शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

शिक्षक दिन : शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच एमपीएससी उत्तीर्ण झालो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:47 IST

पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या आयुष्याला डॉ. आनंद पाटील गुरुजींच्या प्रोत्साहनामुळे मिळाली कलाटणी

कल्याण : माझा जन्म शेतकरी कुटुंबातला असून वडील प्राध्यापक होते. माझ्या खोडकर स्वभावामुळे मी सहा वर्षांचा झाल्यावर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील शाळेत वडिलांनी मला दाखल केले. पहिली ते तिसरीपर्यंतच्या शाळेत असताना ढोले आणि पोखरकरबाई आम्हाला शिकवत होत्या. पोखरकरबार्इंनी त्यावेळी हात धरून ‘अ, आ, इ’ लिहायला शिकवले. ज्ञानमाता विद्यालय येथे सातवीमध्ये प्रवेश घेतला, तेव्हा तेथील शिक्षकांनी केलेल्या चांगल्या मार्गदर्शनामुळेच आज इथपर्यंत पोहोचलो आहे. खऱ्या अर्थाने आयुष्याला ‘टर्निंग पॉइंट’ शाळेतच मिळाला आणि मी घडत गेलो, अशा शब्दांत कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.या शाळेतील रहाणेसर, थोरातसर यांच्यामुळे दहावी बोर्डात ८७ टक्के गुण मिळाल्याने अकरावीमध्ये सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजमध्ये वडीलच प्राध्यापक असल्याने माझ्या खोडकर स्वभावाला थोडा लगाम लागला. बारावीनंतर इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये केमिकल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला. ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे येथील स्टडी सर्कल येथे एमपीएससीसाठी प्रवेश घेतला. याठिकाणी असलेल्या डॉ. आनंद पाटील यांच्यामुळे आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. एमपीएससीसाठी संस्कृत आणि अकाउंट हा विषय होता. त्यामुळे, संस्कृत या विषयावर डॉ. रवींद्र मुळे यांनी तर अकाउंटसाठी प्रमोद गुगळे या दोन्ही सरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच आज पोलीस उपायुक्तपदापर्यंत मी पोहोचू शकलो.दोन शिक्षकांचे मार्गदर्शन स्पर्धा परीक्षेसाठी ठरले महत्त्वाचे...तेव्हा शिक्षकांनी दिली शाबासकीसातवीमध्ये शिक्षण घेत असताना शाळेच्या ग्रंथालयातून विद्यार्थ्यांना वाचायला पुस्तके दिली जात नव्हती. म्हणून, शाळेत असलेल्या फटांगरे या सरांच्या नावाने मी व काही मित्र ग्रंथालयातून पुस्तके वाचायला घेत होतो. ही बाब जेव्हा फटांगरेसरांच्या लक्षात आली, त्यावेळी सर आम्हाला ओरडतील, असे वाटले होते. पण, त्यांनी मात्र वाचनाची आवड लक्षात घेऊन आम्हाला शाबासकी दिली.मी ज्या दोन्ही शाळांमध्ये शिकलो, तेथे बहुतांश विद्यार्थी सामान्य कुटुंबातीलच होते. त्यामुळे तेथील शिक्षक सर्व मुलांना बरोबर घेऊन शिकवत असत. सगळ्या मुलांना समान न्याय दिला जायचा. मुलांच्या कलागुणांचे जसे कौतुक केले जायचे, तशी चूक झाल्यास शिक्षाही केली जायची. माझ्याकडून चुका झाल्या, त्या-त्या वेळी शिक्षकांनी दिलेली शिक्षा आणि नंतर केलेला योग्य उपदेश यामुळेच कोणत्याही चुकीच्या मार्गाला कधी गेलो नाही.चौथीत असताना केली होती कॉपी...चौथीत असताना मित्र संतोष याचा अभ्यास झाला नव्हता. तर, माझा अभ्यास झाला असतानासुद्धा मैत्रीखातर परीक्षेत कॉपी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, माझ्या थरथरणाºया हातावरून शिंदेबार्इंना संशय आला आणि त्यांनी घेतलेल्या झडतीत माझ्याकडे कॉपी आढळून आली. संतोषच्या सांगण्यावरून कॉपी केल्याचे मी बार्इंना सांगितले. त्यावेळी, बार्इंनी दम देऊन पुन्हा कॉपी न करण्याचे सांगून पेपर लिहिण्यास दिला असता पूर्ण गुण मिळविले. त्यानंतर, पुन्हा कधीच कॉपी केली नाही.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनEducationशिक्षणthaneठाणे