शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

प्रभाग अधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर, अनधिकृत बांधकामाला केलं अधिकृत; आयुक्तांचा दणका

By धीरज परब | Updated: June 29, 2024 05:40 IST

आयुक्त संजय काटकर यांनी तर तत्कालीन प्रभाग अधिकारी सचिन बच्छाव यांनी अनधिकृत बांधकामे अधिकृत ठरवल्या प्रकरणी चौकशी लावली होती .

मीरारोड-  अनधिकृत बांधकामां वर कारवाई ऐवजी त्याला दुरुस्ती परवानगी खाली संरक्षण देतानाच अनधिकृत बांधकामे नियमबाह्यपणे अधिकृत ठरवण्याचा बेकायदा प्रताप करणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेतील प्रभाग अधिकाऱ्यांचे आज पर्यंत दिलेले सर्व निर्णय आयुक्त संजय काटकर यांनी रद्द केले आहेत. 

एमआरटीपी ऍक्ट सह महापालिका अधिनियम मध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई चे कलम नमूद आहेत . दुसरीकडे अनधिकृत बांधकामां बाबतचे न्यायालयाचे व शासनाचे कारवाई बाबतचे अनेक आदेश आहेत . खाजगी जागेसह सरकारी जमिनीवरील तसेच कांदळवन , सीआरझेड १ बाधित अनधिकृत बांधकामां वर सुद्धा ठोस कारवाई केली गेली पाहिजे. 

परंतु मीरा भाईंदर महापालिकेत मात्र अनधिकृत बांधकामांना सर्रास दुरुस्ती परवानग्या देऊन त्यांना संरक्षण देण्याचे काम महापालिकेचे अधिकारी करत आले आहेत . न्यायालयाचे आदेश गांभीर्याने घेऊन त्याची काटेकोर अमलबजावणी करणे महापालिकेला बंधनकारक आहे . शिवाय एमआरटीपी ऍक्ट , महापालिका अधिनियम तसेच विकास नियंत्रण नियमावलीचा सुद्धा न्यायालयाच्या आदेशा नुसार  विचार न करताच पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी अधिकार नसताना नियमबाह्यपणे अनधिकृत बांधकामांना अधिकृत म्हणून जाहीर केले आहे .  

महापालिका प्रभाग अधिकारी हे सर्रास अनधिकृत बांधकामांना दुरुस्ती पासून बांधकाम अधिकृत असल्याचा निर्णय देत आहेत. दुरुस्ती परवानगी देण्याचे तसेच बांधकाम अधिकृत ठरवण्याचे कायद्याने अधिकार प्रभाग अधिकारी यांना कसे असू शकतात असा सवाल सातत्याने केला जातो . दुरुस्ती परवानगी हि मूळ बांधकाम न तोडता केवळ प्लास्टर आदी गोष्टींसाठी असताना सर्रास जुने बांधकाम तोडून नवीन बांधकामे तसेच मूळ बांधकामापेक्षा मोठी बांधकामे नव्याने अनधिकृतपणे बांधली गेली आहेत . 

आयुक्त संजय काटकर यांनी तर तत्कालीन प्रभाग अधिकारी सचिन बच्छाव यांनी अनधिकृत बांधकामे अधिकृत ठरवल्या प्रकरणी चौकशी लावली होती . सत्यकाम फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता यांनी या बाबत तक्रार करून बच्छाव वर कारवाईची मागणी केली होती . अखेर आयुक्तांनी २८ जून रोजी आदेश पारित करून २८ जून २०२४ पूर्वी प्रभाग समिती १ ते ६ मधील प्रभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त तथा पदनिर्देशीत अधिकारी हयांच्या मार्फत यापूर्वी अधिकृत म्हणून घोषीत करण्यात आलेले कोणतेही बांधकामाचे सर्व आदेश रद्द केले आहेत . सदरचे आदेश ज्या बांधकामाबाबत पारित केलेले आहेत त्याच्या मालमत्ता धारक भोगवटा धारक व विकासक यांना उपायुक्त अतिक्रमण निर्मूलन यांच्या स्वाक्षरीने कळविण्यात यावे असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे . 

महाराष्ट्र नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम मधील अधिकाराचा वापर करुन प्रभाग अधिकारी  यांना पदनिर्देशीत अधिकारी घोषीत केलेले आहे. पदनिर्देशीत अधिकारी यास एखादया बांधकामाबाबत कलम २६० अन्वये नोटीस बजावल्या नतर  सदरचे बांधकाम अधिकृत करण्याबाबतचे कोणतेही अधिकार प्रदान करण्यात आलेते नाहीत. त्यामुळे कोणत्याही अनधिकृत बांधकामाबाबत तत्कालिन प्रभाग अधिकारी यांनी अधिकार क्षेत्राच्या बाहेर जावून बांधकाम ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका कालीन असल्याने अधिकृत घोषीत करणेबाबत पारित केलेले आदेश रह करणे आवश्यक आहे.  अशा प्रकारचे आदेश सार्वजनिक उद्देश वा विकास प्रक्रियेचा भाग नाही.  अशा प्रकारचे आदेश पारित करत असताना कोणत्याही प्रकारची विहित कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेली नाही  असे आयुक्तांनी स्पष्ट करत अनधिकृत बांधकामे नियमबाह्यपणे अधिकृत ठरवण्याचे सर्व निर्णय आयुक्तांनी रद्द केले आहेत . यामुळे असे निर्णय देणाऱ्या आजी - माजी प्रभाग अधिकाऱ्यांची तसेच बांधकाम धारक यांची देखील अडचण वाढण्याची शक्यता आहे . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक