शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

स्थानिकांच्या नोकरभरतीसाठी निर्धारचे आंदोलनास्त्र

By admin | Updated: March 22, 2016 02:01 IST

औद्योगिक परिसरातील कारखान्यातल्या रोजगारात स्थानिकांना ८० टक्के प्राधान्य द्यावे, असे राज्य शासनाचे परिपत्रक असतांना पालघर जिल्ह्यातील कारखान्यात स्थानिकांना न्याय दिला

पालघर : औद्योगिक परिसरातील कारखान्यातल्या रोजगारात स्थानिकांना ८० टक्के प्राधान्य द्यावे, असे राज्य शासनाचे परिपत्रक असतांना पालघर जिल्ह्यातील कारखान्यात स्थानिकांना न्याय दिला जात नसल्याने तरुणांमध्ये बेकारीचे प्रमाण वाढत आहे. हे लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कारखानदारांना या नियमाचे पालन करण्याचा आदेश द्यावा अन्यथा आम्हाला कायदा हाती घ्यावा लागेल, असा सूचक इशारा निर्धार संघटनेचे अध्यक्ष कुंदन संखे यांनी दिला आहे.नियमाप्रमाणे शासकीय नोकरीमध्ये राज्यातील कुठलाही तरुण जिल्ह्यातील कुठल्याही नोकरभरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो, असे प्रशासनाचे म्हणणे असेल तर शासकीय आदेशान्वये उद्योगामध्ये किमान ८० टक्के स्थानिक तरुणांना नोकरी देण्याचे व सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश असताना ही प्रक्रिया का राबवली जात नाही, असा सवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे.नोकर भरती समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात. त्यांच्या दिमतीला समितीही असते. अशी समिती अस्तित्वात आहे काय? नसेल तर तिची तातडीने स्थापना व्हावी व तिच्या माध्यमातून या आदेशाची अंमलबजावणी करावी, कारखान्यांतील कामगारांचे अधिवास दाखले व कायमस्वरूपी वास्तव्याच्या पुराव्याची चौकशी करावी, अशी मागणी या वेळी उपस्थित तृप्ती संखे, संजय संखे, केतन राऊत, मनीष पाटील, भावेश तामोरे, इत्यांदींमार्फत करण्यात आली. येत्या १५ दिवसांच्या आत समिती स्थापन न केल्यास तरुणांच्या रोजगारासंदर्भात जनतेसह रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. (वार्ताहर)