शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

कचरा समस्येची खासदारांनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:13 IST

कल्याण : ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प राबविण्यासंदर्भात केडीएमसीकडून गृहसंकुलांना नोटिसा बजावल्या जात असताना कचऱ्याच्या गाड्या चार ते पाच ...

कल्याण : ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प राबविण्यासंदर्भात केडीएमसीकडून गृहसंकुलांना नोटिसा बजावल्या जात असताना कचऱ्याच्या गाड्या चार ते पाच दिवस न पाठवता अडवणुकीचे धोरण अवलंबिल्याने रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याबाबत ‘लोकमत’ने बुधवारी ‘कचरागाड्या फिरकत नसल्याने गृहसंकुलांपुढे पेच’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्याची दखल घेत रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. कचऱ्यासह भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नाबाबत तातडीने आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

केडीएमसीने दररोज १०० किलो व त्यापेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या गृहसंकुलांना त्यांच्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारणे बंधनकारक केले आहे. परंतु, प्रकल्प खर्चीक असून, देखभाल-दुरुस्तीचा खर्चही करावा लागणार आहे. दुसरीकडे काही वर्षांपासून नवीन गृहसंकुलांना त्यांच्या आवारातच वाहनांच्या पार्किंगसाठी जागा ठेेवणे सक्तीचे केले आहे. त्यासाठी बहुतांश जागा व्यापली जात आहे. परिणामी, जागेअभावी आणि खर्चामुळे कचरा प्रकल्प राबविण्यावर मर्यादा आहेत. अशा परिस्थितीतही प्रकल्प उभारण्याची तयारी काही गृहसंकुलांनी दर्शविली आहे. मात्र, त्यासाठी काहीसा कालावधी लागणार आहे. परंतु, तत्पुर्वीच कचऱ्याच्या गाड्या चार ते पाच दिवस न पाठवता मनपाकडून अडवणूक सुरू झाल्याने रहिवाशांमध्ये रोषाचे वातावरण आहे.

काही गृहसंकुलांना कचऱ्याच्या समस्येबरोबर तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. हा त्रास होणाऱ्या ठाकुर्लीतील ९० फुटी रोडवरील मंगेशी डॅझल आणि कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रोडवरील सर्वाेदय लीला सोसायटीच्या रहिवाशांनी बुधवारी शिंदे यांच्याकडे समस्या मांडल्या. कचरा प्रकल्पाचा खर्च मोठा असून, तो आम्हाला परवडणारा नाही. जागेचाही प्रश्न आहे. या अडचणींमध्येही आम्ही प्रकल्प राबविण्यास तयार आहोत. परंतु, त्याबाबत चर्चा सुरू असताना कचऱ्याच्या गाड्या न पाठवता केडीएमसीने नाहक त्रास देणे सुरू केल्याकडे रहिवाशांनी लक्ष वेधले. ‘सर्वाेदय लीला’च्या रहिवाशांनी त्यांना १५ ते २० दिवसांपासून भेडसावणाऱ्या पाणीटंचाईचा मुद्दाही उपस्थित केला.

‘प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न केला जाईल’

- सद्य:स्थितीत कचऱ्याचा प्रकल्प राबवावाच लागणार आहे. गृहसंकुलांना खर्च परवडत नसेल तर केडीएमसी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने तो प्रकल्प राबविण्यासंदर्भात प्रयत्न केला जाईल. आयुक्तांशी चर्चा झाली असून, संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून कचऱ्याची समस्या निकाली काढली जाईल.

- पाणीटंचाईच्या मुद्द्यावरही पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावरही तोडगा काढला जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी या वेळी दिले. खासदारांच्या आश्वासनामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला असला तरी त्यांच्या पुढाकाराने ही समस्या निकाली निघते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

-------------------