शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये पाणीटंचाईवरून आमदार, नगरसेवकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:25 IST

अधिकाऱ्यांना धरले धारेवर : प्राधिकरणाच्या कार्यालयास ठोकले टाळे

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई पाहता गुरुवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्रित येत एमआयडीसीचे व्हॉल्व उघडण्यासाठी आंदोलन केले. याची कल्पना येताच आमदार डॉ. बालाजी किणीकर घटनास्थळी दाखल झाले. जीवन प्राधिकरणाचे अधिकारी लोकप्रतिनिधींमध्ये वाद निर्माण करीत असल्याचा आरोप करीत आमदारांनी नगरसेवकांच्या आंदोलनात सहभागी होत प्राधिकरणाच्या कार्यालयालाच टाळे ठोकले.गेल्या महिन्याभरापासून शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराला मुबलक पाणीपुरवठा होत असतानाही प्राधिकरणाचे अधिकारी नागरिकांपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करीत नाहीत. त्यातच पाणी पळविले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. अंबरनाथचे पाणी नेमके जाते कोठे, असा प्रश्न उपस्थित करीत सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले होते. शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी शहरासाठी येणारे एमआयडीसीचे पाणी ज्या ठिकाणी अडविले जाते त्या ठिकाणी असलेला व्हॉल्व उघडत आंदोलन केले. याचवेळी आमदार डॉ. किणीकर हेही आले. नगरसेवकांचा संताप पाहून किणीकर यांनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच आमदारांची बदनामी करण्याचे काम अधिकारी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पाण्याची पळवापळवी केली जात असल्याचा आरोप नगरसेवक उमेश पाटील यांनी केला आहे. यावर किणीकर यांनीही नगरसेवकांना सोबत घेत थेट जीवन प्राधिकरणाचे कार्यालय गाठले. या कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी हजर नव्हते. त्यामुळे संतापलेल्या आमदार आणि नगरसेवकांनी प्राधिकरणाच्या कार्यालयालाच टाळे ठोकले. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर शहरासाठी चार दशलक्ष लीटर पाणीपुरवठा कमी होत असल्याचे मत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शहरात पाण्याचे नियोजन करण्यात अडचणी येत असल्याची कबुली दिली. मात्र नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत मुबलक पाणी देण्याची मागणी लावून धरली.शहरासाठी येणारे पाणी पळविण्याचे काम राजकीय हेतूने होत आहे. पाण्याचे योग्य नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केली जाते. यावरून प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराची प्रचिती येते.    - उमेश पाटील, नगरसेवकपाण्याच्या वादातून नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंबरनाथकरांना मुबलक पाणी मिळावे हा आपला सातत्याने प्रयत्न असतो. मात्र काही अधिकारी आपले नाव पुढे करून आपली बदनामी करीत आहेत.    - डॉ. बालाजी किणीकर, आमदार