शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या मोर्चात शेतकऱ्यांपेक्षा पदाधिकारीच अधिक! केवळ दीड ते दोन हजार शेतकरी, कार्यकर्ते सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 04:48 IST

मागील आठवड्यात ठाण्यात शेतक-यांच्या आंबा स्टॉलच्या मुद्यावरून मनसे आणि भाजपचे पदाधिकारी आपसात भिडले होते.

ठाणे : मनसे आणि भाजपमध्ये मागील आठवड्यात ठाण्यात आंबा स्टॉलवरून वाद झाला होता. त्याचा निषेध म्हणून अन् शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेने शुक्रवारी ठाणे महापालिकेवर शेतकऱ्यांचा महामोर्चा काढला. या मोर्चात ५ ते १० हजार शेतकरी सहभागी होतील, असा दावा पक्षाने केला होता. परंतु, प्रत्यक्षात दीड ते दोन हजार लोकच सहभागी झाले होते व राज्यभरातून अवघे १०० च्या आसपासच शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चात शेतकऱ्यांऐवजी मनसेचे पदाधिकारीच जास्त प्रमाणात सहभागी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे हा मोर्चा शेतकऱ्यांचा की मनसे पदाधिकाऱ्यांचा, असा सवाल करण्यात येत होता.

मागील आठवड्यात ठाण्यात शेतकऱ्यांच्या आंबा स्टॉलच्या मुद्यावरून मनसे आणि भाजपचे पदाधिकारी आपसात भिडले होते. त्यानंतर, हा वाद शमेल, अशी शक्यता वाटत होती. मात्र, प्रत्यक्षात मनसेने ठाण्यात शेतकऱ्यांचा महामोर्चा काढण्याचे जाहीर केले. शुक्रवारी दुपारी १ वाजता गावदेवी मैदानाजवळून तो निघणार होता. परंतु, शेतकरी आणि कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यात वेळ गेल्याने हा मोर्चा २.३० वाजण्याच्या सुमारास निघाला. या मोर्चाला सुरुवात झाली, त्यावेळी बैलगाड्यांसह डोक्यावर भाजीच्या टोपल्या घेऊन शेतकऱ्यांसह मनसेचे पदाधिकारी ‘चौकीदार चोर है’, या घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची १० कुटुंबे

या मोर्चात राज्यातील बीड, परभणी आदी भागांतील शेतकरी सहभागी झाले होते. बीडमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची १० कुटुंबेही मोर्चात सहभागी झाली होती. शेतीला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखाव्यात, आघाडीच्या काळात शेतमालाला जो बाजारभाव मिळत होता, तो भाजप सरकारच्या काळात मात्र मिळू शकला नसल्याचा आरोपही या वेळी शेतकऱ्यांनी केला.शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे, सत्तेत येताना भाजप सरकारने जी काही आश्वासने दिली होती, ती पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा, यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढला आहे. ठाणे महापालिकेकडे १०० स्टॉलची मागणी केली आहे.- प्रशांत नवगिरे,जिल्हाध्यक्ष - उस्मानाबाद, मनसे.स्वत:हून शेतकरी या मोर्चात सहभागी झालेले आहेत. शासनाने शेतकºयांची पिळवणूक केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. शिवसेना आणि भाजप बोगसगिरी करत असून चारा छावण्यांमध्येही भ्रष्टाचार करत आहेत.- सुमंत धस,जिल्हाध्यक्ष, बीड, मनसेराज्याच्या विविध भागांतून या मोर्चात शेतकरी सहभागी झाले आहेत. या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी हा मोर्चा काढला आहे. ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आदींसह राज्याच्या प्रत्येक शहरात शेतकऱ्यांना स्टॉल मिळावेत, अशी मागणी आहे.- अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष ठाणे, मनसेसरकारने केवळ खोटी आश्वासने दिली आहेत. शेतमालाला अद्यापही हमीभाव मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. कर्जमाफी केल्याचा दावा केला जात असला तरी हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढ्याच शेतकऱ्यांना ती मिळाली आहे. केवळ गाजर विकण्याचेच काम हे शासन करत आहे.-भागवत शिंदे, जिल्हाध्यक्ष, शेतकरीसेना, लातूर

टॅग्स :thaneठाणेMNSमनसे