शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

धोकादायक इमारती बाबत उल्हासनगर महापालिका आयुक्तांना मनसेचे निवेदन

By सदानंद नाईक | Updated: September 23, 2022 19:03 IST

मानस पार्क इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी शहरातील धोकादायक इमारती बाबत निवेदन दिले.

उल्हासनगर: मानस पार्क इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी शहरातील धोकादायक इमारती बाबत निवेदन दिले. शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी धोकादायक इमारत पुनर्बांधणी बाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा करूनही परिपत्रक प्रसिद्ध का केले नाही. याबाबत जाब विचारला. उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून गुरूवारी मानस इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. एका महिन्यात तीन इमारतीचे स्लॅब कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला असून शासन किती बळी गेल्या नंतर धोकादायक इमारती बाबत परिपत्रक काढणार असा प्रश्न मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला.

 मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अजीज शेख यांनी दुपारी १२ वाजता भेट घेऊन अनेक प्रश्नांचा भडीमार करून निवेदन दिले आहे. शहरात सातत्याने कोसळणाऱ्या इमारतीच्या दुर्घटनेत जाणारे नागरिकांचे बळी हे कधी थांबणार, राज्य शासन धोकादायक इमारतींबाबत कधी निर्णय घेणार, धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्कालीन पालकमंत्र्यांनी कमेटी स्थापन करून आज जवळपास वर्ष होत आले आहे, मात्र निर्णय कधी, विधानसभेतील मुख्यमंत्री यांच्या घोषणेला महिना उलटला तरी आदेश नाही आदी प्रश्न मनसे शिष्टमंडळाकडून करण्यात आले.

शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी लावल्या जाणारी दंडाची रक्कम ही सन २००६ च्या रेडिरेकणरच्या ५० टक्के आकारण्यात यावी. असे मत देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या इमारती बाबत योग्य निर्णय घेण्याचे मतही यावेळी अनेकांनी व्यक्त केले. आयुक्त अजीज शेख यांनी धोकादायक इमारती बाबत विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून महापालिका लवकरच धोकादायक इमारतींवर निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. शहराध्यक्ष बंडू देशमुख, जिल्हा सचिव संजय घुगे, मैन्नुद्दीन शेख यांच्यासह पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरMNSमनसे