शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

आडमुठ्या मनपांमुळे बिघडले एमएमआरडीएचे नियोजन

By admin | Updated: December 14, 2015 01:10 IST

चार महापालिकां, दोन नगरपालिकांना भेडसावणारी कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्चाचे कचरा

चार महापालिकां, दोन नगरपालिकांना भेडसावणारी कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्चाचे कचरा विल्हेवाट प्रकल्प तीन ठिकाणी नियोजित केले आहेत. पण कचरा विल्हेवाटीचा दर परवडणार नसल्याचे कारण पुढे करीत महापालिकांनी ते प्रकल्प रखडवले आहेत.आशिया खंडातील सर्वात मोठे तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्प तीन टप्प्यात होणार आहेत. पहिला प्रकल्प तळोजा एमआयडीसीजवळ अंबरनाथ तालुक्याच्या साखरोली, कारवले, उसाटणे, नितलस आणि वाडी या पाच गावांच्या मध्यभागी भाल गावाच्या गावकुसाला होणार होता. २२ महिन्याच्या कालावधीत सुरू करण्याची ग्वाही एमएमआरडीएने मागील वर्षी दिली होती. तेथे दोन हजार ५०० मेट्रीक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. एक मेट्रीक टन कचऱ्यासाठी महापालिकाना केवळ ८४६ रूपये खर्च करावा लागणार होता. मात्र हा खर्च परवडणारा नसल्याचा पळपुटेपणा महापालिकांनी केला . मुख्यमंत्र्याना भेटून ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी महापालिकांना या प्रकल्पाचा लाभ होणार होता. पण एक वर्षाच्या डीपीडीसीतील चर्चेनंतरही नाकर्तेपणामुळे तो योग अद्यापही आला नाही. डंपिंगसाठी जागा नसल्याचे कारण पुढे करून सर्वच महापालिका अनधिकृत डंपिंगवर कचरा टाकण्यात धन्यता मानत आहेत. कचऱ्याच्या नावाखाली अन्यमार्गांनी दरवर्षी हजारो कोटी खर्च होतो. परंतु कचरा विल्हेवाटीची समस्या सोडण्याऐवजी तिला जटील करण्याचे काम महापालिका करीत असल्याची चर्चा समस्याग्रस्त नागरिकांमध्ये सुरू आहे.पहिल्या टप्यातील या प्रकल्पावर एमएमआरडीए एक हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. २६४ हेक्टर जागेपैकी १०७ हेक्टर जमीन सरकारी असून १५७ हेक्टर जमीन शेतकऱ्यांची राहणार आहे. प्रकल्प उभा राहात असलेल्या ठिकाणी अंबरनाथ एमआयडीसी , तळोजा एमआयडीसी आणि मलंगगड- कल्याण रस्ता हे तीन प्रमुख रस्ते एकत्र येत आहेत. जिल्ह्यातील महापालिका व नगरपालिकांमधील सुमारे ४५ लाख लोकसंख्येचा कचरा या प्रकल्पात येणार आहे. त्यासाठी सुमारे २५ वर्षाची लोकसंख्या विचारात घेतली आहे. येथे २५ किमी.च्या परिसरातील कचरा येणार आहे. तर दुसरा प्रकल्प शिळफाटाजवळ कल्याण, अंबरनाथ एमआयडीसी रस्त्याला लागून २५९ हेक्टर जागेवर प्रस्तावित आहे. तिसरा टप्पा भिवंडीच्या दापोडे परिसरातील ३५२ हेक्टर भूखंडावर ‘ई कचरा विल्हेवाट’ केली जाणार आहे. या तिन्ही प्रकल्पांमध्ये २०३१पर्यंत प्रत्येक दिवशी सुमारे १८ हजार ३२७ मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया होईल. पण पहिलाच टप्पा रखडल्याने पुढील प्रकल्पांचे प्रस्ताव पडून आहे.