शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

माळ गावाच्या विकासासाठी तयार करणार माॅडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST

कसारा : ठाणे जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या माळ विहिगावसाठी एक मॉडेल तयार करून या संपूर्ण आदिवासी गावाचा विकास करून ...

कसारा : ठाणे जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या माळ विहिगावसाठी एक मॉडेल तयार करून या संपूर्ण आदिवासी गावाचा विकास करून गोरगरीब आदिवासी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी माळ येथे दिली.

गुरुवारी शहापूर तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तालुक्याचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शहापूर तालुक्यातील मिनी महाबळेश्वर असलेल्या माळ गावात असलेल्या मिनी कासपठार, निळ्या रंगाचे दगड व धुक्याचे साम्राज्य असलेल्या उंच टेकड्या याबाबत माहिती दिली होती. जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे अ.अ. खंडारे, तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी, वनविभागाचे अधिकारी व. तु. घुले, यांनी माळ गावाला भेट दिली. निसर्गाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले बळवंत गडाची पाहणी केली. माळ गावातील डोंगर, टेकड्यांचा वनविभागाच्या मदतीने विकास करून पर्यटनाला चालना मिळेल या दृष्टिकोनातून ग्रामीण संस्कृती व पर्यावरणाची कास धरत एक मॉडेल तयार केले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बळवंत गडाच्या विरुद्ध दिशेस असलेल्या या पठारावर पर्यटन क्षेत्र झाल्यास गावाच्या विकासाला चालना मिळेल. रॅपलिंग, झुलता पूल, सेल्फी पॉइंट, ग्रामीण संस्कृती जपणारे टेन्ट, रानभाज्या, रानमेवासाठी स्वतंत्र स्टॉल यासह पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक उपक्रम या माळपठारावर राबविण्यात येणार आहेत. दरम्यान, बळवंत गडाच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने आजपर्यंत श्रमदानातून किल्ल्यावरील शौचकूप, पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या आहेत. अडगळीतील मारुती मंदिर स्वच्छ केले आहे. मोठ्या प्रमाणात गडाची दुरुस्ती असल्याने त्यासाठी सरकार दरबारी संस्थेचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र माळ पठारास पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यास बळवंत गडाकडे जाणाऱ्या रस्त्याची वाटही सोपी होईल.

-----------------------------------------------------------------------------------------

माळ गाव खरोखरच एक हिल स्टेशन आहे. उत्तम पर्यटन क्षेत्र या ठिकाणी होऊ शकते व त्याआधारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी आम्ही एक ग्रामीण संस्कृती व पर्यटन याआधारे एक मॉडेल तयार करून माळ गावाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करू.

- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी

माळ, विहिगाव या गावांना पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यास ऐतिहासिक गडकिल्ल्यांची जोपासनाही करता येईल. या मिनी महाबळेश्वर असलेल्या माळ पठाराला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

- पांडुरंग बरोरा,

माजी आमदार