शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
2
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
3
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
4
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
5
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
6
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
7
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
8
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
9
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
10
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
11
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
12
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
15
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
16
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
17
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
18
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
19
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
20
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...

भिवंडीत सुरु असलेल्या अवजड वाहतूकीबाबत आमदार रईस शेख आक्रमक; वाहतूक विभागाला दिला रास्ता रोकोचा इशारा

By नितीन पंडित | Updated: October 3, 2023 21:52 IST

अन्यथा मुंबई नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करू अशा प्रकारचे आक्रमक भूमिका घेतली होती.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था व अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी वाहतूक व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी तातडीने बैठक बोलावून अवजड वाहनांना शहरात दुपारी पूर्णतः बंदी घालावी अन्यथा मुंबई नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करू अशा प्रकारचे आक्रमक भूमिका घेतली होती.

भिवंडीत २४ तासात रस्ते अपघातात दोन निष्पापांचा बळी गेल्याने आमदार रईस शेख यांनी शहरातील स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयातच वाहतूक विभाग व पोलीस प्रशासनाची तातडीची बैठक बोलावली होती. सुमारे तीन ते चार तासांहून अधिक वेळ चाललेल्या या बैठकीत शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे, खड्डे व अवजड वाहतूक या विषयी चर्चा करण्यात आली.यावेळी वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड,भिवंडी पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे ,पालिका उपायुक्त सचिन माने यांच्यासह मनपा,वाहतूक व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शहरातील अवजड वाहतूक दिवसा बंद असल्याचे आदेश ठाणे पोलिस वाहतूक विभागाकडून काढले जातात परंतु ते पायदळी तुडवून या रस्त्यावर चिरीमिरी घेऊन सरार्सपणे अवजड वाहतूक सुरू आहे त्यामुळे या दुर्घटना होत आहेत असा आरोप आमदार रईस शेख यांनी यावेळी केला.तर वाहतूक विभागाने दिवसा बारा ते चार वाजता या दुपारच्या वेळेत अवजड वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रताप केला आहे असे सांगत आमदार शेख यांनी नागरिकांचे जीव महत्वाचे असून पोलिस विभाग भिवंडी शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश काढणार नसेल तर नागरिकांसह मुंबई नाशिक महामार्गावर रास्तारोको आंदोलन करू असा इशारा आमदार रईस शेख यांनी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ.विनयकुमार राठोड व भिवंडी पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे व पोलिस अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत दिला आहे.

तर शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याबाबतचे आदेश काढण्याबाबत आम्ही आश्वासन देऊ शकतो, पण आता त्याबाबतचे आदेश काढण्यात तांत्रिक अडचण आहे असे वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ.विनयकुमार राठोड यांनी देत ठाणे,मुंबई,वसई - मिरा भाईंदर व नवी मुंबई येथील पोलीस आयुक्तांच्या बैठकीतून त्याबाबत निर्णय होऊन तसे आदेश पारित करता येऊ शकतात आणि त्यामध्ये वेळ जाणार असल्याने आत्ताच तातडीने अवजड वाहतूक बंद करणे शक्य नसल्याची अडचण देखील वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार डॉ.विजय कुमार राठोड यांनी बैठकीत मांडली.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी