शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

‘मोडकसागर’ ९४ टक्के भरले, पाणीटंचाईचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 00:51 IST

आंध्रा व मध्य वैतरणा धरणात सर्वाधिक पाऊस पडला. मोडक सागर धरण ९४ टक्के, तर बारवी ७३ टक्के भरले आहे.

ठाणे : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यात सरासरी जेमतेम १६.७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असली तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत आहे. आंध्रा व मध्य वैतरणा धरणात सर्वाधिक पाऊस पडला. मोडक सागर धरण ९४ टक्के, तर बारवी ७३ टक्के भरले आहे.सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊन पाणीकपात लागू करण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून धरणांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढला आहे. साहजिकच पाणीकपातीची चिंता आता दूर झाली आहे.गेल्या वर्षी आजच्या दिवशी ठाणे, मुंबईला पाणीपुरवठा करणारे बारवी, आंध्रा, मोडकसागर धरण १०० टक्के भरले होते. पण आता बारवीत ७२.८३ टक्के पाणी साठा झाला आहे. आज बारवी धरणाच्या परिसरात केवळ १० मि.मी. पाऊस पडला. मात्र, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडला. यामध्ये खानिवरे ६० मि.मी., कान्होळ २७ मि.मी., पाटगाव आणि ठाकूरवाडीला आठ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसंकट टळले आहे.बारवीची पाणीपातळी ६९.१९ मीटर झाली असून हे धरण भरुन वाहण्याकरिता धरणात अजून ३.४१ मीटर पाणीसाठा आवश्यक आहे. भातसा धरणात ८२.७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. सोमवारी धरणात २४ मि.मी. पाऊस पडला तर आंध्रा धरणात आज ५३ मि.मी. पाऊस झाला. आता या धरणात ५४.४२ टक्के पाणीसाठा आहे. मोडकसागरमध्ये ३५ मि.मी. पाऊस पडला. या धरणात ९४ टक्के साठा आहे. तानसात १६ मि.मी. पाऊस आज झाला असून ८२ टक्के साठा तयार झाला आहे.जिल्ह्यात सरासरी १६ मि.मी. पाऊस पडला. यापैकी ठाणे शहरात १६ मि.मी., कल्याण १७ मि.मी., मुरबाड १४ मि.मी., भिवंडी २० मि.मी., शहापूरला १९ मि.मी., उल्हासनगर ११ मि.मी. आणि अंबरनाथ १० मि.मी. पाऊस पडला आहे.