शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

कचरा समस्येची खासदारांनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:13 IST

कल्याण : ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प राबविण्यासंदर्भात केडीएमसीकडून गृहसंकुलांना नोटिसा बजावल्या जात असताना कचऱ्याच्या गाड्या चार ते पाच ...

कल्याण : ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प राबविण्यासंदर्भात केडीएमसीकडून गृहसंकुलांना नोटिसा बजावल्या जात असताना कचऱ्याच्या गाड्या चार ते पाच दिवस न पाठवता अडवणुकीचे धोरण अवलंबिल्याने रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याबाबत ‘लोकमत’ने बुधवारी ‘कचरागाड्या फिरकत नसल्याने गृहसंकुलांपुढे पेच’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्याची दखल घेत रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. कचऱ्यासह भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नाबाबत तातडीने आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

केडीएमसीने दररोज १०० किलो व त्यापेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या गृहसंकुलांना त्यांच्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारणे बंधनकारक केले आहे. परंतु, प्रकल्प खर्चीक असून, देखभाल-दुरुस्तीचा खर्चही करावा लागणार आहे. दुसरीकडे काही वर्षांपासून नवीन गृहसंकुलांना त्यांच्या आवारातच वाहनांच्या पार्किंगसाठी जागा ठेेवणे सक्तीचे केले आहे. त्यासाठी बहुतांश जागा व्यापली जात आहे. परिणामी, जागेअभावी आणि खर्चामुळे कचरा प्रकल्प राबविण्यावर मर्यादा आहेत. अशा परिस्थितीतही प्रकल्प उभारण्याची तयारी काही गृहसंकुलांनी दर्शविली आहे. मात्र, त्यासाठी काहीसा कालावधी लागणार आहे. परंतु, तत्पुर्वीच कचऱ्याच्या गाड्या चार ते पाच दिवस न पाठवता मनपाकडून अडवणूक सुरू झाल्याने रहिवाशांमध्ये रोषाचे वातावरण आहे.

काही गृहसंकुलांना कचऱ्याच्या समस्येबरोबर तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. हा त्रास होणाऱ्या ठाकुर्लीतील ९० फुटी रोडवरील मंगेशी डॅझल आणि कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रोडवरील सर्वाेदय लीला सोसायटीच्या रहिवाशांनी बुधवारी शिंदे यांच्याकडे समस्या मांडल्या. कचरा प्रकल्पाचा खर्च मोठा असून, तो आम्हाला परवडणारा नाही. जागेचाही प्रश्न आहे. या अडचणींमध्येही आम्ही प्रकल्प राबविण्यास तयार आहोत. परंतु, त्याबाबत चर्चा सुरू असताना कचऱ्याच्या गाड्या न पाठवता केडीएमसीने नाहक त्रास देणे सुरू केल्याकडे रहिवाशांनी लक्ष वेधले. ‘सर्वाेदय लीला’च्या रहिवाशांनी त्यांना १५ ते २० दिवसांपासून भेडसावणाऱ्या पाणीटंचाईचा मुद्दाही उपस्थित केला.

‘प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न केला जाईल’

- सद्य:स्थितीत कचऱ्याचा प्रकल्प राबवावाच लागणार आहे. गृहसंकुलांना खर्च परवडत नसेल तर केडीएमसी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने तो प्रकल्प राबविण्यासंदर्भात प्रयत्न केला जाईल. आयुक्तांशी चर्चा झाली असून, संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून कचऱ्याची समस्या निकाली काढली जाईल.

- पाणीटंचाईच्या मुद्द्यावरही पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावरही तोडगा काढला जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी या वेळी दिले. खासदारांच्या आश्वासनामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला असला तरी त्यांच्या पुढाकाराने ही समस्या निकाली निघते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

-------------------