शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभर दूषित पाणीपुरवठा, अंबरनाथमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 00:44 IST

एकदोन दिवस नव्हे तर गेल्या महिनाभरापासून अंबरनाथमधील शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर परिसरांत दूषित पाणीपुरवठा केला जात आहे.

अंबरनाथ : एकदोन दिवस नव्हे तर गेल्या महिनाभरापासून अंबरनाथमधील शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर परिसरांत दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. याप्रकरणी तक्रार करुनही त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर, स्थानिक महिलांना सोबत घेत काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना घेराव घातला. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. आठ दिवसांत समस्या न सुटल्यास महालक्ष्मीनगर चौकात उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.अंबरनाथच्या चिखलोली धरणातून ज्या भागांना पाणीपुरवठा केला जातो, त्यातील महालक्ष्मीनगर, शिवाजीनगर परिसरात नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. जे पाणी दैनंदिन कामासाठी वापरणेही शक्य नाही, ते पाणी स्वच्छ करून पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. विशेष म्हणजे या भागात जो पाणीपुरवठा केला जातो, त्या ठिकाणी एक दिवस स्वच्छ आणि दुसºया दिवशी अस्वच्छ पाणी येते. दिवसाआड स्वच्छ पाणी येत असल्याचे समाधान अधिकारी व्यक्त करत आहेत, एक दिवसाआड अस्वच्छ पाणी येत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. दिवसाआड स्वच्छ पाणीपुरवठा करण्यामागचा जीवन प्राधिकरणाचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र, ही समस्या अनेक दिवसांपासून असतानाही प्राधिकरण या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत. अनेक ठिकाणी जलवाहिन्या तुटलेल्या आहेत, तर काही जलवाहिन्या या थेट नाल्यातच तुटल्याने ते दूषित पाणी येण्याचे प्रमाणही वाढत आहे. ही समस्या अनेक दिवसांपासून असतानाही त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पाणीपुरवठा करणारे जीवन प्राधिकरण दुर्लक्ष करत आहे.आपल्या समस्येकडे लक्ष दिले जात नसल्याने या भागातील महिलांनी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्याकडे तक्रार केली. पाटील यांनी सर्व महिलांना एकत्रित करून प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय गाठले. या ठिकाणी वरिष्ठ अधिकारीच नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. या ठिकाणी उपस्थित इतर अधिकाºयांना याप्रकरणी जाब विचारण्यात आला. मात्र, अधिकारी यासंदर्भात ठोस उत्तर देण्यात अपयशी ठरले. अधिकाºयांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने पाटील यांनी प्राधिकरणाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. आठ दिवसांत या भागातील दूषित पाण्याची समस्या न सुटल्यास महालक्ष्मीनगर चौकातच उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला. काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेनंतर अधिकाºयांनी या समस्येच्या सोडवणुकीसाठी काम हाती घेतले. मात्र, त्यावर अद्याप ठोस उपाय झालेला नाही. प्राधिकरणाच्या कारभारावर सातत्याने अंबरनाथ, बदलापूरमधील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.>समस्या वर्षभरापासून असली तरी महिनाभरात ती अधिक तीव्र झालीदरम्यान, या भागातील महिलांनी प्राधिकरणाच्या अधिकाºयांना दूषित पाणी आणि मूळ समस्येची माहिती दिल्यावर अधिकारी केवळ बघ्याच्या भूमिकेत होते. ही समस्या गेल्या वर्षभरापासून आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून ही समस्या वाढल्याचे महिलांनी स्पष्ट केले.