शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

मनसेच्या मोर्चात शेतकऱ्यांपेक्षा पदाधिकारीच अधिक! केवळ दीड ते दोन हजार शेतकरी, कार्यकर्ते सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 04:48 IST

मागील आठवड्यात ठाण्यात शेतक-यांच्या आंबा स्टॉलच्या मुद्यावरून मनसे आणि भाजपचे पदाधिकारी आपसात भिडले होते.

ठाणे : मनसे आणि भाजपमध्ये मागील आठवड्यात ठाण्यात आंबा स्टॉलवरून वाद झाला होता. त्याचा निषेध म्हणून अन् शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेने शुक्रवारी ठाणे महापालिकेवर शेतकऱ्यांचा महामोर्चा काढला. या मोर्चात ५ ते १० हजार शेतकरी सहभागी होतील, असा दावा पक्षाने केला होता. परंतु, प्रत्यक्षात दीड ते दोन हजार लोकच सहभागी झाले होते व राज्यभरातून अवघे १०० च्या आसपासच शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चात शेतकऱ्यांऐवजी मनसेचे पदाधिकारीच जास्त प्रमाणात सहभागी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे हा मोर्चा शेतकऱ्यांचा की मनसे पदाधिकाऱ्यांचा, असा सवाल करण्यात येत होता.

मागील आठवड्यात ठाण्यात शेतकऱ्यांच्या आंबा स्टॉलच्या मुद्यावरून मनसे आणि भाजपचे पदाधिकारी आपसात भिडले होते. त्यानंतर, हा वाद शमेल, अशी शक्यता वाटत होती. मात्र, प्रत्यक्षात मनसेने ठाण्यात शेतकऱ्यांचा महामोर्चा काढण्याचे जाहीर केले. शुक्रवारी दुपारी १ वाजता गावदेवी मैदानाजवळून तो निघणार होता. परंतु, शेतकरी आणि कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यात वेळ गेल्याने हा मोर्चा २.३० वाजण्याच्या सुमारास निघाला. या मोर्चाला सुरुवात झाली, त्यावेळी बैलगाड्यांसह डोक्यावर भाजीच्या टोपल्या घेऊन शेतकऱ्यांसह मनसेचे पदाधिकारी ‘चौकीदार चोर है’, या घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची १० कुटुंबे

या मोर्चात राज्यातील बीड, परभणी आदी भागांतील शेतकरी सहभागी झाले होते. बीडमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची १० कुटुंबेही मोर्चात सहभागी झाली होती. शेतीला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखाव्यात, आघाडीच्या काळात शेतमालाला जो बाजारभाव मिळत होता, तो भाजप सरकारच्या काळात मात्र मिळू शकला नसल्याचा आरोपही या वेळी शेतकऱ्यांनी केला.शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे, सत्तेत येताना भाजप सरकारने जी काही आश्वासने दिली होती, ती पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा, यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढला आहे. ठाणे महापालिकेकडे १०० स्टॉलची मागणी केली आहे.- प्रशांत नवगिरे,जिल्हाध्यक्ष - उस्मानाबाद, मनसे.स्वत:हून शेतकरी या मोर्चात सहभागी झालेले आहेत. शासनाने शेतकºयांची पिळवणूक केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. शिवसेना आणि भाजप बोगसगिरी करत असून चारा छावण्यांमध्येही भ्रष्टाचार करत आहेत.- सुमंत धस,जिल्हाध्यक्ष, बीड, मनसेराज्याच्या विविध भागांतून या मोर्चात शेतकरी सहभागी झाले आहेत. या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी हा मोर्चा काढला आहे. ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आदींसह राज्याच्या प्रत्येक शहरात शेतकऱ्यांना स्टॉल मिळावेत, अशी मागणी आहे.- अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष ठाणे, मनसेसरकारने केवळ खोटी आश्वासने दिली आहेत. शेतमालाला अद्यापही हमीभाव मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. कर्जमाफी केल्याचा दावा केला जात असला तरी हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढ्याच शेतकऱ्यांना ती मिळाली आहे. केवळ गाजर विकण्याचेच काम हे शासन करत आहे.-भागवत शिंदे, जिल्हाध्यक्ष, शेतकरीसेना, लातूर

टॅग्स :thaneठाणेMNSमनसे