शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच मुंब्रा उड्डाणपूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:43 IST

ठाणे/मुंब्रा : येथील मुंब्रा-शीळ-कल्याण आणि ऐरोलीला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम ५० टक्क्यांच्या आसपास पूर्ण झाले आहे. मात्र, हा पूल आताच ...

ठाणे/मुंब्रा : येथील मुंब्रा-शीळ-कल्याण आणि ऐरोलीला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम ५० टक्क्यांच्या आसपास पूर्ण झाले आहे. मात्र, हा पूल आताच धोकादायक झाला असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप शनिवारी सकाळी ठाणे महापालिका विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केला.

शनिवारी या पुलाची पाहणी करून त्यांनी ही बाब उघडकीस आणली. मुंब्रा-शीळ-कल्याण आणि ऐरोलीला परिसरातील वाहतूककोंडी दूर होण्याच्या उद्देशाने मुंब्रा वाय जंक्शन येथे एमएमआरडीए उड्डाणपूल बांधत आहे. त्याच्या बांधकामाची पठाण यांच्यासह विक्रम खामकर, साकिब दाते यांनी पाहणी केली. बांधकामात वापरण्यात येत असलेल्या सळई अत्यंत कमकुवत असून, त्यांना रसायनांचा लेप लावला जात नाही. त्यामुळे या सळईंना गंज लागून त्या आतच तुटण्याची शक्यता आहे. त्याशिवाय बांधकाम साहित्यही अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने हा पूल पूर्ण होण्याआधीच धोकादायक झाला असून, त्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे मुंबईत जशी पूल कोसळण्याची घटना घडली, तशी येथेही घडण्याची दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम सुरू असतानाच अशी अवस्था असेल तर हा पूल दहा वर्षे तरी टिकेल का? या पुलावरून अवजड वाहतूक होणार आहे. मात्र, स्वत:च्या फायद्यासाठी ठेकेदाराने जाणीवपूर्वक निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून जनतेच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार केला आहे. या विरोधात आपण एमएमआयडीए, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे लेखी तक्रार करून एसएनसी या ठेकेदारावर कारवाईची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.