शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

उल्हासनगरात लाखोचा खर्च करूनही अर्धेअधिक हॅन्डपंप बंद; पाणी टंचाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 19:06 IST

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःची पाणी पुरवठा योजना नसल्याने, पाणी पुरवठ्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरवासियांना मुबलक पाणी पुरवठा मिळण्यासाठी ४५० कोटीच्या पाणी पुरवठा वितरण योजनेचा फज्जा उडाला असून दरवर्षी लाखो रुपये खर्चूनही अर्धेअधिक हॅण्डपंप बंद आहेत. याप्रकाराने नागरिकांवर पाणी टंचाईची तलवार टांगती उभी ठाकल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केला. 

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःची पाणी पुरवठा योजना नसल्याने, पाणी पुरवठ्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. एमआयडीसीने गेल्या आठवड्यात दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. एमआयडीसीच्या निर्णयामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण होणार आहे. शहर पूर्वेतील अनेक ठिकाणी दिवसाआड पाणी पुरवठा होत असून एमआयडीसीच्या या निर्णयामुळे पूर्वेत पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता प्रभाग समिती क्रं-४ च्या सभापती अंजली साळवे यांनी व्यक्त केली. तसेच प्रभाग समिती क्रं-४ मध्ये एकूण ४६ हॅण्डपंप असून त्यापैकी २२ हातपंप बंद आहेत. हीच परिस्थिती शहराची असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी केला. 

कोरोना महामारीच्या दरम्यान महापालिकेचे उत्पन्न ठप्प पडल्याने, गेल्या सहा महिन्यांचे पाणी बिल अदा करण्यात न आल्याने, एमआयडीची पाणी थकबाकी वाढली आहे. यामुळे महापालिकेवर केंव्हाही पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा मिळण्यासाठी महापालिकेने केंद्र व राज्याच्या मदतीने ४५० कोटी पेक्षा जास्त किंमतीची पाणी पुरवठा वितरण योजना राबविली. मात्र योजनेचा फज्जा उडून सर्वत्र पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र शहरात आहे. पाणी टंचाईची झळ नागरिकांना बसू नये म्हणून महापालिका बंद पडलेले हातपंप दरवर्षी दुरुस्ती केले जाते. दुरुस्तीवर कोट्यवधीचा खर्च केल्यावर अर्धेअधिक हातपंप बंद असल्याचे उघड झाले आहे. हातपंपच्या दुरुस्तीवर व इतर कामावर होणाऱ्या खर्चाचा लेखाजोखा काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी मागितल्याने, पाणी पुरवठा विभागात खळबळ इडली आहे. 

हातपंपाची दुरुस्तीचे संकेत

महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता किशोर रहेजा यांनी शहरातील हातपंप, विधुत पुरवठा याबाबतची माहिती घेण्याचे संकेत दिले. पाणी टंचाई निर्माण होणार नाही, या दृष्टीकोणातून उपाययोजना सुरू करून बंद पडलेले हातपंप सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे