शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

रेल्वे स्थानकाच्या अरुंद मार्गातील बांधकामे पालिकेने हटविली; स्थगिती आदेश झुगारुन कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 19:57 IST

 पश्चिमेकडील रेल्वे स्थानक मार्गालगत बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गातील वाहतुकीचे नियोजन व्हावे, यासाठी तेथील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवरील न्यायालयीन स्थगिती पालिकेने झुगारुन ती जमिनदोस्त केली. 

भार्इंदर-  पश्चिमेकडील रेल्वे स्थानक मार्गालगत बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गातील वाहतुकीचे नियोजन व्हावे, यासाठी तेथील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवरील न्यायालयीन स्थगिती पालिकेने झुगारुन ती जमिनदोस्त केली. या कारवाईला शुक्रवारी रात्री सुरुवात करण्यात आली असली तरी रेल्वे प्रवाशांसह वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे ती शनिवारी पुर्ण करण्याचे ठरविण्यात आले.

पालिकेच्या विकास आराखड्यात हा रस्ता सुमारे १८ मीटर रुंद असल्याचे दर्शविण्यात आले होते. परंतु, रेल्वे स्थानकाला लागून असलेला रस्ता मात्र तेथील बांधकामांमुळे अरुंद झाला होता. ही बांधकामे हटविण्यासाठी पालिकेने काही वर्षांपुर्वी कारवाई सुरु केली होती. परंतु, तेथील एक मजली गुरु नामक बारचालकाने कारवाईवर न्यायालयीन स्थगिती मिळविली. त्यासमोर असलेले नारायण भुवन देखील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरु लागला होता. अखेर त्याला मोबदला देण्याचे आश्वासन दिल्यानंतर नारायण भुवन हॉटेलवर तोडक कारवाई करण्यात आली. परंतु, या हॉटेलमागे असलेल्या मिठागरामुळे जागा सीआरझेड बाधित ठरल्याने हॉटेलला वाढीव बांधकामासाठी पालिका जागा कशी काय देणार, हा संभ्रमावस्थेतील प्रश्न निर्माण झाल्याचे तेथील बाधित दुकानदारांकडुन सांगण्यात येत आहे.

दरम्यान पालिकेने काही महिन्यांपुर्वी पुर्व-पश्चिम वाहतुकीसाठी बांधलेल्या भुयारी वाहतुक मार्गाचे बांधकाम पुर्ण झाले आहे. तो वाहतुकीसाठी खुला करण्यापुर्वी या मार्गातुन पश्चिमेला येणारी वाहतुकीला अरुंद रस्त्याचा अडसर होऊन वाहतुक कोंडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. परंतु, रेल्वे स्थानकाला लागुन असलेल्या अरुंद मुख्य रस्त्यावरील बांधकामे हटविण्याची पाहणी अडचणीची ठरल्याने ४ सप्टेंबरला आ. नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यासह पालिकेच्या संबंधित वरीष्ठ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणीची पाहणी केली होती. त्यावेळी रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी सर्व बांधकामे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच ज्या बांधकामांवर न्यायालयीन स्थगिती आहे, अशा बांधकामांवरील स्थगिती आदेश हटविण्यासाठी पालिकेने न्यायालयाच्या निदर्शनास वस्तुस्थिती आणुन देण्याची सुचना आ. मेहता यांनी केली होती. परंतु, तेथील एक मजली गुरु नामक बारवर न्यायालयीन स्थगिती आदेश झुगारुन पालिकेने अखेर तो जमिनदोस्त केला. 

येथील सुमारे ४९ एकर जागेवर उच्च न्यायालयाने २००० मध्ये कोर्ट रिसिव्हर नियुक्त केला असताना न्यायालयासह नियुक्त कोर्ट रिसिव्हरच्या निदर्शनास कारवाईची बाब आणुन न देताच केलेली कारवाई वादातिक ठरण्याची शक्यता माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी वर्तविली आहे. तसेच न्यायालयीन स्थगिती आदेशही पायदळी तुडविल्याने पालिकेची कारवाई बेकायदेशीर ठरत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भुयारी मार्गातुन पश्चिमेकडे येणारी वाहतुक पुढे तेथील मीठागर मार्गे नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान व मुर्धाखाडीच्या प्रस्तावित मार्गावरुन वळविण्याचे निश्चित करण्यात आले होते. हा प्रस्तावित रस्ता सीआरझेड बाधित असल्याने तो पर्यावरणवादी धोरणात अडकल्याने पालिकेने त्या प्रस्तावित रस्त्याचा नाद सोडला.