शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

कोलशेत खाडी किनारी टाकलेला भराव महापालिका काढणार; महापालिका आयुक्त राव यांनी दिले निर्देश

By अजित मांडके | Updated: July 9, 2024 15:54 IST

ठाण्यातील कोलशेत, बाळकुम खाडी किनारी खारफुटी नष्ट करुन त्यावर राडरोड्याचा भराव टाकून त्याठिकाणी अतिक्रमण केले जात असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते.

ठाणे : कोलशेत येथील खाडी किनारी कांदळवनाची कत्तल करुन भराव टाकण्यात आल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर त्या संदर्भात विधानसभेच्या अधिवेषनात आवाज उठविण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. आता महापालिकेने देखील या संदर्भात ठोस पावले उचलली असून कोलशेत आणि बाळकुम येथे खाडी किनारी टाकण्यात आलेला भराव काढून टाकण्यात येईल असे आश्वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

ठाण्यातील कोलशेत, बाळकुम खाडी किनारी खारफुटी नष्ट करुन त्यावर राडरोड्याचा भराव टाकून त्याठिकाणी अतिक्रमण केले जात असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने येथील भरावाच्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने चर मारले होते. तर या वृत्ताची दखल घेत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी खाडी किनारी भागातील भरावाची पाहाणी केली होती. तसेच या भरावाचा मुद्दा त्यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. याप्रकरणी चौकशी समिती नेमून कारवाई करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. यानंतर खडबडून जाग आलेल्या जिल्हा प्रशासनाने भरावाप्रकरणी कापुरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानंतर आता सोमवारी महापालिका आयुक्त राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी अधिकाºयांना काही महत्वाच्या सुचना केल्या आहेत. कोलशेत, बाळकूम परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीलगत कांदळवनावर भराव टाकण्यात आला आहे. या भागाची पाहणी केल्यानंतर तेथे मोठी वाहने जाऊ नयेत यासाठी चर खणण्यात आले आहेत. कांदळवनाच्या संवर्धनाबाबत फलक लावण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेनेही मोठी वाहने या भागात प्रवेश करू नयेत याची उंच वाहन अवरोधक बसवले आहेत. आता हा भराव काढून टाकण्याची कारवाई ठाणे महापालिका करणार आहे.

वन विभाग आणि महसूल विभाग यांच्याशीही येथील परिस्थितीबाबत पत्र व्यवहार करण्यात आला आहे. कांदळवनावरील हा भराव काढून टाकण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेने आक्रमक व्हावे. आपल्या कृतीतून या संवेदनशील विषयाबाबत महापालिकेची आक्रमक भूमिका दिसली पाहिजे. त्यासाठी येत्या तीन दिवसात आतापर्यंत झालेली कारवाई आणि पुढील तीन महिन्यात करायचा कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागास दिले.