शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

गणरायाला दिला भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:54 IST

अंबरनाथमध्ये गौरी गणपतीचे विसर्जन उत्साहात झाले. पावसाने विश्रांती घेतल्याने भाविकांना विसर्जनाच्यावेळी कुठलाही अडथळा आला नाही.

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये गौरी गणपतीचे विसर्जन उत्साहात झाले. पावसाने विश्रांती घेतल्याने भाविकांना विसर्जनाच्यावेळी कुठलाही अडथळा आला नाही. सर्वाधिक गणेशमूर्तींचे विसर्जन हे चिंचपाडा येथील तलाव आणि शिवमंदिर येथील कुंडात करण्यात आले.सायंकाळी ५ नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक घरगुती गणपती आणि गौरींचे विसर्जन झाले. फटाक्यांची आतषबाजी आणि पारंपारिक वाद्यांच्या तालावर नाचत मिरवणुका काढण्यात आल्या. ज्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले त्यात घरगुती गणपतींची संख्या सर्वाधिक होती. चिंचपाडा तलावात दोन ठिकाणी विसर्जनाची सोय केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना आखल्या होत्या. पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता. मोठ्या वाहनांना मिरवणुकीच्या रस्त्यांवर बंदी घातली होती. तसेच भाविकांना गणेश विसर्जनासाठी पाण्यात उतरण्यास मनाई केली होती. मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पालिका आणि सामाजिक संस्थांनी कार्यकर्ते ठेवले होते. प्रकाश व्यवस्थाही करण्यात आली होती. नगरसेवक प्रदीप पाटील आणि उमेश पाटील यांच्या वतीनेही विसर्जनाच्या ठिकाणी विशेष व्यवस्था केली होती.शिवमंदिर येथील कुंडातही पालिकेच्यावतीने विसर्जनाची सोय करण्यात आली होती. त्या ठिकाणीही भाविकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. सोबत जावसई तलाव, वडवली तलवातही विसर्जनाची सोय केली होती.विसर्जनासाठी उल्हास नदीचा पर्यायबदलापूर : बदलापूरमध्ये गौरीगणपतींचे मोठ्या उत्साहात विसर्जन झाले. बदलापूरमधील भाविकांनी विसर्जनासाठी उल्हास नदीचाच पर्याय निवडला. वाहते पाणी असल्याने आणि मूर्तीचे पावित्र्य टिकवण्यासाठी भाविकांनी उल्हास नदीच्या तीरावरच गर्दी केली होती.बदलापूरमध्ये रमेशवाडी परिसरातील उल्हासनदी चौपाटीवर विसर्जनासाठी भाविक आले होते. एरंजाड येथील उल्हासनदीच्या तीरावर देखील भाविकांनी गर्दी केली होती. ग्रामीण भागातील गणेशमूर्तीही याच ठिकाणी आणल्या होत्या. या सर्व ठिकाणी पालिकेच्या वतीचे सुरक्षेची व्यवस्था केली होती. कोणताही अपघात घडल्यास बचाव पथकही तैनात केले होते. कुळगावातील गावदेवी तलावातही भाविक मोठ्या संख्येने आले होते.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव