शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

मुंबई-बडोदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे उपोषण; योग्य मोबदल्या दिल्याशिवाय जमीन देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 14:41 IST

मुंबई- बडोदा महामार्गाच्या प्रकल्पात कल्याण तालुक्यातील 12 गावातील शेतकरी बाधित झाले आहेत. या बाधित शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाच्या धरर्तीवर मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी संघर्ष समितीच्यावतीने आज सोमवारी कल्याण तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

कल्याण : मुंबई- बडोदा महामार्गाच्या प्रकल्पात कल्याण तालुक्यातील 12 गावातील शेतकरी बाधित झाले आहेत. या बाधित शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाच्या धरर्तीवर मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी संघर्ष समितीच्यावतीने आज सोमवारी कल्याण तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. योग्य मोबदला दिल्याशिवाय महामार्गासाठी जमीन देणार नाही असा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. मुंबई बडोदा महामार्ग संघर्ष समितीचे समन्वय चंद्रकांत भोईर यांनी सांगितले की, महामार्ग प्रकल्पात कल्याण तालुक्यातील 12 गावचे 806 पेक्षा जास्त शेतकरी बाधित होत आहे. या प्रकल्पात 162 हेक्टर जमीन बाधित होत आहे. सांगोडे, कोंडेरी, नांदप, मानिवली, वाहोली, पिंपपोळी, गोवेली, आपटी, बेहरे, मांजर्ली, उंभार्ली, रायते, बल्याणी ही गावे बाधित होत आहे. कल्याण तालुक्यातील प्रकल्प बाधितांसाठी सरकारने केवळ 6 कोटी 50 लाखाची तरतूद केली आहे. त्यापैकी एक कोटी 62 लाखाचा निधी सरकार दरबारी जमा करण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांना 12 लाख 50 हजार रुपये नुकसान भरपाई दिला जात आहे. तर काही शेतकऱ्यांना एक ते दीड लाख रुपये भरपाई दिली जात आहे. नुकसान भरपाई व जमिनीच्या मोबदल्यात तफावत आहे. कोणत्याही शेतकऱ्याला कमी जास्त मोबदला न देता एक सारखा व एकसमान मोबदला दिला जावा. किमान 12 लाख 50 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जावी. तर जमीन प्रकल्पासाठी दिली जाईल. शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळा नुकसान भरपाई दिला जात आहे. हा भेदभाव का ?  असा सवाल समितीच्या वतीने उपस्थित केला आहे. प्रकल्पासाठी भूसंपादन 2013 पासून केले होते. सर्वेक्षण करण्यात येणा-या शेतक-यांना 24 ऑक्टोबरपासून मोबदला दिला जाणार आहे. मोबदल्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या प्रक्रियेस शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. 2013 सालच्या बाजारभाव मूल्याप्रमाणो मोबदला न देता चालू भावाप्रमाणो दिला जावा. 2013 सालच्या बाजारभाव मूल्यात व आजच्या मूल्यात दीड पटीची तफावत आहे. ही एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात आला आहे.     24 ऑक्टोबरच्या मोबदला वाटपावर स्थगिती देण्यात यावी अशी समितीची मागणी आहे. समितीने सुरु केलेल्या लाक्षणिक उपोषणाला भाजप आमदार किसन कथोरे यांनी भेट दिली. शेतक-यांच्या पाठिशी असल्या सांगून कथोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली आहे. समितीने काल रविवारी बापसई गावात एका कार्यक्रमासाठी आलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या मागणीचे निवेदन सादर केले आहे. उपोषणास सर्व पक्षीय पदाधिका-यांनी पाठिंबा दिला आहे. उपोषणात मिनाक्षी जाधव, अंकूश पाटील, महेंद्र जाधव, अनंता जाधव, संतोष शिरोशी आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :kalyanकल्याण