल विभाग यांच्याशीही येथील परिस्थितीबाबत पत्र व्यवहार करण्यात आला आहे. कांदळवनावरील हा भराव काढून टाकण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेने आक्रमक व्हावे. आपल्या कृतीतून या संवेदनशील विषयाबाबत महापालिकेची आक्रमक भूमिका दिसली पाहिजे. त्यासाठी येत्या तीन दिवसात आतापर्यंत झालेली कारवाई आणि पुढील तीन महिन्यात करायचा कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागास दिले.