शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा कचरा आता अंबरनाथमध्ये

By admin | Updated: March 27, 2016 02:22 IST

यापुढे डम्पिंग ग्राउंडसाठी कोणत्याही पालिकेला जागा दिली जाणार नाही, अशी मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेत विरते न् विरते तोच मुंबईत देवनार डम्पिंग ग्राउंडला लागणाऱ्या आगीमुळे

- पंकज पाटील,  अंबरनाथ यापुढे डम्पिंग ग्राउंडसाठी कोणत्याही पालिकेला जागा दिली जाणार नाही, अशी मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेत विरते न् विरते तोच मुंबईत देवनार डम्पिंग ग्राउंडला लागणाऱ्या आगीमुळे अंबरनाथ तालुक्यातील करवले गावाजवळील १०० एकर जागा मुंबई पालिकेला देण्याचा तडकाफडकी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या जागेचा आगाऊ ताबाही अंबरनाथच्या तहसीलदारांनी दिला आहे. त्यामुळे मुंबईच्या कचऱ्यासाठी मुंबईबाहेर मोठी जागा उपलब्ध झाली असली, तरी आधीच तळोजा डम्पिंगला विरोध करणाऱ्यांच्या विरोधाची धार वाढली आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लावण्याचे मोठे आव्हान यंत्रणांपुढे उभे ठाकले आहे. मुंबईचे डम्पिंग ग्राउंड स्थलांतरित करण्यासाठी त्या पालिकेने अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावाजवळील करवले परिसरातील १०० एकर जागा राज्य शासनाकडे मागितली होती. स्थानिक ग्रामस्थांच्या सूचना आणि हरकती न घेताच राज्य सरकारने येथील जागा कचरा प्रक्रियेसाठी देऊन टाकली. या जागेची मोजणी करून त्याचा आगाऊ ताबा मुंबई महापालिकेला देण्याचे आदेश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार, या जागेची पाहणी करून आणि बाधित कुटुंबांची माहिती घेऊन ती जागा मुंबई महापालिकेला देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदारांना दिले. या जागेवर ८० कुटुंबे असून ५१आदिवासी कुटुंबे बाधित होत असल्याचे तहसीलदारांनी केलेल्या पाहणीत लक्षात आले. त्यांच्या पुनर्वसनाचा कोणताही विचार न करता थेट ही जागा मुंबई महापालिकेला देण्यातही आली आहे. ही १०० एकर जागा देताना राज्य सरकारने तहसीलदारांना महापालिकेसोबत अटी आणि शर्तींसंदर्भात हमीपत्र करून घेण्यास सांगितले आहे. काही अटींच्या आधारेच ही जागा मुंबई महापालिकेला देण्यात आली आहे. ती जागा आहे त्याच स्थितीत मुंबई पालिकेला देण्यात येणार आहे. तसेच जागेवरील खनिज पदार्थ आणि दगडखाणी यावरील शासनाचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत. महापालिकेला आवश्यक असेल त्या काळापुरतीच ही जागा असून गरज संपताच ती जागा पुन्हा शासनाच्या ताब्यात देण्याची अट घालण्यात आली आहे. ही जागा ज्या कारणास्तव देण्यात आली आहे, त्याच कामासाठी वापरणे बंधनकारक आहे. येथील प्रकल्पामुळे सार्वजनिक आरोग्याचा व प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता महापालिकेने घेणे बंधनकारक आहे. या अटींच्या आधारावर जागा $ि$िमळाली असली तरी मुंबई महापालिकेला जागा परस्पर दिल्याने प्रकल्प उभारताना त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे.