शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

धोकादायक इमारती बाबत उल्हासनगर महापालिका आयुक्तांना मनसेचे निवेदन

By सदानंद नाईक | Updated: September 23, 2022 19:03 IST

मानस पार्क इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी शहरातील धोकादायक इमारती बाबत निवेदन दिले.

उल्हासनगर: मानस पार्क इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी शहरातील धोकादायक इमारती बाबत निवेदन दिले. शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी धोकादायक इमारत पुनर्बांधणी बाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा करूनही परिपत्रक प्रसिद्ध का केले नाही. याबाबत जाब विचारला. उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून गुरूवारी मानस इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. एका महिन्यात तीन इमारतीचे स्लॅब कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला असून शासन किती बळी गेल्या नंतर धोकादायक इमारती बाबत परिपत्रक काढणार असा प्रश्न मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला.

 मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अजीज शेख यांनी दुपारी १२ वाजता भेट घेऊन अनेक प्रश्नांचा भडीमार करून निवेदन दिले आहे. शहरात सातत्याने कोसळणाऱ्या इमारतीच्या दुर्घटनेत जाणारे नागरिकांचे बळी हे कधी थांबणार, राज्य शासन धोकादायक इमारतींबाबत कधी निर्णय घेणार, धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्कालीन पालकमंत्र्यांनी कमेटी स्थापन करून आज जवळपास वर्ष होत आले आहे, मात्र निर्णय कधी, विधानसभेतील मुख्यमंत्री यांच्या घोषणेला महिना उलटला तरी आदेश नाही आदी प्रश्न मनसे शिष्टमंडळाकडून करण्यात आले.

शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी लावल्या जाणारी दंडाची रक्कम ही सन २००६ च्या रेडिरेकणरच्या ५० टक्के आकारण्यात यावी. असे मत देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या इमारती बाबत योग्य निर्णय घेण्याचे मतही यावेळी अनेकांनी व्यक्त केले. आयुक्त अजीज शेख यांनी धोकादायक इमारती बाबत विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून महापालिका लवकरच धोकादायक इमारतींवर निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. शहराध्यक्ष बंडू देशमुख, जिल्हा सचिव संजय घुगे, मैन्नुद्दीन शेख यांच्यासह पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरMNSमनसे