शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

मितेश जगताप आत्महत्या प्रकरण: कुटुंबीयांना गुन्हा मागे घेण्यासाठी धमकीचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 16:34 IST

टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहाणाऱ्या मितेश जगताप या तरुणाने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबाने आरोप केला होता. मात्र पोलिसांनी गुन्हा न केल्याने अखेर या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाने या प्रकरणाची धाव घेतली होती.

कल्याण : टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहाणाऱ्या मितेश जगताप या तरुणाने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबाने आरोप केला होता. मात्र पोलिसांनी गुन्हा न केल्याने अखेर या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाने या प्रकरणाची धाव घेतली होती. न्यायालयाने गंभीर दखल घेत डिसेंबर महिन्यात टिटवाळा पोलिसांना चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान हे प्रकरण मागे घेण्यासाठी शनिवारी अज्ञात व्यक्तीने जगताप यांना एक निनावी पत्र पाठवले आहे. त्या पत्रात पोलिसांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी जगताप कुटुंबीयांना धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मितेशने टिटवाळ्यातील पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्‍महत्‍या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. तसेच, कुटुंबीयांनाही पोलिसी जाच सुरू झाल्याने ते टिटवाळ्यातील राहते घर सोडून डोंबिवलीला राहायला गेले. न्याय मिळविण्यासाठी तसेच दोषींवर कारवाईसाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र रविवारी पुष्पा जगताप या टिटवाळा मधील जुन्या घरी गेले असता त्यांना पाकिटातील धमकीचे निनावी पत्र मिळाले. या पत्रात पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो लगेच मागे घ्या. पोलिस जेवढे पैसे देतात तेवढे पैसे घ्या, गप्प बसा. कमी असेल तर सांगा जास्त पैसे मिळतील. पोलिसात विरोधात कोर्टात जाऊन माघार घ्यायची आहे. त्यात तुमचे भले आहे. तक्रारदार राहिले नाहीत तर केस रद्द होईल. बघा विचार करा आता फक्त गोडीत समज देतो. नंतर मात्र सर्व काही हातून जाईल. काही दिवस तुमच्या हाती आहेत. काळजी घ्या अशा आशयाचे धमकी वजा निनावी पत्र अज्ञात व्यक्तीने लिहिले आहे. 

या निनावी पत्रामुळे जगताप कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्‍या अज्ञात व्यक्ती विरोधात मयत मितेशची आई पुष्पा जगताप यांनी टिटवाळा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील दोघे दोषी पोलिसाचा न्यायालयात समोर अहवाल सादर केला जाणार असल्याने ते अटकपूर्व जमीन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्‍याचे समजते. ही केस कोर्टासमोर सादर होऊ नये म्हणून केस मागे घेण्यासाठी निनावीपत्राद्वारे धमकाविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मयत मितेशची आई पुष्पा जगताप यांनी केला आहे. न्यायालयाने दोषी आरोपींना कडक शिक्षा करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान,  याबाबत टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्याशी संपर्क साधला असता हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याने याबद्दल बोलणे उचित होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याण