शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

भिवंडीत रुग्णसंख्या वाढत असतांनाही सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्यास मनपा अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 19:30 IST

मागील वर्षी कोविड सेंटरवर केलेला कोट्यावधींचा खर्च वाया 

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. १५ ) भिवंडी शहरात दुसऱ्या करोना लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना सुसज्य आरोग्य यंत्रणा उभी करण्यात भिवंडी मनपा प्रशासनास अपयश आल्याने शहरातील गरीब रुग्णांनाही खाजगी रुग्णालयात महागडे उपचार घेण्याची वेळ आली आहे . विशेष म्हणजे पालिकेने मागील वर्षी पहिल्या करोना लाटेत कोट्यावधींचा खर्च करून उभारलेली आरोग्य यंत्रणा कार्यान्वित न करता धूळ खात पडून असल्याने पालिका प्रशासना कडून स्वतःचे अपयश झाकून ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे. मनपा प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभारावर नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. 

                कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतांनाही मनपाकडे आज फक्त १३३ बेडचे एकच कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. लाखोंची लोकसंख्या असतांनाही मनपाने केवळ एकच कोविड सेंटर सुरु ठेवल्याने नागरिकांकडून मनपा प्रशासनाच्या हलगर्जी कारभारविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. 

                भिवंडी शहरात मागच्या लाटेत सुरवातीला मृत्यूचे प्रमाण वाढले होते. मागील मे, जुन मध्ये मृत्यू दर देखील १२ % एवढा होता. रुग्णसंख्या व मृत्यूदरात वाढ झाल्याने मागील वर्षी शहरात स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात सर्व सोयी सुविधांसह कोविड रुग्णालय सुरु केले होते. त्याचबरोबर शहरात खुदाबक्ष हाॅल, टाटा आमंत्रण, रईस हायस्कूल व वऱ्हाळ देवी हाॅल येथे देखील सुसज्य कोविड सेंटर सुरू केले होते. या कोविड सेंटरच्या उभारणीसाठी त्यावेळी लाखो करोडोंचा खर्च मनपा प्रशासनाने केला होता. मात्र त्याचा फायदा झाल्याने शहरातील मृत्युदर अवघ्या ३ % पर्यंत खाली आला व रुग्ण बरे होण्याच्या अकड्यांमध्ये देखील रोज वाढ होत राहिली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सुरु केलेली ही सुसज्य यंत्रणा या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णासंख्या वाढत असतांना देखील धूळ खात पडली आहे. हे सर्व कोविड सेंटर आज बंद आहेत. त्यामुळे कोरोना वाढत असतांना देखील मनपा प्रशासन गाफील का आहे याचे नेमकी कारण स्पष्ट होत नाही. 

               एकीकडे ऑक्सीजन विना आज अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत असताना आयजीएम रुग्णालया बाहेर कोट्यवधी रुपयांचे ऑक्सीजन टॅंक फक्त काय शोभेसाठी लावले आहेत का असा सवाल देखील नागरिक उपस्थित करीत आहेत. आयजीएम रुग्णालयात ४५ व्हेंटिलेटर व टेली आयसीयू सारख्या अत्याधुनिक सुविधा असताना त्या यंत्रणा धूळखात ठेवून प्रशासन नक्की काय साध्य करत आहे असा सवाल देखील उपस्थित होत आहे. त्यातच मागील वर्षी करोना च्या पहिल्या लाटेत पालिकेने टाटा आमंत्रण येथील विलगिकरण सह भिवंडी शहरात खुदाबक्ष हॉल, रईस हायस्कुल ,वऱ्हाळ देवी हॉल असे मिळून तब्बल एक हजार बेड रुग्णांसाठी उपलब्ध ठेवले होते .परंतु नंतर ही सर्व यंत्रणा बंद केली व आता पुन्हा दुसऱ्या लाटेत फक्त खुदाबक्ष हॉल येथील केंद्र सुरू करून पालिका क्षेत्रा सह पालिका क्षेत्रा बाहेरील १८  खाजगी रुग्णालयात रुग्ण दाखल करण्याची सोय उपलब्ध केली आहे. मात्र या खासगी रुग्णालयांमध्ये सध्या बेड व ऑक्सीजन उपलब्ध नसल्याने रुग्णांची उपचारा विना तडफड सुरू झाली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने मागील वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून सुरु केलेली यंत्रणा पुन्हा सुरु करावी अशी मागणी जोर धरत आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस