शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

मुंबई रेल्वे नागरी वाहतूक प्रकल्प रुळांवरून घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:23 IST

दुसऱ्या टप्प्याची रखडपट्टी : डेडलाइन संपून तीन वर्षे उलटली तरी कामे कूर्मगतीने सुरूच, प्रवाशांना दिलासा नाही

- मुरलीधर भवार

कल्याण : मुंबई उपनगरी रेल्वे वाहतुकीवरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या मुंबई रेल्वे नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी) च्या दुसºया टप्प्यातील कामे डेडलाइन संपुष्टात येऊन तीन वर्षे उलटली, तरीही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा लाभला नसल्याची टीका रेल्वे प्रवासी संघटना करत आहेत. दुसºया टप्प्यातील कामासाठी पाच हजार ३०० कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली. ही कामे २००९ ते २०१४ या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित होते.

राज्य व केंद्र सरकारच्या पुढाकाराने १९९५ साली मुंबई रेल्वे नागरी वाहतूक प्रकल्पासाठी मुंबई रेल्वे विकास परिषदेची स्थापन केली गेली. रेल्वे नागरी वाहतूक विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर दुसºया टप्प्यांतर्गत कुर्ला-सीएसटी पाचवा व सहावा मार्ग, ठाणे-दिवा पाचवा व सहावा मार्ग, मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावा मार्ग, अंधेरी ते गोरेगावपर्यंत हार्बर मार्गाचा विस्तार करणे, या कामांचा समावेश होता. या प्रकल्पाची कामे रेंगाळली आहेत. प्रकल्पाचा दुसरा टप्पा अद्याप पूर्ण झालेला नसताना तिसºया टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे.

या तिसºया टप्प्यांतर्गत रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासासाठी १९५० कोटी, सुरक्षा उपाययोजनेसाठी ५२० कोटी, पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी एक हजार ५०० कोटी, ऐरोली-कळवा लिंक मार्गासाठी ४२८ कोटी रुपये, विरार-डहाणू प्रकल्पासाठी तीन हजार ५५५ कोटी रुपये, नवीन लोकलसाठी दोन हजार ९९० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पहिल्या व दुसºया टप्प्याच्या कामाची डेडलाइन पाळता आलेली नाही. त्यामुळे तिसºया टप्प्याचे काम कधी सुरू होणार आणि ते पूर्ण केव्हा होणार, असा सवाल रेल्वे उपनगरी प्रवासी महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष मनोहर शेलार यांनी केला.

प्रकल्प रखडण्याची कारणे अनेक आहे. राज्य व केंद्राकडून प्रकल्पांना वेळेत निधी उपलब्ध होत नाही. जागतिक बँकेकडून प्रकल्पांना निधी देताना काही बदल सुचवले जातात. त्याचबरोबर प्रकल्पासंदर्भात पर्यावरण संस्थांकडून आक्षेप घेतले जातात. विशेष म्हणजे प्रकल्पांमध्ये बाधित होणाºयांच्या पुनर्वसनासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. ठाणे-कुर्ला रेल्वेस्थानकांदरम्यान पाचवा व सहावा मार्ग टाकण्यासाठी पुनर्वसनाच्या कामावर ४२२ कोटी रुपये खर्च झाला आहे. प्रकल्पाच्या कूर्मगतीस ही कारणे असून त्यापेक्षा महत्त्वाचे कारण हे आहे की, राज्य सरकार, रेल्वे, रेल्वे विकास परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी यांच्यात समन्वय नाही, असा आरोप उपनगरी प्रवासी महासंघाने केला आहे.

टॅग्स :railwayरेल्वे