शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
7
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
8
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
9
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
10
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
11
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
12
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
13
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
14
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
15
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
16
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
17
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
18
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
19
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
20
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना

महापालिका आयुक्तांनी देखील पोटनिवडणुका रद्द करण्याची केली निवडणूक आयोगास विनंती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 15:29 IST

पुढील वर्षी होणारी सार्वत्रिक निवडणूक आणि आचार संहिता आदी कारणे आयुक्तांनी नमूद केली आहेत. 

मीरारोड - भाईंदर व मीरारोड येथील दोन रिक्त जागां करिता होणाऱ्या पोटनिवडणुका रद्द करण्याची विनंती खुद्द महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना केली आहे . पालिकेवर पडणारा खर्चाचा बोजा , पुढील वर्षी होणारी सार्वत्रिक निवडणूक आणि आचार संहिता आदी कारणे आयुक्तांनी नमूद केली आहेत. 

भाईंदर पूर्व येथील शिवसेना नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर यांचे गेल्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले तर मीरारोड मधील काँग्रेस नगरसेविका उमा सपार यांचे काही महिन्या पूर्वी आजारपणा मुळे निधन झाले असल्याने ह्या ४ नगरसेवकांच्या प्रभागातील प्रत्येकी १ जागा रिक्त झाली. 

पुढील वर्षी ऑगस्ट मध्ये महापालिकेची मुदत संपणार असल्याने त्या आधी सार्वत्रिक निवडणुका घ्याव्या लागणार आहेत . तसे असताना निवडणूक आयोगाने ह्या दोन जागां साठी पोटनिवडणूकच्या अनुषंगाने मतदार यादी व मतदान केंद्र अंतिम करण्यासाठी आदेश दिल्याने पालिका कामाला लागली आहे. 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आधीच आचार संहिते मुळे कामांवर होणारा परिणाम आणि अत्यल्प काळासाठी नगरसेवक पद राहणार असल्याने पोटनिवडणुकीला विरोध करत ती रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगास केली आहे. तर आता खुद्द महापालिका आयुक्तांनीच निवडणूक आयोगाला पोटनिवडणूक रद्द करण्याचे साकडे घातले आहे . 

मीरा भाईंदर महानगरपालिकेची मुदत २७ ऑगस्ट २०२२ रोजी संपत असून फक्त ९ महिने राहिले आहेत. सध्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून त्या नंतर निवडणूक कार्यक्रम घोषीत होईल जो साधारण २५ ते ३० दिवसांचा असेल. सार्वत्रिक निवडणूकीकरीता जवळपास दिड ते दोन महिने कालावधी हा आचारसंहितामध्ये जाणार आहे.सध्या महानगरपालिकेमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दती असल्याने प्रभागाती ल एक सदस्याची जागा जरी रिक्त झाली तरी अन्य उर्वरीत ३ सदस्य संबंधित प्रभागातील जनतेचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने प्रभागातील नागरीकांची गैरसोय होत नाही.

नजिकच्या काळात सार्वत्रिक निवडणूक येऊ घातल्याने पुन्हा अतिशय कमी कालावधी करीता होणाऱ्या पोटनिवडणुकीकरीता महानगरपालिकेचा निवडणुकीवरील खर्च अनाठायी होणार आहे . तसेच कोविड विषाणूचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपला नसल्याने कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करता पोटनिवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात यावा असे पालिकेचे मत असल्याचे आयुक्त ढोले यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक