शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाला परवान्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द करू नये, अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचा मनसेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 15:40 IST

फेरीवाला परवान्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द करू नये अशी मागणी मनसेने केली आहे. 

ठळक मुद्देफेरीवाला परवान्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द करू नये - मनसेन्यायालयात दाद मागणार असल्याचा मनसेचा इशाराअधिवास दाखला बंधनकारक करावा - मनसे

ठाणेठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे शहरात दिल्या जाणाऱ्या फेरीवाला परवान्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द करू नये अशी मागणी मनसेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.

ठाणे शहरात फेरीवाला धोरण फ्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्नशील असल्याबद्दल ठाणेकरांच्या वतीने आयुक्तांचे आभार मानून संदीप पाचंगे निवेदनात म्हणतात की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिवास दाखला बंधनकारक आहे परंतु आपण त्यावर तोडगा म्हणून आधारकार्ड, वीजबील, घरभाडे करारनामा इत्यादी वास्तव्याचे पुरावे म्हणून ग्राह्य धरुन फेरीवाला परवाना देण्याचे आपण आदेश दिले आहेत. आधारकार्ड पुरावा म्हणून वापरण्यास बंधनकारक नसल्याचे उच्च न्यायालयाने देखील सांगितले आहे. ठाणे शहरात फेरीवाला म्हणून व्यवसाय करण्याचा पहिला अधिकार ठाण्यात वर्षानुवर्षे राहणाऱ्या ठाणेकरांचा आहे. नुकतेच रेल्वेवर परप्रांतीयांच्यामुळे अतिरिक्त बोजा वाढला आहे हे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आधीच शहरातील वाढणारी गर्दी डोकेदुखी ठरत असताना आपण न्यायालयाच्या निर्णयाचा अवलंब न करून परप्रांतीयांना एक फ्रकारे आमंत्रण देत आहात असे संदीप पाचंगे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर मोकळा श्वास घेणाऱ्या ठाण्यातील सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणावर आपले कर्मचारी हप्ता घेऊन फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याची परवानगी देतात. आपण दिलेल्या सवलतीच्या गैरवापर घेऊन बरेचसे परप्रांतीय फेरीवाले परवानाधारक होतील व भविष्यात स्वत:चा हक्क सांगतील. आपण बदली झाल्यावर निघून जाल परंतु आपला हा निर्णय ठाणेकरांचे कायमस्वरुपीचे नुकसान करणारा ठरेल असे संदीप पाचंगे यांनी म्हटले आहे. तरी ठाणे महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या अटी, शर्ती मध्ये कोणताही बदल न करता अधिवास दाखला बंधनकारक करावा व ज्यांना हा दाखला मिळवायचा आहे त्यांच्यासाठी एकदिवसीय शिबीर आयोजित करावे आणि जर आपण कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केलात तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याविरोधात न्यायालयात दाद मागेल असा इशारा मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेhawkersफेरीवाले