शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

एमएसआरडीसीने थकविले पालिकेचे खड्डे बुजविण्याचे ६२ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 01:13 IST

ठाणे : ठाण्यातील रस्त्यांची यंदा पावसाने पार वाताहत झाली आहे. मात्र, एमएसआरडीसी आणि शासनाच्या मालकीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत ठाणे ...

ठाणे : ठाण्यातील रस्त्यांची यंदा पावसाने पार वाताहत झाली आहे. मात्र, एमएसआरडीसी आणि शासनाच्या मालकीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत ठाणे महापालिकेने कानाला खडा लावला आहे. गेल्यावर्षी अशा पद्धतीने या प्राधिकरणाच्या मालकीच्या रस्त्यांना खड्डे पडले होते. यासाठी पालिकेच्या तिजोरीवर ६२ लाखांचा भुर्दंड पडला होता. हा खर्च परत मिळावा म्हणून, पालिकेने एमएसआरडीसीकडे पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांनी हा खर्च देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा खर्च वसूल कसा करायचा, असा पेच पालिकेपुढे निर्माण झाला आहे.यंदा ठाण्यातील मागील १० वर्षांतील रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. त्यामुळे शहरातील नव्या आणि जुन्या रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध हालचाली सुरू आहेत. परंतु, पावसाची उघडीप मिळत नसल्याने खड्डे बुजवण्याच्या कार्यात अडथळे येत आहेत. त्यात या खड्ड्यांच्या मुद्यांवरून शिवसेना आणि भाजपकडून राजकीय भांडवल केले जात आहे. असे असले तरी ठाणेकरांचे मात्र या खड्ड्यांमुळे चांगलेच हाल होताना दिसत आहेत. आजही शहरातील तीनहातनाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवडा, कापूरबावडी आदींसह शहरातील इतर भागातही खड्डे पडले आहेत. पालिकेने नव्याने उभारलेल्या उड्डाणपुलावरही खड्डे पडले आहेत.दरम्यान, पालिकेने त्यांच्या मालकीच्या असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहेत. परंतु, इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी असहकार पुकारला आहे. त्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. गेल्यावर्षीदेखील शहरातील रस्त्यांना खड्डे पडले होते. त्यावेळी रस्ते कोणाचेही असोत, त्यावर पडलेले खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानुसार, खड्डे बुजवण्यात आले होते. त्यानंतर, यासाठी झालेला खर्च संबंधित प्राधिकरणांकडून परत मिळावा, यासाठी पालिकेच्या माध्यमातून एमएसआरडीसीकडे पत्रव्यवहार केला होता. परंतु, वर्ष उलटूनही त्यांच्याकडून यासाठी झालेला ६२ लाखांचा खर्च पालिकेला मिळू शकलेला नाही. उलट, या प्राधिकरणाकडून तुम्ही आमच्या रस्त्यांवरील खड्डे का बुजवले, असा सवाल उपस्थित करण्यात आला असून हा खर्च देण्यास नकार दिल्याची माहितीही समोर आली आहे.>मागचा कटू अनुभव विचारात घेता, यंदाच्या पावसात शासनाच्या मालकीच्या आणि एमएसआरडीसीच्या मालकीच्या असलेल्या रस्त्यांवरील खड्डे न बुजवण्याचा पवित्रा पालिकेने घेतला आहे. परंतु, लोकांच्या सोयीसाठी हे खड्डे बुजवण्यात यावेत, यासाठी पालिकेने एमएसआरडीसी आणि शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला आहे.

टॅग्स :thaneठाणे