शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
4
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
5
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
6
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
7
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
8
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
9
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
10
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
11
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
12
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
13
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
14
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
15
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
16
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
17
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
18
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
19
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
20
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

भिवंडीतील वऱ्हाळ तलावाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ; तलावावर पसरला हिरवा तवंग , कुजक्या दुर्गंधीने नागरीक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 15:31 IST

Bhiwandi News : भिवंडी शहराचा ऐतिहासिक वारसा त्याचबरोबर शहराच्या पर्यटनदृष्टीने त्याचबरोबर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या शहरातील वऱ्हाळादेवी तलावावर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग पसरला असून तलावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे

नितिन पंडीत  - 

भिवंडी - भिवंडी शहराचा ऐतिहासिक वारसा त्याचबरोबर शहराच्या पर्यटनदृष्टीने त्याचबरोबर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या शहरातील वऱ्हाळादेवी तलावावर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग पसरला असून तलावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे मनपा आयुक्त निवासाबरोबरच माजी उपमहापौर तसेच नगरसेवकांच्या घराशेजारी असलेल्या या तलावाकडे लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष झाले आहे . विशेष म्हणजे तलावात पसरलेल्या हिरव्या तवंगामुळे व कचऱ्यामुळे तलाव परिसरात पसरलेल्या कुजक्या दुर्गंधीमुळे कामतघर , वऱ्हाळादेवी नगर , फेणे गाव व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे या तलावातून शहरातील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील केला जात आहे . मात्र आता या तलावात पसरलेल्या दुर्गंधीमुले शहरातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे या तलावाच्या बाजूला खेळाचे मैदान व मनशांती साठी मनपा प्रशासनाने पीस पार्क बनविला असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक व महिला येत असतात . मात्र आता येथे पसरलेल्या दुर्गंधीने नागरिकांनी येथे येण्यासाठी पाठ फिरवली आहे.  

 भिवंडी शहरातील जुन्या नागरी वस्तीत नगरपरिषद असल्या पासून या तलावातून शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या या वऱ्हाळ तलावांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याने याठिकाणी कपडे धुणे, वाहन धुणे हे नेहमीचे झाले आहे . काही वर्षांपूर्वी या तलावाच्या सुशोभीकरणासाठी महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च देखील केला आहे . मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांसह सुज्ञ नागरिकांनी वेळोवेळी केला आहे मात्र मनपा प्रशासनाने नागरिकांच्या कोणत्याही तक्रारीची दाखल घेतली नाही . कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील या तलावाची अवस्था बिकट झाली असल्याने कामतघर परिसरातील नागरीक हैराण झाले आहेत. या तलावातून जुन्या भिवंडी शहरातील मंडई, गौरी पाडा ,वाणी आळी, ब्राह्मण आळी ,सौदागर मोहल्ला ,तांडेल मोहल्ला या भागात दररोज २ एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे . त्यातच कोट्यवधींचा खर्च करून या तलावात ठिकठिकाणी विसर्जन घाट बांधण्यात आले आहेत . मात्र सध्या या विसर्जन घाटांची दुरवस्था झाल्याने या विसर्जन घाटासाठी अडविलेल्या पाण्यातील प्रदूषण सर्वदूर पाण्यात पसरल्याने सुमारे ८ एकर क्षेत्रफळातील या तलावाच्या पाण्यावर हिरवा तेलकट तरंग साचला असून या तलावातील पाण्याला उग्र दर्प येत आहे. 

 विशेष म्हणजे दुर्गंधी पसरलेल्या या तलावाच्या भागातच महापालिका प्रशासनाने कोविड प्रतिबंधित लस टोचण्यासाठी तसेच कोविड तपासणी केंद्र स्थापन केले आहे. त्यामुळे येथे नेहमीच नागरिक व अत्यावश्यक सेवेतील कामगार लस टोचण्यासाठी व रक्त तपासणीसाठी येत आहेत . मात्र तलावाच्या पसरलेल्या दुर्गंधीमुळे येथील वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसह नागरिकांना दुर्गंधीचा मोठा सामना करावा लागत असून परिसरातील नागरिकांना येथील दुर्गंधीमुळे भविष्यात आजार निर्माण होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र एवढे सर्व घडूनही महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष कधी देणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात येत आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वीच या तलावाच्या दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने कोट्यवधींचा खर्च केला असून आता या हिरव्या तवंग व दुर्गंधीच्या आड मनपा प्रशासनातील भ्रष्ट मनोवृत्ती पुन्हा तलाव सुशोभीकरणाच्या व सफाईचा नावाखाली स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पुन्हा या तलावाच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून स्वतःचे खिशे भरण्याची वाट तर पाहत नाहीत ना असा सवाल येथील स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

 दरम्यान मागील दहा बारा वर्षांपूर्वी मनपा प्रशासनाने या तलावाच्या सुशोभीकरणासाठी सुमारे आठ ते दहा कोटींचा खर्च केला आहे ज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे , आम्ही येथील स्तहनिक नागरिक आहोत आम्हला मनपाच्या भ्रष्टाचाराशी काही देणे घेणे नाही मात्र आता या तलावाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे व येथे पसरलेल्या दुर्गंधीमुळे आम्ही फार हैराण झालो आहोत , मागील एक डिड महिन्यांपासून आम्हाला हा त्रास होत आहे मात्र अनेक तक्रारी करूनही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे . येत्या सात दिवसांच्या आत या तलावाची साफ सफाई झाली नाही तर आम्ही मनपा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन व उपोषण करू अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक रहिवासी ऍड मुकेश नवगिरे यांनी दिली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी