शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

मीरा रोडला बिल्डरकडून ५० कोटींची फसवणूक, दोघांना अटक, तिसरा फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 03:46 IST

मीरा रोड : काशिमीरा पोलीस ठाण्यामागील तन्वी इमिनन्स या बहुमजली बांधकाम प्रकल्पात सदनिका खरेदी करणा-या ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघा भागीदार विकासकांना अटक केली

मीरा रोड : काशिमीरा पोलीस ठाण्यामागील तन्वी इमिनन्स या बहुमजली बांधकाम प्रकल्पात सदनिका खरेदी करणा-या ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघा भागीदार विकासकांना अटक केली आहे, तर एका आरोपीचा शोध सुरु आहे. या फसवणुकीचा आकडा तब्बल ५० कोटींच्या घरात असल्याचे पोलिसांनी सांगितले.काशिमीरा पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात घरे खेरदी करणाºयांना ताबा न देता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी तन्वी प्रकल्पाचे भागीदार संगीता विजय हेगडे, दयाभाई सुतारिया व भूपतभाई राजीवभाई लुखी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. खरेदीदारांच्या फसवणुकीची रक्कम कोटींमध्ये असल्याने या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता.गुन्हे शाखेने या प्रकरणी भूपतभाई लुखी याला आधी अटक केली होती. तर रविवारी रात्री संगीता विजय हेगडे (४१) हिला अटक करण्यात आली आहे. हेगडेला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तिसरा आरोपी दयाभाई सुतारियाचा शोध सुरु आहे.तन्वी ग्रूपने बहुमजली तन्वी इमिनेन्स या नावाने वसाहत बांधण्यास घेत २०१० पासून सदनिकांची नोंदणी सुरु केली होती. यात फेज एकच्या इमारतीला दहा मजली, तर फेज दोनच्या इमारतीस पालिकेकडून पाच मजल्यांचीच परवानगी असताना विकासकांनी मात्र सुरूवातीला फेज एकची इमारत १८ मजली, तर फेज दोनची इमारत १४ मजली असल्याचे सांगून घरे विकण्यास सुरुवात केली होती.बिल्डरने आतापर्यंत ५० हजार रुपयांपासून ४० ते ५० लाख रुपयांची रक्कम ग्राहकांकडून घेतली आहे. करारनामा झाल्यावर तीन वर्षात घराचा ताबा देण्याचे आश्वासनही बिल्डरने पाळले नाही.गेल्या दीड-दोन वर्षांपासून काम बंदच आहे. टोलवाटोलवीची उत्तरे मिळत असल्याने काही खरेदीदारांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.>दीड वर्षे थांबले होते प्रकल्पाचे कामया प्रकल्पाचे काम गेली सात वर्षे मार्गी लागलेले नव्हते. त्यातही गेल्या वर्ष-दीड वर्षात ते जवळपास ठप्प होते. ते का मार्गी लागत नाही, याबबात वावंरवार विचारणा केल्यावरही घरे घेणाºयांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात होती. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले.आतापर्यंत दोन विकासकांना अटक केली आहे. सुमारे ५० लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून फसवणुकीची रक्कम १५ कोटींच्या घरात आहे. फसवणूक झालेल्यांची संख्या वाढत असुन ही रक्कम सुमारे ५० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.- व्यंकट आंधळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा