शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

भाईंदरच्या धारावी किल्ल्याच्या संवर्धनासाठी खासदार-आमदार यांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 17:17 IST

भाईंदर पश्चिमच्या चौक किनारपट्टीवरील ऐतिहासिक धारावी किल्ला असून गेल्या अनेक वर्षांपासून हा किल्ला दुर्लक्षित होता.

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या चौक डोंगरावरील धारावी किल्याच्या संवर्धन आणि पुनर्विकासासाठी शासनाकडून मोठी मदत होणार असून त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आश्वस्त केल्याची माहिती खासदार राजन विचारे आणि आमदार गीता जैन यांनी किल्ल्याच्या पाहणी दौऱ्यादरम्यान दिली आहे. 

भाईंदर पश्चिमच्या चौक किनारपट्टीवरील ऐतिहासिक धारावी किल्ला असून गेल्या अनेक वर्षांपासून हा किल्ला दुर्लक्षित होता. या ठिकाणी किल्ल्याच्या मोठ्या संरक्षक भिंती तोडण्यासह भिंत व बुरुजाचे दगड नेण्याचे प्रकार पूर्वी घडल्याचे सांगितले जाते. सदर ठिकाणी मद्यपींची वर्दळ वाढली होती. दरम्यान गडप्रेमी तरुणांनी गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यासह किल्ल्याच्या संवर्धन व पुनर्विकासाची मागणी चालवली होती. 

शनिवारी विचारे आणि जैन यांनी पालिका आयुक्त दिलीप ढोले, स्थानिक नगरसेविका हेलन गोविंद, शर्मिला गंडोली, माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद, गडप्रेमी, पालिका अधिकारी यांच्या समवेत किल्ल्याची पाहणी करण्यात आली. धारावी किल्ल्याच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. किल्ल्यासाठी निधी आणि आवश्यक परवानग्या मिळण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे विचारे व जैन यांनी यावेळी सांगितले.

२०२० मध्ये स्थानिक नगरसेविकेच्या मागणी नंतर किल्ल्याकडे जाणारा रस्त्याचे काम जिल्हा नियोजन निधीतून २२ लाख रुपये खर्चून करण्यात आल्याचे विचारे यांनी सांगितले.  पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे धारावी किल्ल्यास लवकरच भेट देण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली.

 

टॅग्स :mira roadमीरा रोड