शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ठाण्यात दिवसाढवळया मनसे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 19:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राबोडीतील मनसेचे प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी राबोडीतील बिस्मील्ला हॉटेलसमोर दिवसाढवळया ...

ठळक मुद्देक्लस्टरच्या वादातून हत्येचा संशयतपासासाठी तीन विशेष पथकांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राबोडीतील मनसेचे प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी राबोडीतील बिस्मील्ला हॉटेलसमोर दिवसाढवळया गोळया झाडून हत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपींच्या शोधासाठी तीन पथकांची नियुक्ती केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. हा हल्ला क्लस्टरच्या वादातून झाल्याचा संशय मनसेचे ठाणे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.राबोडीतील रहिवाशी शेख हे काही कामानिमित्त मोटारसायकलवरुन सोमवारी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास बिस्मील्ला हॉटेलसमोरुन जात होते. त्याचवेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या हल्लेखोराने त्यांच्या दिशेने रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. एक गोळी त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूला लागली. यात ते खाली कोसळून गंभीर जखमी झाले. काही स्थानिक रहिवाशांनी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांचा मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भरदिवसा झालेल्या या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी मनसेचे पदाधिकारी तसेच ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख अविनाश जाधव, शहरप्रमुख रवींद्र मोरे यांच्यासह ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे आदींनी भेट देऊन पाहणी केली. राबोडीतील क्लस्टरला मनसेने विरोध केला होता. शेख यांनी त्यासाठी आंदोलने केली होती. या विरोधातूनच त्यांची हत्या झाल्याचा संशय मनसेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.

‘‘जमील शेख यांनी गेल्या अनेक दिवसांपासून क्लस्टरला विरोध केला आहे. यातूनच ही हत्या झाल्याची शक्यता आहे. २०१७ मध्येही त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्या हल्ल्याचेही मारेकरी अद्याप पकडले गेले नाहीत. आपल्या जीवाला धोका असल्याचे शेख यांनी यापूर्वीच पोलिसांना अर्ज दिला होता.’’अविनाश जाधव, संपर्क प्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ठाणे- पालघर जिल्हा.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून