शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

माळ गावाच्या विकासासाठी तयार करणार माॅडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST

कसारा : ठाणे जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या माळ विहिगावसाठी एक मॉडेल तयार करून या संपूर्ण आदिवासी गावाचा विकास करून ...

कसारा : ठाणे जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या माळ विहिगावसाठी एक मॉडेल तयार करून या संपूर्ण आदिवासी गावाचा विकास करून गोरगरीब आदिवासी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी माळ येथे दिली.

गुरुवारी शहापूर तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तालुक्याचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शहापूर तालुक्यातील मिनी महाबळेश्वर असलेल्या माळ गावात असलेल्या मिनी कासपठार, निळ्या रंगाचे दगड व धुक्याचे साम्राज्य असलेल्या उंच टेकड्या याबाबत माहिती दिली होती. जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे अ.अ. खंडारे, तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी, वनविभागाचे अधिकारी व. तु. घुले, यांनी माळ गावाला भेट दिली. निसर्गाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले बळवंत गडाची पाहणी केली. माळ गावातील डोंगर, टेकड्यांचा वनविभागाच्या मदतीने विकास करून पर्यटनाला चालना मिळेल या दृष्टिकोनातून ग्रामीण संस्कृती व पर्यावरणाची कास धरत एक मॉडेल तयार केले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बळवंत गडाच्या विरुद्ध दिशेस असलेल्या या पठारावर पर्यटन क्षेत्र झाल्यास गावाच्या विकासाला चालना मिळेल. रॅपलिंग, झुलता पूल, सेल्फी पॉइंट, ग्रामीण संस्कृती जपणारे टेन्ट, रानभाज्या, रानमेवासाठी स्वतंत्र स्टॉल यासह पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक उपक्रम या माळपठारावर राबविण्यात येणार आहेत. दरम्यान, बळवंत गडाच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने आजपर्यंत श्रमदानातून किल्ल्यावरील शौचकूप, पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या आहेत. अडगळीतील मारुती मंदिर स्वच्छ केले आहे. मोठ्या प्रमाणात गडाची दुरुस्ती असल्याने त्यासाठी सरकार दरबारी संस्थेचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र माळ पठारास पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यास बळवंत गडाकडे जाणाऱ्या रस्त्याची वाटही सोपी होईल.

-----------------------------------------------------------------------------------------

माळ गाव खरोखरच एक हिल स्टेशन आहे. उत्तम पर्यटन क्षेत्र या ठिकाणी होऊ शकते व त्याआधारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी आम्ही एक ग्रामीण संस्कृती व पर्यटन याआधारे एक मॉडेल तयार करून माळ गावाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करू.

- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी

माळ, विहिगाव या गावांना पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यास ऐतिहासिक गडकिल्ल्यांची जोपासनाही करता येईल. या मिनी महाबळेश्वर असलेल्या माळ पठाराला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

- पांडुरंग बरोरा,

माजी आमदार