शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

ठाण्यात दिवसाढवळया मनसे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 19:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राबोडीतील मनसेचे प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी राबोडीतील बिस्मील्ला हॉटेलसमोर दिवसाढवळया ...

ठळक मुद्देक्लस्टरच्या वादातून हत्येचा संशयतपासासाठी तीन विशेष पथकांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राबोडीतील मनसेचे प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी राबोडीतील बिस्मील्ला हॉटेलसमोर दिवसाढवळया गोळया झाडून हत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपींच्या शोधासाठी तीन पथकांची नियुक्ती केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. हा हल्ला क्लस्टरच्या वादातून झाल्याचा संशय मनसेचे ठाणे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.राबोडीतील रहिवाशी शेख हे काही कामानिमित्त मोटारसायकलवरुन सोमवारी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास बिस्मील्ला हॉटेलसमोरुन जात होते. त्याचवेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या हल्लेखोराने त्यांच्या दिशेने रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. एक गोळी त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूला लागली. यात ते खाली कोसळून गंभीर जखमी झाले. काही स्थानिक रहिवाशांनी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांचा मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भरदिवसा झालेल्या या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी मनसेचे पदाधिकारी तसेच ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख अविनाश जाधव, शहरप्रमुख रवींद्र मोरे यांच्यासह ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे आदींनी भेट देऊन पाहणी केली. राबोडीतील क्लस्टरला मनसेने विरोध केला होता. शेख यांनी त्यासाठी आंदोलने केली होती. या विरोधातूनच त्यांची हत्या झाल्याचा संशय मनसेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.

‘‘जमील शेख यांनी गेल्या अनेक दिवसांपासून क्लस्टरला विरोध केला आहे. यातूनच ही हत्या झाल्याची शक्यता आहे. २०१७ मध्येही त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्या हल्ल्याचेही मारेकरी अद्याप पकडले गेले नाहीत. आपल्या जीवाला धोका असल्याचे शेख यांनी यापूर्वीच पोलिसांना अर्ज दिला होता.’’अविनाश जाधव, संपर्क प्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ठाणे- पालघर जिल्हा.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून