शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

एमएमआरडीए क्षेत्रातही हवी क्लस्टर योजना

By admin | Updated: July 8, 2017 05:26 IST

ठाणे शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना लागू करण्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : ठाणे शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना लागू करण्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. याधर्तीवर एमएमआरडीए क्षेत्रात धोकादायक इमारतींच्या विकासासाठी क्लस्टर योजना लागू करावी, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ठाण्यात धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांना क्लस्टरमुळे इमारतीचा पुनर्विकास झाल्यावर ३०० चौरस फुटांचे हक्काचे घर मिळणार आहे, असे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचधर्तीवर एमएमआरडीए क्षेत्रातील धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना दिलासा द्यावा. त्यासाठी क्लस्टर योजना लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. खासदारांच्या मते एमएमआरडीए क्षेत्रात पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे क्लस्टर योजना लागू केल्यावर त्यामुळे लोकसंख्येवर त्याचा ताण पडणार नाही, याकडे लक्ष वेधले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्द एमएमआरडीए क्षेत्रात येते. केडीएमसी हद्दीत ५३२ धोकादायक इमारती आहेत. जुलै २०१५ मध्ये ठाकुर्ली परिसरातील मातृछाया ही धोकादायक पडली होती. त्यात ९ जणांचा जीव गेला. तेव्हापासून क्लस्टर योजना लागू करण्याची मागणी होत आहे. तेव्हा पालकमंत्री शिंदे यांनी क्लस्टर योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ही योजना लागू करण्याबाबत आघाडी सरकारने दिरंगाई केली. आघाडी सरकारने आघात मूल्यांकन अहवाल तयार करण्याचे आदेश केडीएमसीला दिले होते. मात्र, केडीएमसीतने रिपोर्ट तयार केलेला नाही. हा रिपोर्ट तयार करण्याचा ठराव आॅगस्ट २०१६ मध्ये केडीएमसीने केला. नगररचना विभागाच्या मते हा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. तर प्रशासनाच्या मते महापालिकेने महापौरांच्या अध्यक्षतेखाली क्लस्टरसंदर्भात नेमलेली समितीचा अहवाल तयार करून त्याला अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे. दरम्यानच्या काळात आघात मूल्यांकन अहवाल सक्तीचा नसेल, असे सरकारने स्पष्ट केले. त्यामुळे हा अहवाल तयार झाला का, की त्यावर अद्याप कामच सरू झालेले नाही, याची सुस्पष्टता नाही. केडीएमसीत शिवसेना-भाजपची सत्ता असून, त्यांच्याकडूनच क्लस्टर योजना राबवण्याविषयी दिरंगाई होत आहे. परिणामी धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना जीव मुठीत धरून रहावे लागत आहे. सरकारची मेहरनजर केवळ ठाण्यावरच...ठाणे शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न सरकारने क्लस्टर योजनेची अधिसूचना काढून सोडवला असला तरी सरकारने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बाबतीत दुजाभाव होत आहे. धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी प्रश्न सरकारने केवळ ठाण्यापुरता सोडविला आहे. हाच प्रश्न कल्याण-डोंबिवलीत २००९ पासून लटकला आहे.२०१४ पासून सत्तेत असलेली युती हा प्रश्न सोडवण्यासाठी जोर लावत नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीचे क्लस्टर गटांगळ््या खात आहे. आता खासदारांनी एमएमआरडीए क्षेत्रात क्लस्टर योजना लागू करण्याची मागणी करून सर्वसमावेशक विचार केला आहे. त्यातही त्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचा विशेष उल्लेख केला आहे. एमएमआरडीए क्षेत्रात भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर या महापालिकाही येतात. त्याचबरोबर अंबरनाथ, बदलापूर पालिकांचा समावेश आहे. एका हाती सगळ््यांचाच प्रश्न सुटणार असेल तर हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी तातडीने घेऊन धोकादायक इमारतींमधील नागरिकांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी धोकादायक इमारतींमधील रहिवाशांकडून होत आहे. केडीएमसीची यंत्रणा कुचकामीकेडीएमसी हद्दीतील ५३२ धोकादायक इमारतींमध्ये जवळपास एक लाखापेक्षा जास्त रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत. नुकतीच डोंबिवली आयरे रोडवरील गंगाराम सदन ही धोकादायक इमारत कोसळली. महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सक्षम नसल्याची बाब या वेळी उघड झाली. २०१५ मध्येही ठाकुर्ली धोकादायक इमारत दुर्घटनेच्या वेळी महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरल्याने एनडीआरएफला पाचारण करावे लागले होते.