शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कल्याण एसटी कर्मचा-यांचे सरकारच्या निषेधार्थ मुंडन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 06:10 IST

सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कर्मचा-यांचा राज्यव्यापी संप सुरु आहे. या संपाचा गुरूवारी तिसरा दिवस होता. कल्याण बस डेपोत शंभर टक्के बंद पाळला गेला.

कल्याण : सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कर्मचा-यांचा राज्यव्यापी संप सुरु आहे. या संपाचा गुरूवारी तिसरा दिवस होता. कल्याण बस डेपोत शंभर टक्के बंद पाळला गेला. संपाबाबत तिस-या दिवशीही काही तोडगा निघाला नसल्याने कामगारांची दिवाळी अंधारात लोटणा-या राज्य सरकारच्या निषेधार्थ डेपोतील वाहकचालकांनी मुंडन केले. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात महिला वाहकही सहभागी झाल्या आहेत.यावेळी कर्मचा-यांनी खिशातून चिल्लर काढून जमा केली. कर्मचा-यांचे दिवाळे काढणा-या सरकारला ही चिल्लर भेट म्हणून दिली जाणार आहे. संप तिस-या दिवशी मिटणार, अशी आशा प्रवाशांना असल्याने डेपोत काही प्रवासी बसच्या प्रतीक्षेत होते. डेपोतील उद्घोषणा कक्षात कोणी नव्हते. डेपोत एक पोलीस व्हॅन तैनात करण्यात आली आहे. डेपोतील पोलीस चौकीत एरव्ही पोलीस नसतात. मात्र गुरूवारी चौकीत पोलीस होते.दिवाळीसारख्या मोठ्या सणाला हा संप सुरु झाला. हा संप मिटविण्याची मानसिकता सरकारची नाही. संपामुळे कर्मचाºयांची दिवाळी अंधारात आहे. कर्मचारी संघटनांनी अनेक वेळा संपाचे हत्यार उपसले. त्यांच्यासोबत केवळ चर्चेचे आश्वासन दिले, पण काही चर्चा केली नाही. संप थोपविण्याचे काम केले गेले. संपकरी कर्मचाºयांनी डेपोत मुक्काम ठोकला आहे. डेपो व्यवस्थापनाने बुधवारी विश्रामगृहाला टाळे ठोकून कर्मचाºयांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न कर्मचाºयांनी हाणून पाडला. टाळे तोडले. आता प्रशासनाने विश्रामगृहाची वीज व पाणीपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे कर्मचाºयांनी डेपोतील वडाच्या झाडाखाली सावलीत ठाण मांडले आहे. मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी कामगारांची भेट घेऊन त्यांच्या मुंडन व संप आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.कामगारांना कामावर हजर होण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. कामगार हजर न झाल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करुन दिवसाला २०० रुपये दंड आकारला जाईल असी नोटीस व्यवस्थापनाकडून बजाविण्यात आली होती. प्रशासनाने हा संप बेकायदा ठरविला असला तरी उच्च न्यायालयाने संप बेकायदा नसल्याचे म्हटले आहे, अशी माहिती मनसेचे एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी महादेव म्हस्के यांनी दिली.कर्मचाºयांच्या पगारवाढीचा करार २०१२ साली करण्यात आला. त्यानंतर तीन वर्षांनी अर्थात २०१६ साली दुसरा पगारवाढीचा करार होणे अपेक्षित होते. मान्यताप्राप्त संघटना व अन्य कामगार संघटनांनात एकवाक्यता नसल्याचे कारण पुढे करीत सरकारने पगारवाढीचा करारच केलेला नाही. कामगारांना ५२ टक्के पगारवाढ हवी आहे. सरकारशी चर्चा केल्यावर सरकारने केवळ १० टक्केच पगारवाढ देण्यास तयारी दर्शविली. संघटनांनी त्याला नकार दिला. १० टक्केनुसार एक हजारामागे शंभर रुपये पगार वाढेल.राबवून घेता, पण सुरक्षेचे काय?५२ टक्के पगार वाढ दिल्यास एका कामगाराला किमान सात हजार पगारवाढ मिळू शकते. तेलंगणा, राजस्थान येथील राज्य परिवहनचे कर्मचारी सरकारी कर्मचाºयांच्या पगाराऐवढा पगार घेतात. आपल्याकडे एसटी कर्मचाºयांना इतर भत्त्यांसोबत आपतकालीन भत्ता हा मूळ वेतनाच्या १.०८ टक्के इतकाच दिला जातो.इतक्या कमी वेतनात राबवून घेतले जाते. तसेच कामगारांच्या सुरक्षितेविषयी काहीही धोरण नाही. भिवंडीत एका रिक्षा चालकाने केलेल्या मारहाणीत बस चालकाचा मृत्यू झाला. पण प्रशासनाकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत, यासारख्या विविध विषयांकडे संघटनांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संप