शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

मुंबईची अर्थव्यवस्था १.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 08:11 IST

डॉ. बीव्हीआर सुब्रमण्यम : मुंबई ग्लोबल शहर म्हणून येणार नावारूपाला

ठाणे :मुंबई महानगराची अर्थव्यवस्था ही १५० ते २०० बिलियन डॉलरपर्यंत आहे. २०३० पर्यंत अर्थव्यवस्था ३०० बिलियन डॉलर, तर २०४७ पर्यंत १.५ ट्रिलियन डॉलर पर्यंत नेणार असल्याचा निर्धार नीती आयोगाचे अध्यक्ष डॉ. बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला. मुंबई महानगर हे मेगासिटी बनू शकत असल्याचे मतदेखील त्यांनी मांडले. 

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त डॉ. सुब्रमण्यम यांचे ‘पाच ट्रिलियन इकॉनॉमी आणि महाराष्ट्राचे योगदान’ या विषयावर टीपटॉप प्लाझा येथे व्याख्यान आयोजित केले होते. ते म्हणाले की, मुंबई महानगरचा विकास करताना शाश्वत विचार केला जाणार आहे. सध्या लंडन, न्यूयॉर्क आणि टोकीओ ही तीन ग्लोबल शहरे आहेत. आज अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात प्रथम क्रमांकावर आहे. भविष्यात विकसित महाराष्ट्राची योजना बनविली जाईल. हे राज्य विकसित महाराष्ट्र असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

प्राधिकरणांना समन्वयाने काम करावे लागेल

नीती आयोगाच्या प्रमुख अर्थव्यवस्था सल्लागार ॲना रॉय यांनी सांगितले की, मुंबई महानगरचा विकास करताना विविध प्राधिकरणांना समन्वयाने काम करावे लागेल. मुंबई महानगरातील खासगी क्षेत्रांतून १० ते ११ लाख कोटींची गुंतवणूक होऊ शकते इतकी या प्रदेशाची क्षमता आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कार्यकारिणी सदस्य सुजय पत्की, कार्यकारी संचालक डॉ. जयंत कुलकर्णी, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :MumbaiमुंबईEconomyअर्थव्यवस्था