शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मोरीवली, वडवली गावाला प्रदूषणाचा वाढता धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 00:04 IST

नागरिक त्रस्त : चुकीच्या पद्धतीने सोडतात विषारी वायू

अंबरनाथ : अंबरनाथ शहराच्या मध्यभागी असलेल्या मोरीवली आणि वडवली या दोन केमिकल झोनमध्ये आता कारखानदार चुकीच्या पद्धतीने रासायनिक वायू हवेत सोडत आहेत. या रासायनिक प्रदूषणाचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. रोज विषारी धूर आणि वायू हवेत सोडण्याचे प्रकार वाढत असल्याची बाब दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी मांडली आहे.

गेल्या महिन्यात वडवली गावातील केमिकल झोनमधील एका कारखान्यातून मोठ्या प्रमाणात धूर सोडण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण अंबरनाथ भागातील साई, कानसई, स्वामीनगर आणि वडवली गाव परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला होता. हा प्रकार घडल्यानंतर रात्रीच्या वेळी रासायनिक वायू सोडण्याचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा असताना आता नव्याने घातक आणि त्रासदायक वायू हवेत सोडण्याचे प्रकार वाढले आहेत. मोरीवली परिसरातील काही कारखानदार चुकीच्या पद्धतीने थेट हवेत वायू सोडत असल्याची बाब ग्रामस्थांनी समोर आणली आहे. मात्र ग्रामस्थांच्या तक्रारींकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारखानदारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर मेहरबानी दाखविण्याचे काम अधिकारी करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दुर्गंधीयुक्त वायू हवेत सोडण्याचे प्रमाण वाढल्याने आता या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. हीच परिस्थिती वडवली भागातही झाली आहे. मात्र त्या ठिकाणीही नागरिकांच्या तक्रारींना बगल देण्याचे काम केले जात आहे. रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य असते.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका