शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

मुख्यमंत्र्यांचा उठाव होता की ठराव, मनसेचे आमदार राजू पाटील यांचा सवाल

By अजित मांडके | Updated: October 6, 2022 18:27 IST

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान बाप मुख्यमंत्री माझा मुलगा आणि नातू नगरसेवकाच्या तयारीत अशी टीका केली होती. मात्र असे कुणाच्याही घरापर्यंत जाणे चुकीचे असल्याचे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले आहे.

ठाणे :

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान बाप मुख्यमंत्री माझा मुलगा आणि नातू नगरसेवकाच्या तयारीत अशी टीका केली होती. मात्र असे कुणाच्याही घरापर्यंत जाणे चुकीचे असल्याचे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात बोलण्याच्या ओघात शब्द निघाले असतील. परंतु प्रतिउत्तर देताना मुख्यमंत्नी एकनाथ शिंदे यांनी दिलेली प्रतिक्रि या ऐकली तर त्यात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, माझा नातू दीड वर्षाचा आहे. त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झाले. मात्र  मुख्यमंत्र्यांची ही दीड वर्षापासून प्लॅनिंग होती का? की हा उठाव होता की ठराव होता? असा सवाल उपस्थित केला आहे.

दसरा मेळाव्याची दोन्ही भाषणो आम्ही बघितली, परंतु त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही, परंतु गर्दी आणि दर्दी नागरीक हे राज ठाकरे यांच्या पाडव्याच्या मेळाव्यातच दिसतात. राज ठाकरे यांच्याकडे ती ताकद असल्याचेही ते म्हणाले.  सेनेचे जे दोन गट झालेले आहेत, त्यामुळे जे वातावरण तयार झाले किंवा राजकीय गोंधळ सुरू आहे. त्यामुळे मराठी माणूसच कुठेतरी गोंधळलेल्या परिस्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु अशा लोकांना एकत्न आणण्याची ताकद फक्त राज ठाकरे यांच्याकडे आहे. राज ठाकरे यांच्याकडे अभ्यास आणि विचार आहेत.

महाराष्ट्रातील राजकारणात या चांगल्या गोष्टी नाहीकाही लोक इव्हेंट साजरे करतात, काही लोक डोके मोजून मतदान करतात काही लोक खोके मोजून मतदान करतात. त्यामुळे लोकांनी यातून आता काहीतरी शिकले पाहिजे. मात्र राज्याच्या राजकारणासाठी हे चांगले संकेत नसल्याचे ते म्हणाले. एक मराठी माणूस म्हणून मला हे न पटणारे आहे.दिवा भागात पुलाचे काम सुरू असल्याने तेथील काही लोक बाधित होत असल्याने तसेच पुलाच्या उतरण्याच्या दिशेला कुठलीही जोड (कनेटीव्हीटी) दिसत नाही. या संदर्भात गुरुवारी पाटील हे महापालिकेत आले होते. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर व शहर विभागातील अधिका:यांची भेट घेतली.  अधिका:यांना जर मुक्त हस्ते काम करण्याची संधी दिली तर अधिकारी काम करतात. परंतु जिथे मत मिळतात तेथेच कामे करा असे सांगितले गेले तर शहराची अवस्था वाईट होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे नवीन आयुक्तांनी अधिका:यांना मुक्त हस्तपणो काम करण्याची संधी दिली तर ठाणो देखील नवीमुंबईसारखे चांगले होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :MNSमनसेRaju Patilराजू पाटील