शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भिवंडीतील जिल्हा कोविड रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्यासाठी आमदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 17:22 IST

 सध्या भिवंडीसह ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णानाची संख्या झपाट्याने वाढत असतांना देखील हे रुग्णालय लोकार्पण व उदघाटन सोहळ्यानंतरही ऐन गरजेच्यावेळी बंद असल्याने येथील नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत होते

नितिन पंडीत 

भिवंडी :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भिवंडी शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेडची मोठी अडचण निर्माण होत आहे. विशेष म्हणजे येथील कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने भिवंडीतील सवाद येथे ८१८ बेडच्या भव्य अशा जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २७ मार्च रोजी उदघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे . मात्र उदघाटनाच्या २० दिवसानंतरही हे रुग्णालय बंद असल्याने रुग्णांच्या चिंतेत वाढ झाली आहे. नागरिकांच्या या गैरसोयीची दखल भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी घेतली असून लवकरात हे कोविड जिल्हा रुग्णालय सुरु करण्यात यावे त्यासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ व औषध पुरवठा तत्काळ या रुग्णालयाला करण्यात यावा अशी मागणी आमदार शेख यांनी राज्याचे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

                 सध्या भिवंडीसह ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णानाची संख्या झपाट्याने वाढत असतांना देखील हे रुग्णालय लोकार्पण व उदघाटन सोहळ्यानंतरही ऐन गरजेच्यावेळी बंद असल्याने येथील नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत होते त्यामुळे नागरिकांना कोरोनावरील उपचार घेतांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची बाब आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली आहे. 

                     सवाद येथील जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालय एकूण २ लाख ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेत बनविण्यात आलेल्या या अत्याधुनिक रुग्णालयात ३६० महिला ३७९ पुरुष ऑक्सीजन बेड असून तर ८८ अतिदक्षता बेड, ज्यात विभागात २० व्हेंटिलेटर , २० बायपॅक व ४० हाय फ्लो नेझल कॅनुला ऑक्सिजन थेरपी असे सर्व सोयी सुविधा असलेले एकूण ८१८ बेड आहेत हे सर्व बेड ऑक्सिजनयुक्त बेड अशा सर्व सोयी सुविधा असलेले हे भव्य जिल्हा कोविड रुग्णालय जिल्हा प्रशासनाने उभारले आहे मात्र उदघाटन होऊन २० दिवसांनातरही ऐन गरजेचे वेळी हे रुग्णालय बंद असल्याने वाढत्या कोरोना संकटात नागरिकांना कोरोनावरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे त्यातच आता कडक निर्बंधांमुळे येथील नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे त्यामुळे हे रुग्णालय लवकरात लवकर सुरु करावे व नागरिकांना शासनाने दिलासा द्यावा अशी मागणी आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस