शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील वऱ्हाळ तलावाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ; तलावावर पसरला हिरवा तवंग , कुजक्या दुर्गंधीने नागरीक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 15:31 IST

Bhiwandi News : भिवंडी शहराचा ऐतिहासिक वारसा त्याचबरोबर शहराच्या पर्यटनदृष्टीने त्याचबरोबर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या शहरातील वऱ्हाळादेवी तलावावर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग पसरला असून तलावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे

नितिन पंडीत  - 

भिवंडी - भिवंडी शहराचा ऐतिहासिक वारसा त्याचबरोबर शहराच्या पर्यटनदृष्टीने त्याचबरोबर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या शहरातील वऱ्हाळादेवी तलावावर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग पसरला असून तलावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे मनपा आयुक्त निवासाबरोबरच माजी उपमहापौर तसेच नगरसेवकांच्या घराशेजारी असलेल्या या तलावाकडे लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष झाले आहे . विशेष म्हणजे तलावात पसरलेल्या हिरव्या तवंगामुळे व कचऱ्यामुळे तलाव परिसरात पसरलेल्या कुजक्या दुर्गंधीमुळे कामतघर , वऱ्हाळादेवी नगर , फेणे गाव व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे या तलावातून शहरातील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील केला जात आहे . मात्र आता या तलावात पसरलेल्या दुर्गंधीमुले शहरातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे या तलावाच्या बाजूला खेळाचे मैदान व मनशांती साठी मनपा प्रशासनाने पीस पार्क बनविला असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक व महिला येत असतात . मात्र आता येथे पसरलेल्या दुर्गंधीने नागरिकांनी येथे येण्यासाठी पाठ फिरवली आहे.  

 भिवंडी शहरातील जुन्या नागरी वस्तीत नगरपरिषद असल्या पासून या तलावातून शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या या वऱ्हाळ तलावांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याने याठिकाणी कपडे धुणे, वाहन धुणे हे नेहमीचे झाले आहे . काही वर्षांपूर्वी या तलावाच्या सुशोभीकरणासाठी महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च देखील केला आहे . मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांसह सुज्ञ नागरिकांनी वेळोवेळी केला आहे मात्र मनपा प्रशासनाने नागरिकांच्या कोणत्याही तक्रारीची दाखल घेतली नाही . कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील या तलावाची अवस्था बिकट झाली असल्याने कामतघर परिसरातील नागरीक हैराण झाले आहेत. या तलावातून जुन्या भिवंडी शहरातील मंडई, गौरी पाडा ,वाणी आळी, ब्राह्मण आळी ,सौदागर मोहल्ला ,तांडेल मोहल्ला या भागात दररोज २ एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे . त्यातच कोट्यवधींचा खर्च करून या तलावात ठिकठिकाणी विसर्जन घाट बांधण्यात आले आहेत . मात्र सध्या या विसर्जन घाटांची दुरवस्था झाल्याने या विसर्जन घाटासाठी अडविलेल्या पाण्यातील प्रदूषण सर्वदूर पाण्यात पसरल्याने सुमारे ८ एकर क्षेत्रफळातील या तलावाच्या पाण्यावर हिरवा तेलकट तरंग साचला असून या तलावातील पाण्याला उग्र दर्प येत आहे. 

 विशेष म्हणजे दुर्गंधी पसरलेल्या या तलावाच्या भागातच महापालिका प्रशासनाने कोविड प्रतिबंधित लस टोचण्यासाठी तसेच कोविड तपासणी केंद्र स्थापन केले आहे. त्यामुळे येथे नेहमीच नागरिक व अत्यावश्यक सेवेतील कामगार लस टोचण्यासाठी व रक्त तपासणीसाठी येत आहेत . मात्र तलावाच्या पसरलेल्या दुर्गंधीमुळे येथील वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसह नागरिकांना दुर्गंधीचा मोठा सामना करावा लागत असून परिसरातील नागरिकांना येथील दुर्गंधीमुळे भविष्यात आजार निर्माण होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र एवढे सर्व घडूनही महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष कधी देणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात येत आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वीच या तलावाच्या दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने कोट्यवधींचा खर्च केला असून आता या हिरव्या तवंग व दुर्गंधीच्या आड मनपा प्रशासनातील भ्रष्ट मनोवृत्ती पुन्हा तलाव सुशोभीकरणाच्या व सफाईचा नावाखाली स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पुन्हा या तलावाच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून स्वतःचे खिशे भरण्याची वाट तर पाहत नाहीत ना असा सवाल येथील स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

 दरम्यान मागील दहा बारा वर्षांपूर्वी मनपा प्रशासनाने या तलावाच्या सुशोभीकरणासाठी सुमारे आठ ते दहा कोटींचा खर्च केला आहे ज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे , आम्ही येथील स्तहनिक नागरिक आहोत आम्हला मनपाच्या भ्रष्टाचाराशी काही देणे घेणे नाही मात्र आता या तलावाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे व येथे पसरलेल्या दुर्गंधीमुळे आम्ही फार हैराण झालो आहोत , मागील एक डिड महिन्यांपासून आम्हाला हा त्रास होत आहे मात्र अनेक तक्रारी करूनही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे . येत्या सात दिवसांच्या आत या तलावाची साफ सफाई झाली नाही तर आम्ही मनपा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन व उपोषण करू अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक रहिवासी ऍड मुकेश नवगिरे यांनी दिली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी