शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

भिवंडीतील वऱ्हाळ तलावाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ; तलावावर पसरला हिरवा तवंग , कुजक्या दुर्गंधीने नागरीक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 15:31 IST

Bhiwandi News : भिवंडी शहराचा ऐतिहासिक वारसा त्याचबरोबर शहराच्या पर्यटनदृष्टीने त्याचबरोबर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या शहरातील वऱ्हाळादेवी तलावावर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग पसरला असून तलावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे

नितिन पंडीत  - 

भिवंडी - भिवंडी शहराचा ऐतिहासिक वारसा त्याचबरोबर शहराच्या पर्यटनदृष्टीने त्याचबरोबर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या शहरातील वऱ्हाळादेवी तलावावर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग पसरला असून तलावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे मनपा आयुक्त निवासाबरोबरच माजी उपमहापौर तसेच नगरसेवकांच्या घराशेजारी असलेल्या या तलावाकडे लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाचे पुरता दुर्लक्ष झाले आहे . विशेष म्हणजे तलावात पसरलेल्या हिरव्या तवंगामुळे व कचऱ्यामुळे तलाव परिसरात पसरलेल्या कुजक्या दुर्गंधीमुळे कामतघर , वऱ्हाळादेवी नगर , फेणे गाव व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे या तलावातून शहरातील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील केला जात आहे . मात्र आता या तलावात पसरलेल्या दुर्गंधीमुले शहरातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे या तलावाच्या बाजूला खेळाचे मैदान व मनशांती साठी मनपा प्रशासनाने पीस पार्क बनविला असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक व महिला येत असतात . मात्र आता येथे पसरलेल्या दुर्गंधीने नागरिकांनी येथे येण्यासाठी पाठ फिरवली आहे.  

 भिवंडी शहरातील जुन्या नागरी वस्तीत नगरपरिषद असल्या पासून या तलावातून शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या या वऱ्हाळ तलावांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याने याठिकाणी कपडे धुणे, वाहन धुणे हे नेहमीचे झाले आहे . काही वर्षांपूर्वी या तलावाच्या सुशोभीकरणासाठी महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च देखील केला आहे . मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांसह सुज्ञ नागरिकांनी वेळोवेळी केला आहे मात्र मनपा प्रशासनाने नागरिकांच्या कोणत्याही तक्रारीची दाखल घेतली नाही . कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील या तलावाची अवस्था बिकट झाली असल्याने कामतघर परिसरातील नागरीक हैराण झाले आहेत. या तलावातून जुन्या भिवंडी शहरातील मंडई, गौरी पाडा ,वाणी आळी, ब्राह्मण आळी ,सौदागर मोहल्ला ,तांडेल मोहल्ला या भागात दररोज २ एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे . त्यातच कोट्यवधींचा खर्च करून या तलावात ठिकठिकाणी विसर्जन घाट बांधण्यात आले आहेत . मात्र सध्या या विसर्जन घाटांची दुरवस्था झाल्याने या विसर्जन घाटासाठी अडविलेल्या पाण्यातील प्रदूषण सर्वदूर पाण्यात पसरल्याने सुमारे ८ एकर क्षेत्रफळातील या तलावाच्या पाण्यावर हिरवा तेलकट तरंग साचला असून या तलावातील पाण्याला उग्र दर्प येत आहे. 

 विशेष म्हणजे दुर्गंधी पसरलेल्या या तलावाच्या भागातच महापालिका प्रशासनाने कोविड प्रतिबंधित लस टोचण्यासाठी तसेच कोविड तपासणी केंद्र स्थापन केले आहे. त्यामुळे येथे नेहमीच नागरिक व अत्यावश्यक सेवेतील कामगार लस टोचण्यासाठी व रक्त तपासणीसाठी येत आहेत . मात्र तलावाच्या पसरलेल्या दुर्गंधीमुळे येथील वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसह नागरिकांना दुर्गंधीचा मोठा सामना करावा लागत असून परिसरातील नागरिकांना येथील दुर्गंधीमुळे भविष्यात आजार निर्माण होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र एवढे सर्व घडूनही महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष कधी देणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात येत आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वीच या तलावाच्या दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने कोट्यवधींचा खर्च केला असून आता या हिरव्या तवंग व दुर्गंधीच्या आड मनपा प्रशासनातील भ्रष्ट मनोवृत्ती पुन्हा तलाव सुशोभीकरणाच्या व सफाईचा नावाखाली स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पुन्हा या तलावाच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून स्वतःचे खिशे भरण्याची वाट तर पाहत नाहीत ना असा सवाल येथील स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

 दरम्यान मागील दहा बारा वर्षांपूर्वी मनपा प्रशासनाने या तलावाच्या सुशोभीकरणासाठी सुमारे आठ ते दहा कोटींचा खर्च केला आहे ज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे , आम्ही येथील स्तहनिक नागरिक आहोत आम्हला मनपाच्या भ्रष्टाचाराशी काही देणे घेणे नाही मात्र आता या तलावाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे व येथे पसरलेल्या दुर्गंधीमुळे आम्ही फार हैराण झालो आहोत , मागील एक डिड महिन्यांपासून आम्हाला हा त्रास होत आहे मात्र अनेक तक्रारी करूनही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे . येत्या सात दिवसांच्या आत या तलावाची साफ सफाई झाली नाही तर आम्ही मनपा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन व उपोषण करू अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक रहिवासी ऍड मुकेश नवगिरे यांनी दिली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी