शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

डम्पिंग ग्राऊंड परिसरात चिखल व दुर्गंधी, नागरिकांनी अडविले कचऱ्याचे डंपर अन् ट्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 17:15 IST

उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील खडी मशीन डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफलो झाले असून संततधार पावसाने डम्पिंगवरील दुर्गंधीयुक्त पाणी परिसरातील झोपडपट्टी व रस्त्यावरून वाहत आहे.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : संततधार पावसाने डम्पिंग ग्राऊंडवरील दुर्गंधीयुक्त पाणी शेजारील झोपडपट्टी व रस्तावर आल्याने, सर्वत्र चिखल व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले. दुर्गंधी व चिखलाच्या निषेधार्थ नागरिकांनी कचऱ्याचे डंपर व ट्रक अडवून उपाययोजना करण्याची मागणी केली.

उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील खडी मशीन डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफलो झाले असून संततधार पावसाने डम्पिंगवरील दुर्गंधीयुक्त पाणी परिसरातील झोपडपट्टी व रस्त्यावरून वाहत आहे. डम्पिंगवरून वाहणाऱ्या पाण्याच्या दुर्गंधीमुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. रविवारी सकाळी डम्पिंग खालील झोपडपट्टी परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिक संतप्त होऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी डम्पिंगवर कचरा घेऊन जाणारे डंपर व ट्रक अडविल्याने, कचऱ्याचा गाड्याच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी व अन्य अधिकाऱ्यांनी नागरिकांची समजूत काढून रस्त्यावरील चिखल उचलण्याचे आश्वासन दिले. तसेच नव्याने रस्ता बांधनाची आश्वासन देण्यात आले. 

महापालिकेचे म्हारळगाव शेजारील राणा कंपाऊंड डम्पिंग ओव्हरफलो झाल्यावर, तत्कालीन आयुक्तांनी कॅम्प नं-५ येथील खडी खदान येथे शहरातील कचरा टाकण्याचे सुरवात केली. डम्पिंग ग्राऊंडसाठी पर्यायी जागा देण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आले. दरम्यान उसाटने गावा हद्दीतील ३० एकर जागा कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाने दिली असून जागेला कंपाऊंड घालण्याचे काम सुरू आहे. खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड हटविण्याची मागणी स्थानिक नागरिक व नगरसेवक यांनी करून ठिय्या आंदोलन, उपोषण, मोर्चा, गाडी अडविणे आदी आंदोलन हजारो नागरिकांनी केले. मात्र डम्पिंग साठी पर्यायी जागा मिळत नसल्याने डम्पिंगच्या प्रश्न जैसे थै आहे. 

हजारो नागरिकांच्या आरोग्याचा धोका?

खडी मशीन येथील डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफलो होऊन डम्पिंग वरील दुर्गंधीयुक्त पावसाचे पाणी डम्पिंग खालील झोपडपट्टीत जात आहे. झोपडपट्टी व रस्त्यांवर दुर्गंधीयुक्त पाण्याने चिखल निर्माण झाले. स्थानिक नागरिकांना रस्ता दुरुस्ती व चिखल उचलण्याचे आश्वासन मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी व इतर अधिकाऱ्यांनी दिल्याने, नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. चिखल व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचेनारोग्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरdumpingकचरा