शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

मनसे स्वबळावर निवडणूक लढणार

By admin | Updated: June 26, 2017 01:28 IST

मनसेने यंदाच्या मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत सावध पावले टाकत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मनसेने यंदाच्या मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत सावध पावले टाकत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, इतर पक्षाने युती वा आघाडीचा प्रस्ताव दिल्यास त्यावर पक्षध्यक्षांसोबत चर्चा केली जाईल. त्यांच्या निर्देशानुसारच एकत्र लढणार असल्याचा पर्यायही राखून ठेवला आहे.२००७ मधील पालिका निवडणुकीत मनसेने माजी शहराध्यक्ष अरूण कदम यांच्या नेतृत्वाखाली चार जागांवर विजय मिळवला होता. २०१२ मधील निवडणुकीत मात्र एकमेव उमेदवार निवडून आला. तोसुद्धा सेनेत गेल्याने मनसेच्या अस्तित्वाला धक्का लागला. यानंतर पक्षबांधणीसाठी उपाध्यक्ष अरूण कदम यांच्यावर जबाबदारी सोपवली. मात्र पक्षातील अंतर्गत कुरघोडीमुळे नाराज होऊन सेनेत सामील झाले. उरलेसुरले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोट बांधून शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी प्रयत्न सुरु केले. यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यावर ठाकरे यांनी मनसैनिकांना लढण्याचे निर्देश दिले. पक्षाची स्थिती नाजूक असली तरी निवडणुकीत स्वबळावर उतरण्याची तयारी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी सक्षम उमेदवार मिळत नसले तरी निष्ठावंतांना उमेदवारी देण्याचा विचार केला जात आहे. तसेच इतर पक्षातील पदाधिकारी देखील पक्षात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या निवडणुकीसाठी सुमारे ३० इच्छुकांना संधी देण्याचा निर्णय तूर्तास घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यंदाच्या निवडणुकीत मते विभागणीसाठी मनसेचा वापर काही बड्या राजकीय पक्षांकडून केला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मनसेने मात्र त्याला भीक न घालण्याची ठाम भूमिका घेतली आहे. हे खरे असले तरी ऐन निवडणुकीच्यावेळेत काय होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.