शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

एमएसआरडीसीने थकविले पालिकेचे खड्डे बुजविण्याचे ६२ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 01:13 IST

ठाणे : ठाण्यातील रस्त्यांची यंदा पावसाने पार वाताहत झाली आहे. मात्र, एमएसआरडीसी आणि शासनाच्या मालकीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत ठाणे ...

ठाणे : ठाण्यातील रस्त्यांची यंदा पावसाने पार वाताहत झाली आहे. मात्र, एमएसआरडीसी आणि शासनाच्या मालकीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत ठाणे महापालिकेने कानाला खडा लावला आहे. गेल्यावर्षी अशा पद्धतीने या प्राधिकरणाच्या मालकीच्या रस्त्यांना खड्डे पडले होते. यासाठी पालिकेच्या तिजोरीवर ६२ लाखांचा भुर्दंड पडला होता. हा खर्च परत मिळावा म्हणून, पालिकेने एमएसआरडीसीकडे पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांनी हा खर्च देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा खर्च वसूल कसा करायचा, असा पेच पालिकेपुढे निर्माण झाला आहे.यंदा ठाण्यातील मागील १० वर्षांतील रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. त्यामुळे शहरातील नव्या आणि जुन्या रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध हालचाली सुरू आहेत. परंतु, पावसाची उघडीप मिळत नसल्याने खड्डे बुजवण्याच्या कार्यात अडथळे येत आहेत. त्यात या खड्ड्यांच्या मुद्यांवरून शिवसेना आणि भाजपकडून राजकीय भांडवल केले जात आहे. असे असले तरी ठाणेकरांचे मात्र या खड्ड्यांमुळे चांगलेच हाल होताना दिसत आहेत. आजही शहरातील तीनहातनाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवडा, कापूरबावडी आदींसह शहरातील इतर भागातही खड्डे पडले आहेत. पालिकेने नव्याने उभारलेल्या उड्डाणपुलावरही खड्डे पडले आहेत.दरम्यान, पालिकेने त्यांच्या मालकीच्या असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहेत. परंतु, इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी असहकार पुकारला आहे. त्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. गेल्यावर्षीदेखील शहरातील रस्त्यांना खड्डे पडले होते. त्यावेळी रस्ते कोणाचेही असोत, त्यावर पडलेले खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानुसार, खड्डे बुजवण्यात आले होते. त्यानंतर, यासाठी झालेला खर्च संबंधित प्राधिकरणांकडून परत मिळावा, यासाठी पालिकेच्या माध्यमातून एमएसआरडीसीकडे पत्रव्यवहार केला होता. परंतु, वर्ष उलटूनही त्यांच्याकडून यासाठी झालेला ६२ लाखांचा खर्च पालिकेला मिळू शकलेला नाही. उलट, या प्राधिकरणाकडून तुम्ही आमच्या रस्त्यांवरील खड्डे का बुजवले, असा सवाल उपस्थित करण्यात आला असून हा खर्च देण्यास नकार दिल्याची माहितीही समोर आली आहे.>मागचा कटू अनुभव विचारात घेता, यंदाच्या पावसात शासनाच्या मालकीच्या आणि एमएसआरडीसीच्या मालकीच्या असलेल्या रस्त्यांवरील खड्डे न बुजवण्याचा पवित्रा पालिकेने घेतला आहे. परंतु, लोकांच्या सोयीसाठी हे खड्डे बुजवण्यात यावेत, यासाठी पालिकेने एमएसआरडीसी आणि शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला आहे.

टॅग्स :thaneठाणे