शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी मनसेचे आंदोलन सुरुच

By अजित मांडके | Updated: October 6, 2023 16:55 IST

टोलदरवाढी विरोधात मनसेने सुरु केलेले आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरु होते.

ठाणे : टोलदरवाढी विरोधात मनसेने सुरु केलेले आंदोलन सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरु होते. परंतु मनसेच्या शिष्ठमंडळाने दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांना दालनात बोलावून घेऊन त्यांचे म्हणने ऐकून घेतले. परंतु जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तो पर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याची माहिती मनसेने दिली.

ठाण्याच्या वेशीवर असलेल्या मुलुंड टोलनाक्यावर १ ऑक्टोबर पासून लागू केलेल्या दरवाढी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ३० सप्टेंबरपासून जनआंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर ५ ऑक्टोबर पासून मनसेच्या वतीने या भागात आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात मनसेचे ठाणे पालष्घर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवि मोरे, उपशहर अध्यक्ष पुष्कराज विचारे, स्वप्नील महिंद्रकर यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले आहेत. टोलदरवाढ रद्द करावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. त्यानुसार गुरूवारी सांयकाळी एमएसआरडीसीच्या अधिकाºयांनी देखील त्यांची भेट घेतली. मात्र या भेटीत आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी देखील हे आंदोलन सुरुच असल्याचे दिसून आले. दरम्यान आंदोलनादरम्यान पदाधिकाºयांची डॉक्टरांनी तपासणी देखील केली.

दुसरीकडे मनसेच्या शिष्ठ मंडळाने या संदर्भात जिल्हाधिकाºयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ही भेट झाली नाही. त्यामुळे पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तसेच आंदोलनकर्त्यांचे म्हणने देखील ऐकूण घेतले. शिवाय या संदर्भात वरीष्ठ पातळीवर चर्चा केली जाईल असे आश्वासनही दिले आहे. परंतु असे असेल तरी देखील जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, ठाणेकरांची टोलदरवाढीतून सुटका होत नाही, तो पर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली.

टॅग्स :MNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधवthaneठाणेtollplazaटोलनाका