शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

महिनाभर दूषित पाणीपुरवठा, अंबरनाथमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 00:44 IST

एकदोन दिवस नव्हे तर गेल्या महिनाभरापासून अंबरनाथमधील शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर परिसरांत दूषित पाणीपुरवठा केला जात आहे.

अंबरनाथ : एकदोन दिवस नव्हे तर गेल्या महिनाभरापासून अंबरनाथमधील शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर परिसरांत दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. याप्रकरणी तक्रार करुनही त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर, स्थानिक महिलांना सोबत घेत काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना घेराव घातला. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. आठ दिवसांत समस्या न सुटल्यास महालक्ष्मीनगर चौकात उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.अंबरनाथच्या चिखलोली धरणातून ज्या भागांना पाणीपुरवठा केला जातो, त्यातील महालक्ष्मीनगर, शिवाजीनगर परिसरात नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. जे पाणी दैनंदिन कामासाठी वापरणेही शक्य नाही, ते पाणी स्वच्छ करून पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. विशेष म्हणजे या भागात जो पाणीपुरवठा केला जातो, त्या ठिकाणी एक दिवस स्वच्छ आणि दुसºया दिवशी अस्वच्छ पाणी येते. दिवसाआड स्वच्छ पाणी येत असल्याचे समाधान अधिकारी व्यक्त करत आहेत, एक दिवसाआड अस्वच्छ पाणी येत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. दिवसाआड स्वच्छ पाणीपुरवठा करण्यामागचा जीवन प्राधिकरणाचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र, ही समस्या अनेक दिवसांपासून असतानाही प्राधिकरण या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत. अनेक ठिकाणी जलवाहिन्या तुटलेल्या आहेत, तर काही जलवाहिन्या या थेट नाल्यातच तुटल्याने ते दूषित पाणी येण्याचे प्रमाणही वाढत आहे. ही समस्या अनेक दिवसांपासून असतानाही त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पाणीपुरवठा करणारे जीवन प्राधिकरण दुर्लक्ष करत आहे.आपल्या समस्येकडे लक्ष दिले जात नसल्याने या भागातील महिलांनी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्याकडे तक्रार केली. पाटील यांनी सर्व महिलांना एकत्रित करून प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय गाठले. या ठिकाणी वरिष्ठ अधिकारीच नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. या ठिकाणी उपस्थित इतर अधिकाºयांना याप्रकरणी जाब विचारण्यात आला. मात्र, अधिकारी यासंदर्भात ठोस उत्तर देण्यात अपयशी ठरले. अधिकाºयांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने पाटील यांनी प्राधिकरणाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. आठ दिवसांत या भागातील दूषित पाण्याची समस्या न सुटल्यास महालक्ष्मीनगर चौकातच उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला. काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेनंतर अधिकाºयांनी या समस्येच्या सोडवणुकीसाठी काम हाती घेतले. मात्र, त्यावर अद्याप ठोस उपाय झालेला नाही. प्राधिकरणाच्या कारभारावर सातत्याने अंबरनाथ, बदलापूरमधील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.>समस्या वर्षभरापासून असली तरी महिनाभरात ती अधिक तीव्र झालीदरम्यान, या भागातील महिलांनी प्राधिकरणाच्या अधिकाºयांना दूषित पाणी आणि मूळ समस्येची माहिती दिल्यावर अधिकारी केवळ बघ्याच्या भूमिकेत होते. ही समस्या गेल्या वर्षभरापासून आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून ही समस्या वाढल्याचे महिलांनी स्पष्ट केले.