शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी मनसेचे आंदोलन सुरुच

By अजित मांडके | Updated: October 6, 2023 16:55 IST

टोलदरवाढी विरोधात मनसेने सुरु केलेले आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरु होते.

ठाणे : टोलदरवाढी विरोधात मनसेने सुरु केलेले आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरु होते. परंतु मनसेच्या शिष्ठमंडळाने दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांना दालनात बोलावून घेऊन त्यांचे म्हणने ऐकून घेतले. परंतु जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तो पर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याची माहिती मनसेने दिली.

ठाण्याच्या वेशीवर असलेल्या मुलुंड टोलनाक्यावर १ ऑक्टोबर पासून लागू केलेल्या दरवाढी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ३० सप्टेंबरपासून जनआंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर ५ ऑक्टोबर पासून मनसेच्या वतीने या भागात आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात मनसेचे ठाणे पालष्घर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवि मोरे, उपशहर अध्यक्ष पुष्कराज विचारे, स्वप्नील महिंद्रकर यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले आहेत. टोलदरवाढ रद्द करावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. त्यानुसार गुरूवारी सांयकाळी एमएसआरडीसीच्या अधिकाºयांनी देखील त्यांची भेट घेतली. मात्र या भेटीत आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी देखील हे आंदोलन सुरुच असल्याचे दिसून आले. दरम्यान आंदोलनादरम्यान पदाधिकाºयांची डॉक्टरांनी तपासणी देखील केली.

दुसरीकडे मनसेच्या शिष्ठ मंडळाने या संदर्भात जिल्हाधिकाºयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ही भेट झाली नाही. त्यामुळे पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तसेच आंदोलनकर्त्यांचे म्हणने देखील ऐकूण घेतले. शिवाय या संदर्भात वरीष्ठ पातळीवर चर्चा केली जाईल असे आश्वासनही दिले आहे. परंतु असे असेल तरी देखील जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, ठाणेकरांची टोलदरवाढीतून सुटका होत नाही, तो पर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली.

टॅग्स :MNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवthaneठाणेtollplazaटोलनाका