शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

एमएसआरडीसीने थकविले पालिकेचे खड्डे बुजविण्याचे ६२ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 01:13 IST

ठाणे : ठाण्यातील रस्त्यांची यंदा पावसाने पार वाताहत झाली आहे. मात्र, एमएसआरडीसी आणि शासनाच्या मालकीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत ठाणे ...

ठाणे : ठाण्यातील रस्त्यांची यंदा पावसाने पार वाताहत झाली आहे. मात्र, एमएसआरडीसी आणि शासनाच्या मालकीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत ठाणे महापालिकेने कानाला खडा लावला आहे. गेल्यावर्षी अशा पद्धतीने या प्राधिकरणाच्या मालकीच्या रस्त्यांना खड्डे पडले होते. यासाठी पालिकेच्या तिजोरीवर ६२ लाखांचा भुर्दंड पडला होता. हा खर्च परत मिळावा म्हणून, पालिकेने एमएसआरडीसीकडे पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांनी हा खर्च देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा खर्च वसूल कसा करायचा, असा पेच पालिकेपुढे निर्माण झाला आहे.यंदा ठाण्यातील मागील १० वर्षांतील रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. त्यामुळे शहरातील नव्या आणि जुन्या रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध हालचाली सुरू आहेत. परंतु, पावसाची उघडीप मिळत नसल्याने खड्डे बुजवण्याच्या कार्यात अडथळे येत आहेत. त्यात या खड्ड्यांच्या मुद्यांवरून शिवसेना आणि भाजपकडून राजकीय भांडवल केले जात आहे. असे असले तरी ठाणेकरांचे मात्र या खड्ड्यांमुळे चांगलेच हाल होताना दिसत आहेत. आजही शहरातील तीनहातनाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवडा, कापूरबावडी आदींसह शहरातील इतर भागातही खड्डे पडले आहेत. पालिकेने नव्याने उभारलेल्या उड्डाणपुलावरही खड्डे पडले आहेत.दरम्यान, पालिकेने त्यांच्या मालकीच्या असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहेत. परंतु, इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी असहकार पुकारला आहे. त्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. गेल्यावर्षीदेखील शहरातील रस्त्यांना खड्डे पडले होते. त्यावेळी रस्ते कोणाचेही असोत, त्यावर पडलेले खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानुसार, खड्डे बुजवण्यात आले होते. त्यानंतर, यासाठी झालेला खर्च संबंधित प्राधिकरणांकडून परत मिळावा, यासाठी पालिकेच्या माध्यमातून एमएसआरडीसीकडे पत्रव्यवहार केला होता. परंतु, वर्ष उलटूनही त्यांच्याकडून यासाठी झालेला ६२ लाखांचा खर्च पालिकेला मिळू शकलेला नाही. उलट, या प्राधिकरणाकडून तुम्ही आमच्या रस्त्यांवरील खड्डे का बुजवले, असा सवाल उपस्थित करण्यात आला असून हा खर्च देण्यास नकार दिल्याची माहितीही समोर आली आहे.>मागचा कटू अनुभव विचारात घेता, यंदाच्या पावसात शासनाच्या मालकीच्या आणि एमएसआरडीसीच्या मालकीच्या असलेल्या रस्त्यांवरील खड्डे न बुजवण्याचा पवित्रा पालिकेने घेतला आहे. परंतु, लोकांच्या सोयीसाठी हे खड्डे बुजवण्यात यावेत, यासाठी पालिकेने एमएसआरडीसी आणि शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला आहे.

टॅग्स :thaneठाणे