शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

कोलशेत खाडी किनारी टाकलेला भराव महापालिका काढणार; महापालिका आयुक्त राव यांनी दिले निर्देश

By अजित मांडके | Updated: July 9, 2024 15:54 IST

ठाण्यातील कोलशेत, बाळकुम खाडी किनारी खारफुटी नष्ट करुन त्यावर राडरोड्याचा भराव टाकून त्याठिकाणी अतिक्रमण केले जात असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते.

ठाणे : कोलशेत येथील खाडी किनारी कांदळवनाची कत्तल करुन भराव टाकण्यात आल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर त्या संदर्भात विधानसभेच्या अधिवेषनात आवाज उठविण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. आता महापालिकेने देखील या संदर्भात ठोस पावले उचलली असून कोलशेत आणि बाळकुम येथे खाडी किनारी टाकण्यात आलेला भराव काढून टाकण्यात येईल असे आश्वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

ठाण्यातील कोलशेत, बाळकुम खाडी किनारी खारफुटी नष्ट करुन त्यावर राडरोड्याचा भराव टाकून त्याठिकाणी अतिक्रमण केले जात असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने येथील भरावाच्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने चर मारले होते. तर या वृत्ताची दखल घेत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी खाडी किनारी भागातील भरावाची पाहाणी केली होती. तसेच या भरावाचा मुद्दा त्यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. याप्रकरणी चौकशी समिती नेमून कारवाई करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. यानंतर खडबडून जाग आलेल्या जिल्हा प्रशासनाने भरावाप्रकरणी कापुरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानंतर आता सोमवारी महापालिका आयुक्त राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी अधिकाºयांना काही महत्वाच्या सुचना केल्या आहेत. कोलशेत, बाळकूम परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीलगत कांदळवनावर भराव टाकण्यात आला आहे. या भागाची पाहणी केल्यानंतर तेथे मोठी वाहने जाऊ नयेत यासाठी चर खणण्यात आले आहेत. कांदळवनाच्या संवर्धनाबाबत फलक लावण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेनेही मोठी वाहने या भागात प्रवेश करू नयेत याची उंच वाहन अवरोधक बसवले आहेत. आता हा भराव काढून टाकण्याची कारवाई ठाणे महापालिका करणार आहे.

वन विभाग आणि महसूल विभाग यांच्याशीही येथील परिस्थितीबाबत पत्र व्यवहार करण्यात आला आहे. कांदळवनावरील हा भराव काढून टाकण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेने आक्रमक व्हावे. आपल्या कृतीतून या संवेदनशील विषयाबाबत महापालिकेची आक्रमक भूमिका दिसली पाहिजे. त्यासाठी येत्या तीन दिवसात आतापर्यंत झालेली कारवाई आणि पुढील तीन महिन्यात करायचा कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागास दिले.