शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
3
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
4
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
5
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
6
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
7
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
8
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
9
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
10
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
11
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
13
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
14
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
15
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
16
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
17
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
19
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
20
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   

भिवंडीतील वऱ्हाळ तलावाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ; तलावावर पसरला हिरवा तवंग , कुजक्या दुर्गंधीने नागरीक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 15:31 IST

Bhiwandi News : भिवंडी शहराचा ऐतिहासिक वारसा त्याचबरोबर शहराच्या पर्यटनदृष्टीने त्याचबरोबर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या शहरातील वऱ्हाळादेवी तलावावर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग पसरला असून तलावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे

नितिन पंडीत  - 

भिवंडी - भिवंडी शहराचा ऐतिहासिक वारसा त्याचबरोबर शहराच्या पर्यटनदृष्टीने त्याचबरोबर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या शहरातील वऱ्हाळादेवी तलावावर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग पसरला असून तलावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे मनपा आयुक्त निवासाबरोबरच माजी उपमहापौर तसेच नगरसेवकांच्या घराशेजारी असलेल्या या तलावाकडे लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष झाले आहे . विशेष म्हणजे तलावात पसरलेल्या हिरव्या तवंगामुळे व कचऱ्यामुळे तलाव परिसरात पसरलेल्या कुजक्या दुर्गंधीमुळे कामतघर , वऱ्हाळादेवी नगर , फेणे गाव व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे या तलावातून शहरातील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील केला जात आहे . मात्र आता या तलावात पसरलेल्या दुर्गंधीमुले शहरातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे या तलावाच्या बाजूला खेळाचे मैदान व मनशांती साठी मनपा प्रशासनाने पीस पार्क बनविला असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक व महिला येत असतात . मात्र आता येथे पसरलेल्या दुर्गंधीने नागरिकांनी येथे येण्यासाठी पाठ फिरवली आहे.  

 भिवंडी शहरातील जुन्या नागरी वस्तीत नगरपरिषद असल्या पासून या तलावातून शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या या वऱ्हाळ तलावांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याने याठिकाणी कपडे धुणे, वाहन धुणे हे नेहमीचे झाले आहे . काही वर्षांपूर्वी या तलावाच्या सुशोभीकरणासाठी महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च देखील केला आहे . मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांसह सुज्ञ नागरिकांनी वेळोवेळी केला आहे मात्र मनपा प्रशासनाने नागरिकांच्या कोणत्याही तक्रारीची दाखल घेतली नाही . कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील या तलावाची अवस्था बिकट झाली असल्याने कामतघर परिसरातील नागरीक हैराण झाले आहेत. या तलावातून जुन्या भिवंडी शहरातील मंडई, गौरी पाडा ,वाणी आळी, ब्राह्मण आळी ,सौदागर मोहल्ला ,तांडेल मोहल्ला या भागात दररोज २ एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे . त्यातच कोट्यवधींचा खर्च करून या तलावात ठिकठिकाणी विसर्जन घाट बांधण्यात आले आहेत . मात्र सध्या या विसर्जन घाटांची दुरवस्था झाल्याने या विसर्जन घाटासाठी अडविलेल्या पाण्यातील प्रदूषण सर्वदूर पाण्यात पसरल्याने सुमारे ८ एकर क्षेत्रफळातील या तलावाच्या पाण्यावर हिरवा तेलकट तरंग साचला असून या तलावातील पाण्याला उग्र दर्प येत आहे. 

 विशेष म्हणजे दुर्गंधी पसरलेल्या या तलावाच्या भागातच महापालिका प्रशासनाने कोविड प्रतिबंधित लस टोचण्यासाठी तसेच कोविड तपासणी केंद्र स्थापन केले आहे. त्यामुळे येथे नेहमीच नागरिक व अत्यावश्यक सेवेतील कामगार लस टोचण्यासाठी व रक्त तपासणीसाठी येत आहेत . मात्र तलावाच्या पसरलेल्या दुर्गंधीमुळे येथील वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसह नागरिकांना दुर्गंधीचा मोठा सामना करावा लागत असून परिसरातील नागरिकांना येथील दुर्गंधीमुळे भविष्यात आजार निर्माण होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र एवढे सर्व घडूनही महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष कधी देणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात येत आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वीच या तलावाच्या दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने कोट्यवधींचा खर्च केला असून आता या हिरव्या तवंग व दुर्गंधीच्या आड मनपा प्रशासनातील भ्रष्ट मनोवृत्ती पुन्हा तलाव सुशोभीकरणाच्या व सफाईचा नावाखाली स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पुन्हा या तलावाच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून स्वतःचे खिशे भरण्याची वाट तर पाहत नाहीत ना असा सवाल येथील स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

 दरम्यान मागील दहा बारा वर्षांपूर्वी मनपा प्रशासनाने या तलावाच्या सुशोभीकरणासाठी सुमारे आठ ते दहा कोटींचा खर्च केला आहे ज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे , आम्ही येथील स्तहनिक नागरिक आहोत आम्हला मनपाच्या भ्रष्टाचाराशी काही देणे घेणे नाही मात्र आता या तलावाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे व येथे पसरलेल्या दुर्गंधीमुळे आम्ही फार हैराण झालो आहोत , मागील एक डिड महिन्यांपासून आम्हाला हा त्रास होत आहे मात्र अनेक तक्रारी करूनही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे . येत्या सात दिवसांच्या आत या तलावाची साफ सफाई झाली नाही तर आम्ही मनपा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन व उपोषण करू अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक रहिवासी ऍड मुकेश नवगिरे यांनी दिली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी