शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

उल्हासनगरात लाखोचा खर्च करूनही अर्धेअधिक हॅन्डपंप बंद; पाणी टंचाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 19:06 IST

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःची पाणी पुरवठा योजना नसल्याने, पाणी पुरवठ्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरवासियांना मुबलक पाणी पुरवठा मिळण्यासाठी ४५० कोटीच्या पाणी पुरवठा वितरण योजनेचा फज्जा उडाला असून दरवर्षी लाखो रुपये खर्चूनही अर्धेअधिक हॅण्डपंप बंद आहेत. याप्रकाराने नागरिकांवर पाणी टंचाईची तलवार टांगती उभी ठाकल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केला. 

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःची पाणी पुरवठा योजना नसल्याने, पाणी पुरवठ्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. एमआयडीसीने गेल्या आठवड्यात दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. एमआयडीसीच्या निर्णयामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण होणार आहे. शहर पूर्वेतील अनेक ठिकाणी दिवसाआड पाणी पुरवठा होत असून एमआयडीसीच्या या निर्णयामुळे पूर्वेत पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता प्रभाग समिती क्रं-४ च्या सभापती अंजली साळवे यांनी व्यक्त केली. तसेच प्रभाग समिती क्रं-४ मध्ये एकूण ४६ हॅण्डपंप असून त्यापैकी २२ हातपंप बंद आहेत. हीच परिस्थिती शहराची असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी केला. 

कोरोना महामारीच्या दरम्यान महापालिकेचे उत्पन्न ठप्प पडल्याने, गेल्या सहा महिन्यांचे पाणी बिल अदा करण्यात न आल्याने, एमआयडीची पाणी थकबाकी वाढली आहे. यामुळे महापालिकेवर केंव्हाही पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा मिळण्यासाठी महापालिकेने केंद्र व राज्याच्या मदतीने ४५० कोटी पेक्षा जास्त किंमतीची पाणी पुरवठा वितरण योजना राबविली. मात्र योजनेचा फज्जा उडून सर्वत्र पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र शहरात आहे. पाणी टंचाईची झळ नागरिकांना बसू नये म्हणून महापालिका बंद पडलेले हातपंप दरवर्षी दुरुस्ती केले जाते. दुरुस्तीवर कोट्यवधीचा खर्च केल्यावर अर्धेअधिक हातपंप बंद असल्याचे उघड झाले आहे. हातपंपच्या दुरुस्तीवर व इतर कामावर होणाऱ्या खर्चाचा लेखाजोखा काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी मागितल्याने, पाणी पुरवठा विभागात खळबळ इडली आहे. 

हातपंपाची दुरुस्तीचे संकेत

महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता किशोर रहेजा यांनी शहरातील हातपंप, विधुत पुरवठा याबाबतची माहिती घेण्याचे संकेत दिले. पाणी टंचाई निर्माण होणार नाही, या दृष्टीकोणातून उपाययोजना सुरू करून बंद पडलेले हातपंप सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे