शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

दु:खावेग सावरून मिळवले ८० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:56 IST

आपल्या चुलतभावाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला सारून त्याने मनाची तयारी केली.

ठाणे : आपल्या चुलतभावाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला सारून त्याने मनाची तयारी केली. मानसिक धक्क्यातून सावरत अभ्यासावर लक्ष केंद्रित करून बारावीची परीक्षा दिली आणि डीएव्ही महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून तब्बल ८० टक्के गुणांसह यश मिळवले आहे, ते दिवा येथील निखिल भोसले या तरुणाने.काही कारणास्तव राहत्या घरी निखिलचा चुलत भाऊ सिद्धेशचा मृत्यू झाला. सिद्धेशच्या अकाली जाण्याचा धक्का बसलेल्या निखिलने काही दिवस जेवण, अभ्यास सर्वच सोडून दिले होते. निखिल हा बारावीची परीक्षा देईल की नाही, याबद्दलही साशंकता होती. मात्र, पुतण्याच्या मृत्यूचे दु:ख काही काळ बाजूला ठेवून बळीराम अर्थात निखिलचे वडील यांनी आपल्या दोन्ही मुलांना समजावून अभ्यास करण्याच्या दृष्टीने धीर दिला. निखिलचा लहान भाऊ रोहित हासुद्धा यंदा दहावीला होता. त्यालाही परीक्षा देण्यासाठी धीर दिला. वडिलांच्या आधारानंतर निखिलने अभ्यास केला. प्रचंड मेहनत केली आणि परीक्षा दिली.बुधवारी लागलेल्या निकालानुसार वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या निखिलला ८० टक्के गुण मिळाले आहेत. त्याच्या या यशाबद्दल सर्वच स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे. दिवा प्रवासी संघटनेनेही गुरुवारी त्याचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८