शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक दिन : शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच एमपीएससी उत्तीर्ण झालो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:47 IST

पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या आयुष्याला डॉ. आनंद पाटील गुरुजींच्या प्रोत्साहनामुळे मिळाली कलाटणी

कल्याण : माझा जन्म शेतकरी कुटुंबातला असून वडील प्राध्यापक होते. माझ्या खोडकर स्वभावामुळे मी सहा वर्षांचा झाल्यावर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील शाळेत वडिलांनी मला दाखल केले. पहिली ते तिसरीपर्यंतच्या शाळेत असताना ढोले आणि पोखरकरबाई आम्हाला शिकवत होत्या. पोखरकरबार्इंनी त्यावेळी हात धरून ‘अ, आ, इ’ लिहायला शिकवले. ज्ञानमाता विद्यालय येथे सातवीमध्ये प्रवेश घेतला, तेव्हा तेथील शिक्षकांनी केलेल्या चांगल्या मार्गदर्शनामुळेच आज इथपर्यंत पोहोचलो आहे. खऱ्या अर्थाने आयुष्याला ‘टर्निंग पॉइंट’ शाळेतच मिळाला आणि मी घडत गेलो, अशा शब्दांत कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.या शाळेतील रहाणेसर, थोरातसर यांच्यामुळे दहावी बोर्डात ८७ टक्के गुण मिळाल्याने अकरावीमध्ये सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजमध्ये वडीलच प्राध्यापक असल्याने माझ्या खोडकर स्वभावाला थोडा लगाम लागला. बारावीनंतर इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये केमिकल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला. ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे येथील स्टडी सर्कल येथे एमपीएससीसाठी प्रवेश घेतला. याठिकाणी असलेल्या डॉ. आनंद पाटील यांच्यामुळे आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. एमपीएससीसाठी संस्कृत आणि अकाउंट हा विषय होता. त्यामुळे, संस्कृत या विषयावर डॉ. रवींद्र मुळे यांनी तर अकाउंटसाठी प्रमोद गुगळे या दोन्ही सरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच आज पोलीस उपायुक्तपदापर्यंत मी पोहोचू शकलो.दोन शिक्षकांचे मार्गदर्शन स्पर्धा परीक्षेसाठी ठरले महत्त्वाचे...तेव्हा शिक्षकांनी दिली शाबासकीसातवीमध्ये शिक्षण घेत असताना शाळेच्या ग्रंथालयातून विद्यार्थ्यांना वाचायला पुस्तके दिली जात नव्हती. म्हणून, शाळेत असलेल्या फटांगरे या सरांच्या नावाने मी व काही मित्र ग्रंथालयातून पुस्तके वाचायला घेत होतो. ही बाब जेव्हा फटांगरेसरांच्या लक्षात आली, त्यावेळी सर आम्हाला ओरडतील, असे वाटले होते. पण, त्यांनी मात्र वाचनाची आवड लक्षात घेऊन आम्हाला शाबासकी दिली.मी ज्या दोन्ही शाळांमध्ये शिकलो, तेथे बहुतांश विद्यार्थी सामान्य कुटुंबातीलच होते. त्यामुळे तेथील शिक्षक सर्व मुलांना बरोबर घेऊन शिकवत असत. सगळ्या मुलांना समान न्याय दिला जायचा. मुलांच्या कलागुणांचे जसे कौतुक केले जायचे, तशी चूक झाल्यास शिक्षाही केली जायची. माझ्याकडून चुका झाल्या, त्या-त्या वेळी शिक्षकांनी दिलेली शिक्षा आणि नंतर केलेला योग्य उपदेश यामुळेच कोणत्याही चुकीच्या मार्गाला कधी गेलो नाही.चौथीत असताना केली होती कॉपी...चौथीत असताना मित्र संतोष याचा अभ्यास झाला नव्हता. तर, माझा अभ्यास झाला असतानासुद्धा मैत्रीखातर परीक्षेत कॉपी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, माझ्या थरथरणाºया हातावरून शिंदेबार्इंना संशय आला आणि त्यांनी घेतलेल्या झडतीत माझ्याकडे कॉपी आढळून आली. संतोषच्या सांगण्यावरून कॉपी केल्याचे मी बार्इंना सांगितले. त्यावेळी, बार्इंनी दम देऊन पुन्हा कॉपी न करण्याचे सांगून पेपर लिहिण्यास दिला असता पूर्ण गुण मिळविले. त्यानंतर, पुन्हा कधीच कॉपी केली नाही.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनEducationशिक्षणthaneठाणे