शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

अतिवृष्टीत बाधित झालेल्या मुंबई-ठाणेकरांना मिळणार नुकसानभरपाई, पालकमंत्री शिंदे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 17:10 IST

२९ ऑगस्ट रोजी पावसाने उडवलेल्या हाहाकारात मुंबई आणि ठाण्यातील हजारो नागरिकांना फटका बसला. ठाण्यातील किमान ६ जण अतिवृष्टीत वाहून गेले असून त्यांच्या कुटुंबीयांची कधीही न भरून येणारी हानी झाली

ठाणे, दि. 7 - २९ ऑगस्ट रोजी पावसाने उडवलेल्या हाहाकारात मुंबई आणि ठाण्यातील हजारो नागरिकांना फटका बसला. ठाण्यातील किमान ६ जण अतिवृष्टीत वाहून गेले असून त्यांच्या कुटुंबीयांची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. तसेच घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असल्याची बाब पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेस आणून देत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या मुंबई तसेच ठाणेकरांना नुकसानभरपाई देण्याची आग्रही मागणी गुरुवारी केली.मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे यांनी गुरुवारी या अतिवृष्टीग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. शिंदे यांची मागणी तात्काळ मान्य करत अतिवृष्टीत बाधित झालेल्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. 

अतिवृष्टीत झालेले नुकसान हे न भरून येणारे असले तरी या मदतीमुळे मुंबई आणि ठाणेकरांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार असून, तातडीने मदत जाहीर केल्याबद्दल पालकमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. मी स्वत: २९ आणि ३० ऑगस्ट रोजी संपूर्ण परिसरामध्ये फिरून अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून यथाशक्ती मदतही केली आहे. परंतु झालेले नुकसान इतके मोठे आहे की, कितीही मदत केली तरी कमी पडेल, असे पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी संगितले.