शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या धारावी किल्ल्याच्या संवर्धनासाठी खासदार-आमदार यांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 17:17 IST

भाईंदर पश्चिमच्या चौक किनारपट्टीवरील ऐतिहासिक धारावी किल्ला असून गेल्या अनेक वर्षांपासून हा किल्ला दुर्लक्षित होता.

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या चौक डोंगरावरील धारावी किल्याच्या संवर्धन आणि पुनर्विकासासाठी शासनाकडून मोठी मदत होणार असून त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आश्वस्त केल्याची माहिती खासदार राजन विचारे आणि आमदार गीता जैन यांनी किल्ल्याच्या पाहणी दौऱ्यादरम्यान दिली आहे. 

भाईंदर पश्चिमच्या चौक किनारपट्टीवरील ऐतिहासिक धारावी किल्ला असून गेल्या अनेक वर्षांपासून हा किल्ला दुर्लक्षित होता. या ठिकाणी किल्ल्याच्या मोठ्या संरक्षक भिंती तोडण्यासह भिंत व बुरुजाचे दगड नेण्याचे प्रकार पूर्वी घडल्याचे सांगितले जाते. सदर ठिकाणी मद्यपींची वर्दळ वाढली होती. दरम्यान गडप्रेमी तरुणांनी गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यासह किल्ल्याच्या संवर्धन व पुनर्विकासाची मागणी चालवली होती. 

शनिवारी विचारे आणि जैन यांनी पालिका आयुक्त दिलीप ढोले, स्थानिक नगरसेविका हेलन गोविंद, शर्मिला गंडोली, माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद, गडप्रेमी, पालिका अधिकारी यांच्या समवेत किल्ल्याची पाहणी करण्यात आली. धारावी किल्ल्याच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. किल्ल्यासाठी निधी आणि आवश्यक परवानग्या मिळण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे विचारे व जैन यांनी यावेळी सांगितले.

२०२० मध्ये स्थानिक नगरसेविकेच्या मागणी नंतर किल्ल्याकडे जाणारा रस्त्याचे काम जिल्हा नियोजन निधीतून २२ लाख रुपये खर्चून करण्यात आल्याचे विचारे यांनी सांगितले.  पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे धारावी किल्ल्यास लवकरच भेट देण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली.

 

टॅग्स :mira roadमीरा रोड