शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या खाजगीकरणाविरोधात आज मुंब्रा, कळव्यात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:53 IST

टोरंट कंपनीला विरोध : ठाण्यात काढणार सर्वपक्षीय मोर्चा

ठाणे : टोरंट कंपनीविरोधात शनिवारी कळवा, खारीगाव, पारसिकनगर, मुंब्रा, दिवा, शीळ, देसाईगाव येथे बंदची हाक देऊन पारसिकनगर ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष या मोर्चासाठी आग्रही असले तरी येथील बऱ्याच नागरिकांना सुरळीत वीज मिळणार असेल, तर हे खाजगीकरण आवश्यक वाटत आहे. कळवा-मुंब्य्रात राष्ट्रवादीचे नगरसेवक जास्त असून आगामी निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीमध्ये या मोर्चाबाबत शंका उपस्थित होत आहे.

वीजवितरण व वीजबिलवसुलीसाठी टोरंट या खाजगी कंपनीला राज्य शासनाने कंत्राट दिले आहे. २६ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. या कंपनीमुळे सर्वसामान्य ग्राहकाला वीजबिलाचा मोठा भुर्दंड बसणार असून शासनाच्या महसुलातही मोठ्या प्रमाणात तूट येणार आहे. भिवंडी शहरातील टोरंट या कंपनीच्या कारभाराचा वाईट अनुभव असल्याने कळवा, खारीगाव, पारसिकनगर, मुंब्रा, दिवा, शीळ, दिवागाव, देसाई आणि परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी समन्वय समिती स्थापन केली आहे. तिच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत या परिसरात बंद पाळण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता याविरोधात पारसिक बँकेच्या मुख्य कार्यालय येथील ९० फूट रोड ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. तो शांततेत काढावा व कायदा सुव्यवस्था राखावी, असे आवाहन दशरथ पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी हा मोर्चा लक्षात घेऊन त्याच्या मार्गातील वाहतुकीत बदल केला आहे. मुंब्रा बायपास तसेच मुंब्रा परिसरातून खारेगाव-कळवा रोडमार्गे शिवाजी चौकाकडे येणाºया सर्व वाहनांना पारसिक रेतीबंदर रोड येथे प्रवेशबंदी करून ती सरळ खारेगाव टोलनाकामार्गे पुढे नेण्याबाबत पर्यायी मार्ग सुचवला आहे. याव्यतिरिक्त आणखी आवश्यक बदल केल्याचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.कडेकोट बंदोबस्तमोर्चात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून साध्या वेशातील पोलीसही तैनात राहणार आहेत. हा मोर्चा सर्वपक्षीय असल्याने त्यास मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे.ठाणे ग्रामीण पोलीस अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ३० जानेवारी रोजी रात्री १२ पर्यंत कुठल्याही प्रकारची शस्त्रे बाळगण्यास तसेच पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन, तसेच विविध आंदोलने लक्षात घेऊन हा आदेश जारी केला आहे.रिक्षा बंदबाबत निर्णय नाहीरात्री उशिरापर्यंत बंदला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय येथील प्रमुख रिक्षा संघटनेने घेतला नव्हता. रिक्षा चालू ठेवायची की बंद, याचा वैयक्तिक निर्णय घेण्याची मुभा रिक्षाचालकांना देण्यात आली आहे, अशी माहिती न्यू मुंब्रा आॅटो रिक्षा युनियनचे सचिव बाळासाहेब मुळीक यांनी दिली.

टॅग्स :electricityवीज