शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोविडमुळे अनाथ झालेली सर्वाधिक बालके ठाण्यात; यशोमती ठाकूर राज्यभर करणार दौरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 07:57 IST

कोविड १९ चा सर्वाधिक परिणाम महिला व बालकांवर झाला. तसेच, महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मनोधैर्य योजना लवचिक केली जाईल.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोविड - १९मुळे अनाथ झालेल्या बालकांना भेटण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा करणार असून, त्याचा प्रारंभ ठाण्यातून करीत आहे. या अनाथ बालकांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या, अडीअडचणी समजल्या. त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठाणे जिल्ह्यात अनाथ बालकांची संख्या सर्वाधिक ४२ असून, ही निश्चित गंभीर बाब आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केले.

ठाकूर म्हणाल्या की, कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या मागे सरकार मायबाप म्हणून उभे आहे. या अनाथ मुलांना पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान सरकार देणार आहे. ही मुले २१ वर्षांची झाली की, ते पैसे त्यांना मिळतील. बालसंगोपन योजनेतील पैसे कसे वाढवता येतील, बालकामगार, बालविवाह हे कसे रोखता येतील, याकडेही आम्ही लक्ष देणार आहोत. अनाथ मुलांचा शोध घेत असून, त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. अनाथ बालकांच्या समस्या सोडवण्यासाठी टास्क फोर्स तयार केला आहे व ते दर १५ दिवसांनी पाठपुरावा करतील. तसेच, ज्या अनाथ मुलांना कोणीच नाही अशांची चाईल्ड केअर इन्स्टिट्यूटमध्ये व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. कोविडची तिसरी लाट येऊ नये अशी आम्ही आशा करतोय. तिसरी लाट लहान मुलांवर परिणाम करणार असेल तर अंगणवाडी सेविकांना तसे प्रशिक्षण दिले जाईल. सरकारने याबाबत पूर्ण तयारी केली आहे. आशा वर्कर्सचे मानधन वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

कोविड १९ चा सर्वाधिक परिणाम महिला व बालकांवर झाला. तसेच, महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मनोधैर्य योजना लवचिक केली जाईल. तसेच, ‘दिशा’ कायद्याबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. तसेच महिलांनी स्वतःवरील अत्याचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे