शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

सरकार मच्छिमार, शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आमदार गीता जैन यांचे आश्वासन 

By धीरज परब | Updated: May 25, 2023 18:43 IST

"उत्तन वासियांची राहती घरे सुरक्षितच"

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन, चौक, पाली, डोंगरी, तारोडी गावातील स्थानिक भूमिपुत्र मच्छीमार व शेतकऱ्यांच्या सरकारी जमिनी वरील पूर्वी पासूनची राहती घरे ही सुरक्षित असून राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणी समाजकंटक भूमिपुत्रांना घाबरवत असेल तर घाबरण्याचे अजिबात कारण नाही, अशी ग्वाही आमदार गीता जैन यांनी उत्तन येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत दिली . 

सदर गावांमध्ये भूमिपुत्र हे पिढ्या न पिढ्या रहात असून काही शासनाने देखील धोरण निश्चित करून राहती घरे संरक्षित केलेली आहेत. तरी देखील काही समाज कंटक हे भूमिपुत्रांच्या पिढीजात घरां बाबत तक्रारी करून त्यांना वेठीस धरत आहेत. त्यातच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा नंतर अपर तहसीलदार निलेश गौंड यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमणांना नोटीस बजावल्या नंतर समाज कंटक लोकां मध्ये आणखी भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप आ. गीता जैन यांनी संत पिटर कोळी जमात सभागृहात गुरुवारी बैठकी दरम्यान केला. 

यावेळी  अपर तहसीलदार निलेश गौंड, महापालिका उपायुक्त मारुती गायकवाड, प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड, मंडळ अधिकारी दिपक अहिरे, पोलीस निरीक्षक दादासाहेब करांडे,  माजी नगरसेवक चंद्रकांत वैती. राहिदास पाटील व शरद पाटील, कलमेत गौऱ्या (पाटील), शैलेश मामुनकर, ज्युड सामऱ्या, ऑस्टीन सामऱ्या, प्रकाश कोळी, बाबू कांबळे तसेच स्थानिक कोळी बांधव उपस्थित होते.

ग्रामस्थांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही . या बाबत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी देखील स्थानिक भूमिपुत्रांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची खात्री दिली असल्याची माहिती आ. जैन यांनी दिली. 

ग्रामस्थानी त्यांच्या मनातील शंका बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यासमोर मांडल्या असता त्यांच्या शंकांचे योग्य ते निरासन करण्यात आले. काही समाजकंटक स्थानिकामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज पसरवीत असून अश्या गैरसमजाला बळी न पाडण्याचे आवाहन जैन यांनी ग्रामस्थांना केले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर