शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अंबरनाथमध्ये गटबाजी संपवत मनसे पदाधिकारी एकत्र; राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर सगळे पदाधिकारी आले एकत्र

By पंकज पाटील | Updated: May 17, 2023 16:32 IST

अंबरनाथमध्ये मनसेची ताकद पुन्हा वाढावी यासाठी राज ठाकरे यांनी रविवारी अंबरनाथमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता.

अंबरनाथ : राज ठाकरेअंबरनाथ दौऱ्यावर असताना त्यांनी अंबरनाथमधील पदाधिकाऱ्यांची गडबाजी पाहिल्यानंतर त्यांना तात्काळ डोंबिवलीत एका बैठकीसाठी बोलावले. त्या बैठकीत सर्वच पदाधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर गटबाजी ठेवल्यास पदावरून काढू अशी सरळ धमकीच दिली होती. राज ठाकरे यांच्या या कानपिचक्यानंतर मनसेचे सर्व पदाधिकारी गटबाजी बाजूला सारत पक्ष कार्यालयात एकत्रित आले आहेत. 

अंबरनाथमध्ये मनसेची ताकद पुन्हा वाढावी यासाठी राज ठाकरे यांनी रविवारी अंबरनाथमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात पक्षांतर्गत गटबाजी त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संघटना भक्कम करण्याच्या दृष्टीने सर्व गडटबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना स्वतंत्र बैठकीसाठी बोलावले. या बैठकीत गटबाजी करणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी चांगलेच झापले. एवढेच नव्हे तर या गटबाजी करणाऱ्यांना खांद्यावर हात ठेवून उभ्या राहण्यास सांगत राज ठाकरे यांनी त्यांचा फोटो काढला आणि तो फोटो सर्वांनी आपल्या कार्यालयात लावावा असे आदेश दिले. तसेच पक्ष कार्यालयात नियमित संध्याकाळी प्रत्येकाने हजेरी लावण्याची सक्ती केली.

राज ठाकरे यांच्या या सक्तीच्या आदेशानंतर पहिल्या दिवशी शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी पक्ष कार्यालयात हजेरी लावत उपजिल्हाप्रमुख शैलेश शिर्के यांच्यासोबत हात मिळवणी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शैलेश शिर्के आणि जिल्हा संघटक संदीप लकडे यांची देखील हात मिळवणी करण्यात आली. यापूर्वी संदीप लकडे आणि कुणाल भोईर एका गटात तर शैलेश शिर्के आणि त्यांचे पदाधिकारी एका गटात होते मात्र आता राज ठाकरेंच्या मध्यस्थी नंतर हे सगळे कार्यकर्ते एकत्रित येऊन संघटना वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेambernathअंबरनाथ