शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

फेरीवाला परवान्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द करू नये, अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचा मनसेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 15:40 IST

फेरीवाला परवान्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द करू नये अशी मागणी मनसेने केली आहे. 

ठळक मुद्देफेरीवाला परवान्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द करू नये - मनसेन्यायालयात दाद मागणार असल्याचा मनसेचा इशाराअधिवास दाखला बंधनकारक करावा - मनसे

ठाणेठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे शहरात दिल्या जाणाऱ्या फेरीवाला परवान्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द करू नये अशी मागणी मनसेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.

ठाणे शहरात फेरीवाला धोरण फ्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्नशील असल्याबद्दल ठाणेकरांच्या वतीने आयुक्तांचे आभार मानून संदीप पाचंगे निवेदनात म्हणतात की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिवास दाखला बंधनकारक आहे परंतु आपण त्यावर तोडगा म्हणून आधारकार्ड, वीजबील, घरभाडे करारनामा इत्यादी वास्तव्याचे पुरावे म्हणून ग्राह्य धरुन फेरीवाला परवाना देण्याचे आपण आदेश दिले आहेत. आधारकार्ड पुरावा म्हणून वापरण्यास बंधनकारक नसल्याचे उच्च न्यायालयाने देखील सांगितले आहे. ठाणे शहरात फेरीवाला म्हणून व्यवसाय करण्याचा पहिला अधिकार ठाण्यात वर्षानुवर्षे राहणाऱ्या ठाणेकरांचा आहे. नुकतेच रेल्वेवर परप्रांतीयांच्यामुळे अतिरिक्त बोजा वाढला आहे हे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आधीच शहरातील वाढणारी गर्दी डोकेदुखी ठरत असताना आपण न्यायालयाच्या निर्णयाचा अवलंब न करून परप्रांतीयांना एक फ्रकारे आमंत्रण देत आहात असे संदीप पाचंगे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर मोकळा श्वास घेणाऱ्या ठाण्यातील सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणावर आपले कर्मचारी हप्ता घेऊन फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याची परवानगी देतात. आपण दिलेल्या सवलतीच्या गैरवापर घेऊन बरेचसे परप्रांतीय फेरीवाले परवानाधारक होतील व भविष्यात स्वत:चा हक्क सांगतील. आपण बदली झाल्यावर निघून जाल परंतु आपला हा निर्णय ठाणेकरांचे कायमस्वरुपीचे नुकसान करणारा ठरेल असे संदीप पाचंगे यांनी म्हटले आहे. तरी ठाणे महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या अटी, शर्ती मध्ये कोणताही बदल न करता अधिवास दाखला बंधनकारक करावा व ज्यांना हा दाखला मिळवायचा आहे त्यांच्यासाठी एकदिवसीय शिबीर आयोजित करावे आणि जर आपण कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केलात तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याविरोधात न्यायालयात दाद मागेल असा इशारा मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेhawkersफेरीवाले