शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

मुंबईचा कचरा आता अंबरनाथमध्ये

By admin | Updated: March 27, 2016 02:22 IST

यापुढे डम्पिंग ग्राउंडसाठी कोणत्याही पालिकेला जागा दिली जाणार नाही, अशी मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेत विरते न् विरते तोच मुंबईत देवनार डम्पिंग ग्राउंडला लागणाऱ्या आगीमुळे

- पंकज पाटील,  अंबरनाथ यापुढे डम्पिंग ग्राउंडसाठी कोणत्याही पालिकेला जागा दिली जाणार नाही, अशी मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेत विरते न् विरते तोच मुंबईत देवनार डम्पिंग ग्राउंडला लागणाऱ्या आगीमुळे अंबरनाथ तालुक्यातील करवले गावाजवळील १०० एकर जागा मुंबई पालिकेला देण्याचा तडकाफडकी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या जागेचा आगाऊ ताबाही अंबरनाथच्या तहसीलदारांनी दिला आहे. त्यामुळे मुंबईच्या कचऱ्यासाठी मुंबईबाहेर मोठी जागा उपलब्ध झाली असली, तरी आधीच तळोजा डम्पिंगला विरोध करणाऱ्यांच्या विरोधाची धार वाढली आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लावण्याचे मोठे आव्हान यंत्रणांपुढे उभे ठाकले आहे. मुंबईचे डम्पिंग ग्राउंड स्थलांतरित करण्यासाठी त्या पालिकेने अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावाजवळील करवले परिसरातील १०० एकर जागा राज्य शासनाकडे मागितली होती. स्थानिक ग्रामस्थांच्या सूचना आणि हरकती न घेताच राज्य सरकारने येथील जागा कचरा प्रक्रियेसाठी देऊन टाकली. या जागेची मोजणी करून त्याचा आगाऊ ताबा मुंबई महापालिकेला देण्याचे आदेश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार, या जागेची पाहणी करून आणि बाधित कुटुंबांची माहिती घेऊन ती जागा मुंबई महापालिकेला देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदारांना दिले. या जागेवर ८० कुटुंबे असून ५१आदिवासी कुटुंबे बाधित होत असल्याचे तहसीलदारांनी केलेल्या पाहणीत लक्षात आले. त्यांच्या पुनर्वसनाचा कोणताही विचार न करता थेट ही जागा मुंबई महापालिकेला देण्यातही आली आहे. ही १०० एकर जागा देताना राज्य सरकारने तहसीलदारांना महापालिकेसोबत अटी आणि शर्तींसंदर्भात हमीपत्र करून घेण्यास सांगितले आहे. काही अटींच्या आधारेच ही जागा मुंबई महापालिकेला देण्यात आली आहे. ती जागा आहे त्याच स्थितीत मुंबई पालिकेला देण्यात येणार आहे. तसेच जागेवरील खनिज पदार्थ आणि दगडखाणी यावरील शासनाचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत. महापालिकेला आवश्यक असेल त्या काळापुरतीच ही जागा असून गरज संपताच ती जागा पुन्हा शासनाच्या ताब्यात देण्याची अट घालण्यात आली आहे. ही जागा ज्या कारणास्तव देण्यात आली आहे, त्याच कामासाठी वापरणे बंधनकारक आहे. येथील प्रकल्पामुळे सार्वजनिक आरोग्याचा व प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता महापालिकेने घेणे बंधनकारक आहे. या अटींच्या आधारावर जागा $ि$िमळाली असली तरी मुंबई महापालिकेला जागा परस्पर दिल्याने प्रकल्प उभारताना त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे.