शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मोबाइल गहाळचे प्रमाण ४० टक्के घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 03:33 IST

रेल्वेत चोरीला जाणाऱ्या मोबाइलप्रकरणी यापूर्वी गहाळ अशी नोंद केली जात होती. मात्र, त्याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होण्यास सुरुवात झाल्यावर हे प्रमाण जवळपास ४० टक्क्यांनी घटले आहे.

- पंकज रोडेकरठाणे : रेल्वेत चोरीला जाणाऱ्या मोबाइलप्रकरणी यापूर्वी गहाळ अशी नोंद केली जात होती. मात्र, त्याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होण्यास सुरुवात झाल्यावर हे प्रमाण जवळपास ४० टक्क्यांनी घटले आहे. तसेच हे मोबाइलचोरटे बहुतांश अल्पवयीन आणि कर्नाटक तसेच पश्चिम बंगाल यासारख्या परराज्यांतील असल्याने त्यांना पकडणे डोकेदुखी होऊ लागली आहे.रेल्वे प्रवासात मोबाइलचोरीप्रकरणी जून २०१७ पासून लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यास सुरुवातझाली. तत्पूर्वी मोबाइल गहाळ झाला, अशीच फक्त नोंद होत असल्याने हे प्रमाण वर्षभरात सात ते आठ हजारांच्या घरात पोहोचले होते. मात्र, गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाल्यावर जून ते डिसेंबर २०१७ मध्ये ३००२ मोबाइलचोरीचे गुन्हे दाखल झाले होते. तर, जानेवारी ते जून २०१८ मध्ये सुमारे दोन हजार मोबाइलचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यावरून, गहाळ होणाºया नोंदीपेक्षा गुन्हे दाखल होऊ लागल्याने मोबाइलचोरीचे प्रमाण ४० टक्कयांनी घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.रेल्वे प्रवासात मोबाइलचोरीचे प्रकार वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी रेकॉर्डवरील टॉप २५ ही यादी अद्ययावत केली. तसेच रेल्वेस्थानकात पेट्रोलिंगवर विशेष भर दिला आहे. या कारवाईत मोबाइलचोरटे अल्पवयीन असल्याचे समोर आले, तर काही चोरटे कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांतून येऊन मोबाइल फोनचोरी करून तत्काळ पोबारा करतात. तसेच चोरीला जाणाºया मोबाइलचे लोकेशन्स पाहिल्यास कर्नाटक आणि पश्चिम बंगाल असे लोकेशन्स दाखवले जाते. मात्र, दुसºयांदा त्याचे लोकेशन्स पुन्हा दिसत नाही किंवा एक किंवा दोन मोबाइल फोन आणण्यासाठी त्या ठिकाणी पोलीस फौज पाठवणेही शक्य नसल्याने त्यांना पकडणे पोलिसांसाठी डोकेदुखी होऊन बसली आहे. या चालू वर्षात जवळपास १२५ ते १५० मोबाइलचोरट्यांना पकडण्यात आले आहे. त्यातील बहुतांश चोरटे न्यायालयीन कोठडीत असल्याने हे प्रमाण ठाण्यात तरी कमी झाल्याची माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे