शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

मोरीवली, वडवली गावाला प्रदूषणाचा वाढता धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 00:04 IST

नागरिक त्रस्त : चुकीच्या पद्धतीने सोडतात विषारी वायू

अंबरनाथ : अंबरनाथ शहराच्या मध्यभागी असलेल्या मोरीवली आणि वडवली या दोन केमिकल झोनमध्ये आता कारखानदार चुकीच्या पद्धतीने रासायनिक वायू हवेत सोडत आहेत. या रासायनिक प्रदूषणाचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. रोज विषारी धूर आणि वायू हवेत सोडण्याचे प्रकार वाढत असल्याची बाब दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी मांडली आहे.

गेल्या महिन्यात वडवली गावातील केमिकल झोनमधील एका कारखान्यातून मोठ्या प्रमाणात धूर सोडण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण अंबरनाथ भागातील साई, कानसई, स्वामीनगर आणि वडवली गाव परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला होता. हा प्रकार घडल्यानंतर रात्रीच्या वेळी रासायनिक वायू सोडण्याचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा असताना आता नव्याने घातक आणि त्रासदायक वायू हवेत सोडण्याचे प्रकार वाढले आहेत. मोरीवली परिसरातील काही कारखानदार चुकीच्या पद्धतीने थेट हवेत वायू सोडत असल्याची बाब ग्रामस्थांनी समोर आणली आहे. मात्र ग्रामस्थांच्या तक्रारींकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारखानदारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर मेहरबानी दाखविण्याचे काम अधिकारी करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दुर्गंधीयुक्त वायू हवेत सोडण्याचे प्रमाण वाढल्याने आता या भागातील नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. हीच परिस्थिती वडवली भागातही झाली आहे. मात्र त्या ठिकाणीही नागरिकांच्या तक्रारींना बगल देण्याचे काम केले जात आहे. रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य असते.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका