शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

अंबरनाथमध्ये पाणीटंचाईवरून आमदार, नगरसेवकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:25 IST

अधिकाऱ्यांना धरले धारेवर : प्राधिकरणाच्या कार्यालयास ठोकले टाळे

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई पाहता गुरुवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्रित येत एमआयडीसीचे व्हॉल्व उघडण्यासाठी आंदोलन केले. याची कल्पना येताच आमदार डॉ. बालाजी किणीकर घटनास्थळी दाखल झाले. जीवन प्राधिकरणाचे अधिकारी लोकप्रतिनिधींमध्ये वाद निर्माण करीत असल्याचा आरोप करीत आमदारांनी नगरसेवकांच्या आंदोलनात सहभागी होत प्राधिकरणाच्या कार्यालयालाच टाळे ठोकले.गेल्या महिन्याभरापासून शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराला मुबलक पाणीपुरवठा होत असतानाही प्राधिकरणाचे अधिकारी नागरिकांपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करीत नाहीत. त्यातच पाणी पळविले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. अंबरनाथचे पाणी नेमके जाते कोठे, असा प्रश्न उपस्थित करीत सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले होते. शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी शहरासाठी येणारे एमआयडीसीचे पाणी ज्या ठिकाणी अडविले जाते त्या ठिकाणी असलेला व्हॉल्व उघडत आंदोलन केले. याचवेळी आमदार डॉ. किणीकर हेही आले. नगरसेवकांचा संताप पाहून किणीकर यांनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच आमदारांची बदनामी करण्याचे काम अधिकारी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पाण्याची पळवापळवी केली जात असल्याचा आरोप नगरसेवक उमेश पाटील यांनी केला आहे. यावर किणीकर यांनीही नगरसेवकांना सोबत घेत थेट जीवन प्राधिकरणाचे कार्यालय गाठले. या कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी हजर नव्हते. त्यामुळे संतापलेल्या आमदार आणि नगरसेवकांनी प्राधिकरणाच्या कार्यालयालाच टाळे ठोकले. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर शहरासाठी चार दशलक्ष लीटर पाणीपुरवठा कमी होत असल्याचे मत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शहरात पाण्याचे नियोजन करण्यात अडचणी येत असल्याची कबुली दिली. मात्र नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत मुबलक पाणी देण्याची मागणी लावून धरली.शहरासाठी येणारे पाणी पळविण्याचे काम राजकीय हेतूने होत आहे. पाण्याचे योग्य नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केली जाते. यावरून प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराची प्रचिती येते.    - उमेश पाटील, नगरसेवकपाण्याच्या वादातून नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंबरनाथकरांना मुबलक पाणी मिळावे हा आपला सातत्याने प्रयत्न असतो. मात्र काही अधिकारी आपले नाव पुढे करून आपली बदनामी करीत आहेत.    - डॉ. बालाजी किणीकर, आमदार